शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या ही शरमेची बाब, कृषीक्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूदीमध्ये वाढ हवी - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 19:43 IST

स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाली असली तरी आतापर्यंत राज्यकर्त्यांनी कधीच कृषीक्षेत्राला केंद्रस्थानी ठेवून धोरणे तयार केली नाहीत. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या होत आहेत. ही देशासाठी शरमेची बाब आहे. सर्व पक्षांनी देशावर राज्य केले.

नागपूर : स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाली असली तरी आतापर्यंत राज्यकर्त्यांनी कधीच कृषीक्षेत्राला केंद्रस्थानी ठेवून धोरणे तयार केली नाहीत. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या होत आहेत. ही देशासाठी शरमेची बाब आहे. सर्व पक्षांनी देशावर राज्य केले. शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर एकमेकांवर दोषारोपण झाले तर ते शेतक-यांसाठीच नुकसानदायक ठरेल, असे परखड मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. शुक्रवारी अ‍ॅग्रोव्हिजन या कृषी प्रदर्शनीचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.रेशीमबाग मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर प्रामुख्याने उपस्थित होते. मी स्वत: शेतकरी आहे व शेतक-यांच्या समस्या मला चांगल्या पद्धतीने माहिती आहेत.  राज्यकर्ते, राजकीय पक्ष तसेच समाजातील विविघ घटकांनी स्वातंत्र्यानंतर कृषीवर हवे तसे लक्ष केंद्रीतच केले नाही. शेतक-यांवर विविध बंधने आहेत. ती हटविणे आवश्यक आहे. सर्व पातळीतून शेतक-यांच्या विकासासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. अन्यथा शेतक-यांची मुले शेतीपासून दूर होतील. शेतकºयांमधील नकारात्मक भावना दूर करण्याची आवश्यकता आहे. देशातील ५२ टक्के रोजगार हे कृषीवर आधारित आहे. त्यामुळे केंद्र शासनानेदेखील कृषीक्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढविली पाहिजे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी केले.२०१४ च्या अगोदर देशाचा कृषी विकास दर उणे होता. मात्र आम्ही सत्ते आल्यानंतर सिंचनाला प्राधान्य दिले. विविध प्रयत्नांमुळे कृषी विकास दर १२.५ टक्क्यांवर पोहोचला. शेतक-यांना आता अ‍ॅग्रो सोलर फीडर योजनेमुळे ३६५ दिवस वीज उपलब्ध होऊ शकणार आहे. वातावरणातील बदल लक्षात घेता शाश्वत शेतीवर भर देण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. देशात ६ हजार कोटींची जलसंधारण मोहिमयावेळी नितीन गडकरी यांनी जलसंधारणाच्या क्षेत्रातील विविध कार्यक्रमांबाबत माहिती दिली. जलसंवर्धानाच्या क्षेत्रात संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राने सर्वात चांगले काम केले आहे. जागतिक बँकेच्या सहकार्यातून जलसंधारणासाठी ६ हजार कोटींची मोहिम देशभरात राबविण्यात येणार आहे. यात राज्यातील यशस्वी कार्यक्रमांचादेखील समावेश होईल. शिवाय २०१९ पर्यंत महाराष्ट्राचे जलसिंचनक्षेत्र २२ टक्क्यांहून ४० टक्क्यांवर नेऊ, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :nagpurनागपूर