शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

अर्ध्या एकरच्या सातबारासाठी शेतकऱ्याची फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 21:30 IST

हक्काच्या शेतीचा सातबारा मिळविण्यासाठी एक शेतकरी गेल्या १७ वर्षापासून प्रशासनाचे उंबरठे झिजवितो आहे. परंतु प्रशासकीय पेचात त्याचा सातबारा कुठे अडकलाय, याबाबत कुणीही त्याचे समाधान करू शकले नाही. हक्काच्या शेतीसाठी उंबरठे झिजविताना तो हतबल झाला आहे. त्याच्यावर झालेल्या कर्जामुळे ते फेडण्यासाठी स्वत:चे अवयव विकण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाच्या चकरा मारून हतबल : कर्ज फेडण्यासाठी अवयव विकण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हक्काच्या शेतीचा सातबारा मिळविण्यासाठी एक शेतकरी गेल्या १७ वर्षापासून प्रशासनाचे उंबरठे झिजवितो आहे. परंतु प्रशासकीय पेचात त्याचा सातबारा कुठे अडकलाय, याबाबत कुणीही त्याचे समाधान करू शकले नाही. हक्काच्या शेतीसाठी उंबरठे झिजविताना तो हतबल झाला आहे. त्याच्यावर झालेल्या कर्जामुळे ते फेडण्यासाठी स्वत:चे अवयव विकण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.या पीडित शेतकऱ्याचे नाव सागर मंदरे आहे. उमरेड तालुक्यातील मकरधोकडा येथील रहिवासी आहे. त्याची वडिलोपार्जित ७ एकर जमीन होती. आर्थिक परिस्थिती बरी नसल्यामुळे वडिलांनी सन १९८९ साली ८५ आर, १९९४ साली ९७ आर आणि १९९५ साली ८१ आर जमीन विकली. शेवटी त्यांच्या जवळ २० आर जमीन शिल्लक राहिली. सागर मंदरे १९९६ पासून त्यांच्याकडे शिल्लक जमिनीच्या सातबाराची मागणी प्रशासनाकडे करतो आहे. आपल्या जमिनीचा सातबारा मिळवण्यासाठी तो १७ वर्षापासून प्रशासनाचे उंबरठे झिवजत आहे. गावातील पटवाऱ्याकडे त्याने सातबारा मागितला असता देण्यास नकार दिला. म्हणून त्याने उमरेडचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागितली. तेव्हा त्यांनी ताबा वहीवर नोंद नसल्याचे सांगून रिकाम्या हाताने परतवून लावले. त्यानंतर त्याने अप्पर आयुक्तांकडे दाद मागितली. त्यांनीही उपविभागीय अधिकाऱ्याचा आदेश कायम ठेवला. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे मंत्रालयात जाऊन महसूल विभागात आपली व्यथा सांगितली. महसूल विभागाने नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणाची शहनिशा न करता पुनर्मोजणीमध्ये जमीन गेल्याचा अहवाल देऊन महसूल विभागाचा आदेश फेटाळल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. ते परत जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध अप्पर आयुक्तालयात गेले. परंतु त्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला. प्रशासनाने न्यायच नाकारल्याने सागर मंदरे हतबल झाले आहे. घरी दोन मुले, वृद्ध वडील असा प्रपंच आहे. प्रशासनाच्या निर्णयाने आता जमीन मिळणार नाही, त्यामुळे तो हतबल झाला आहे. झालेले कर्ज फेडता येईल, या भावनेतून शरीराच्या अवयवाची विक्री करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर