शेतकऱ्यांनी माेहरीचे लागवड क्षेत्र वाढवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST2021-02-15T04:08:11+5:302021-02-15T04:08:11+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : वन्यप्राणी माेहरीच्या पिकाचे इतर पिकांच्या तुलनेत कमी नुकसान करते. शेतकऱ्यांनी गट तयार करून माेहरीच्या ...

शेतकऱ्यांनी माेहरीचे लागवड क्षेत्र वाढवावे
लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : वन्यप्राणी माेहरीच्या पिकाचे इतर पिकांच्या तुलनेत कमी नुकसान करते. शेतकऱ्यांनी गट तयार करून माेहरीच्या पिकाचे लागवड क्षेत्र वाढविल्यास शेतमाल बाजारपेठेचा प्रश्न सुटू शकताे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढीलवर्षी माेठ्या प्रमाणात माेहरीची पेरणी करावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भाेसले यांनी अंबाेला (ता. नरखेड) येथे माेहरी शेतीदिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमात केले.
लक्ष्मण महल्ले (रा. अंबाेला) यांनी त्यांच्या शेतात माेहरीची पेरणी केली आहे. त्यामुळे अखील भारतीय समन्वित जवस व माेहरी संशाेधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, नागपूर यांच्यावतीने लक्ष्मण महल्ले यांच्या शेतात माेहरी शेतीदिन व पीक पाहणी कार्यक्रमाचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कृषी महाविद्यालयाचे प्रभारी सहयाेगी अधिष्ठाता डाॅ. अरुण इंगाेले, डाॅ. बिना नायर, माेहरी कृषीविद्यवेत्ता डाॅ. स्वप्निल ठाकरे उपस्थित हाेते.
डाॅ. बिना नायर यांनी शेतकऱ्यांना जवस व माेहरीच्या तेलाचे मानवी आहारातील महत्त्व समजावून सांगत जवसाच्या वाणाबाबत मार्गदर्शन केले. माेहरी पैदासवार डाॅ. संदीप कामडी यांनी प्रास्ताविकातून माेहरीच्या पिकाला विदर्भातील वातावरण उपयुक्त असल्याचे सांगत माेहरी हे कमी खर्चाचे व अधिक उत्पादन देणारे पीक असल्याचे सांगितले. शिवाय, माेहरीचे विविध वाण व बाजारपेठ याबाबत माहिती दिली. डाॅ. स्वप्निल ठाकरे यांनी माेहरीचे लागवड तंत्रज्ञान, शरद भुरे यांनी माेहरीच्या पिकावरील राेग व कीड तसेच त्यांचे नियंत्रणाबाबत माहिती दिली. पंकज महल्ले यांनी माेहरीचे एकरी १० क्विंटल उत्पादन कसे घ्यायचे, ते प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले. कार्यक्रमाला स्थानिक व परिसरातील गावांमधील शेतकरी उपस्थित हाेते.