शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
4
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
5
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
6
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
7
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
8
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
9
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
10
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
11
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
12
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
13
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
14
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
15
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
16
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
17
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
18
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
19
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
20
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले

अर्ध्या एकरच्या सातबारासाठी शेतकऱ्याची फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 21:30 IST

हक्काच्या शेतीचा सातबारा मिळविण्यासाठी एक शेतकरी गेल्या १७ वर्षापासून प्रशासनाचे उंबरठे झिजवितो आहे. परंतु प्रशासकीय पेचात त्याचा सातबारा कुठे अडकलाय, याबाबत कुणीही त्याचे समाधान करू शकले नाही. हक्काच्या शेतीसाठी उंबरठे झिजविताना तो हतबल झाला आहे. त्याच्यावर झालेल्या कर्जामुळे ते फेडण्यासाठी स्वत:चे अवयव विकण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाच्या चकरा मारून हतबल : कर्ज फेडण्यासाठी अवयव विकण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हक्काच्या शेतीचा सातबारा मिळविण्यासाठी एक शेतकरी गेल्या १७ वर्षापासून प्रशासनाचे उंबरठे झिजवितो आहे. परंतु प्रशासकीय पेचात त्याचा सातबारा कुठे अडकलाय, याबाबत कुणीही त्याचे समाधान करू शकले नाही. हक्काच्या शेतीसाठी उंबरठे झिजविताना तो हतबल झाला आहे. त्याच्यावर झालेल्या कर्जामुळे ते फेडण्यासाठी स्वत:चे अवयव विकण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.या पीडित शेतकऱ्याचे नाव सागर मंदरे आहे. उमरेड तालुक्यातील मकरधोकडा येथील रहिवासी आहे. त्याची वडिलोपार्जित ७ एकर जमीन होती. आर्थिक परिस्थिती बरी नसल्यामुळे वडिलांनी सन १९८९ साली ८५ आर, १९९४ साली ९७ आर आणि १९९५ साली ८१ आर जमीन विकली. शेवटी त्यांच्या जवळ २० आर जमीन शिल्लक राहिली. सागर मंदरे १९९६ पासून त्यांच्याकडे शिल्लक जमिनीच्या सातबाराची मागणी प्रशासनाकडे करतो आहे. आपल्या जमिनीचा सातबारा मिळवण्यासाठी तो १७ वर्षापासून प्रशासनाचे उंबरठे झिवजत आहे. गावातील पटवाऱ्याकडे त्याने सातबारा मागितला असता देण्यास नकार दिला. म्हणून त्याने उमरेडचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागितली. तेव्हा त्यांनी ताबा वहीवर नोंद नसल्याचे सांगून रिकाम्या हाताने परतवून लावले. त्यानंतर त्याने अप्पर आयुक्तांकडे दाद मागितली. त्यांनीही उपविभागीय अधिकाऱ्याचा आदेश कायम ठेवला. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे मंत्रालयात जाऊन महसूल विभागात आपली व्यथा सांगितली. महसूल विभागाने नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणाची शहनिशा न करता पुनर्मोजणीमध्ये जमीन गेल्याचा अहवाल देऊन महसूल विभागाचा आदेश फेटाळल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. ते परत जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध अप्पर आयुक्तालयात गेले. परंतु त्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला. प्रशासनाने न्यायच नाकारल्याने सागर मंदरे हतबल झाले आहे. घरी दोन मुले, वृद्ध वडील असा प्रपंच आहे. प्रशासनाच्या निर्णयाने आता जमीन मिळणार नाही, त्यामुळे तो हतबल झाला आहे. झालेले कर्ज फेडता येईल, या भावनेतून शरीराच्या अवयवाची विक्री करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर