शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

शेतकऱ्यांनी बांबू शेतीतून मिळवावी समृद्धी : ६०० रोपट्यांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 20:15 IST

देशभरात बांबूच्या १५० प्रजाती आहेत आणि मोठ्या संख्येत शेतकरी बांबू लागवडीकडे वळले आहेत. अ‍ॅग्रो फॉरेस्ट्री वृक्षारोपण हा शेतीचा नवा ट्रेंड आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या ३० टक्के भागावर तरी बांबू लागवड करावी व समृद्धी प्राप्त करावी, असे आवाहन तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे कृषी महाविद्यालयाचा बांबू महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशभरात बांबूच्या १५० प्रजाती आहेत आणि मोठ्या संख्येत शेतकरी बांबू लागवडीकडे वळले आहेत. अ‍ॅग्रो फॉरेस्ट्री वृक्षारोपण हा शेतीचा नवा ट्रेंड आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या ३० टक्के भागावर तरी बांबू लागवड करावी व समृद्धी प्राप्त करावी, असे आवाहन तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांनीच नाही तर बेरोजगार तरुणांनी बांबू शेतीतून रोजगार प्राप्त करावा, असेही मत व्यक्त करण्यात आले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय, नागपूरच्या वतीने जागतिक बांबू दिनानिमित्त तीन दिवसाच्या बांबू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात वेगवेगळ्या उपक्रमातून शेतकऱ्यांना बांबू शेतीबाबत उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना बांबूच्या ६०० रोपट्यांचे वितरण करण्यात आले.कृषी महाविद्यालयाच्या एआयसीआरपी येथे आयोजित हा महोत्सव सोशल फॉरेस्ट्री सर्कल, सोशल फॉरेस्ट्री डिव्हिजन, नागपूर आणि एआयसीआरपी, पीडीकेव्ही कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चर यांच्या वतीने करण्यात आला. कॉलेजचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. डी.एम. पंचभाई, वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, उपवनसंरक्षक गीता नन्नावरे, वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. व्ही.एम. इलोरकर, कृषी महाविद्यालय, अकोलाचे संशोधन संचालक डॉ. व्ही.के. कचारे, केंद्रीय कृषी वन संशोधन संस्था, झांशीचे प्रकल्प संचालक डॉ. आर.के. तिवारी आणि वेगवेगळ्या भागातून आलेले शेतकरी उपस्थित होते. क्रॉफ्ट इंडस्ट्रीपासून बांधकाम क्षेत्रापर्यंत असलेले बांबूचे महत्त्व यावेळी तज्ज्ञांनी समजावून सांगितले. बांबू लागवडीबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. तीन दिवस हा महोत्सव चालला आणि या तीन दिवसात देशभरातील तज्ज्ञांनी विद्यार्थी व शेतकºयांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर