शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

अर्ध्या एकरच्या सातबारासाठी शेतकऱ्याची फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 21:30 IST

हक्काच्या शेतीचा सातबारा मिळविण्यासाठी एक शेतकरी गेल्या १७ वर्षापासून प्रशासनाचे उंबरठे झिजवितो आहे. परंतु प्रशासकीय पेचात त्याचा सातबारा कुठे अडकलाय, याबाबत कुणीही त्याचे समाधान करू शकले नाही. हक्काच्या शेतीसाठी उंबरठे झिजविताना तो हतबल झाला आहे. त्याच्यावर झालेल्या कर्जामुळे ते फेडण्यासाठी स्वत:चे अवयव विकण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाच्या चकरा मारून हतबल : कर्ज फेडण्यासाठी अवयव विकण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हक्काच्या शेतीचा सातबारा मिळविण्यासाठी एक शेतकरी गेल्या १७ वर्षापासून प्रशासनाचे उंबरठे झिजवितो आहे. परंतु प्रशासकीय पेचात त्याचा सातबारा कुठे अडकलाय, याबाबत कुणीही त्याचे समाधान करू शकले नाही. हक्काच्या शेतीसाठी उंबरठे झिजविताना तो हतबल झाला आहे. त्याच्यावर झालेल्या कर्जामुळे ते फेडण्यासाठी स्वत:चे अवयव विकण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.या पीडित शेतकऱ्याचे नाव सागर मंदरे आहे. उमरेड तालुक्यातील मकरधोकडा येथील रहिवासी आहे. त्याची वडिलोपार्जित ७ एकर जमीन होती. आर्थिक परिस्थिती बरी नसल्यामुळे वडिलांनी सन १९८९ साली ८५ आर, १९९४ साली ९७ आर आणि १९९५ साली ८१ आर जमीन विकली. शेवटी त्यांच्या जवळ २० आर जमीन शिल्लक राहिली. सागर मंदरे १९९६ पासून त्यांच्याकडे शिल्लक जमिनीच्या सातबाराची मागणी प्रशासनाकडे करतो आहे. आपल्या जमिनीचा सातबारा मिळवण्यासाठी तो १७ वर्षापासून प्रशासनाचे उंबरठे झिवजत आहे. गावातील पटवाऱ्याकडे त्याने सातबारा मागितला असता देण्यास नकार दिला. म्हणून त्याने उमरेडचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागितली. तेव्हा त्यांनी ताबा वहीवर नोंद नसल्याचे सांगून रिकाम्या हाताने परतवून लावले. त्यानंतर त्याने अप्पर आयुक्तांकडे दाद मागितली. त्यांनीही उपविभागीय अधिकाऱ्याचा आदेश कायम ठेवला. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे मंत्रालयात जाऊन महसूल विभागात आपली व्यथा सांगितली. महसूल विभागाने नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणाची शहनिशा न करता पुनर्मोजणीमध्ये जमीन गेल्याचा अहवाल देऊन महसूल विभागाचा आदेश फेटाळल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. ते परत जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध अप्पर आयुक्तालयात गेले. परंतु त्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला. प्रशासनाने न्यायच नाकारल्याने सागर मंदरे हतबल झाले आहे. घरी दोन मुले, वृद्ध वडील असा प्रपंच आहे. प्रशासनाच्या निर्णयाने आता जमीन मिळणार नाही, त्यामुळे तो हतबल झाला आहे. झालेले कर्ज फेडता येईल, या भावनेतून शरीराच्या अवयवाची विक्री करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर