शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

महानगरातील शेतकऱ्यांनाही मिळणार जमिनीचा पाचपट मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 21:06 IST

महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित महानगर क्षेत्रातील जमिनीचा पाचपट मोबदला मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी राज्य शासनाने पूर्ण केली आहे. यासंदर्भात २४ नोव्हेंबर २०१७ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. परिणामी, हिंगणा तालुक्यातील ४१ शेतकऱ्यांची या मागणीविषयीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाली काढली आहे.

ठळक मुद्देसमृद्धी महामार्गासाठी संपादन : हायकोर्टातील याचिका निकाली

आॅनलाईन लोकमतनागपूर : महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित महानगर क्षेत्रातील जमिनीचा पाचपट मोबदला मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी राज्य शासनाने पूर्ण केली आहे. यासंदर्भात २४ नोव्हेंबर २०१७ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. परिणामी, हिंगणा तालुक्यातील ४१ शेतकऱ्यांची या मागणीविषयीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाली काढली आहे.१९९९ मध्ये हिंगणा तालुक्याला महानगर क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. शासनाने २६ मे २०१५ रोजी अधिसूचना जारी करून महानगर क्षेत्रातील कृषी जमिनीकरिता १ गुणांक घोषित केला होता. त्यामुळे हिंगणा तालुक्यातील जमिनीला केवळ अडीचपट मोबदला देय असल्याचे शासनाचे म्हणणे होते. त्यावर याचिकाकर्त्या शेतकऱ्यांचा आक्षेप होता. ग्रामीण भागातील जमिनीप्रमाणे पाचपट मोबदला मिळावा अशी त्यांची मागणी होती. शासन तांत्रिक कारणावरून मोबदल्यात भेदभाव करू शकत नाही असा दावा त्यांनी केला होता. ही याचिका प्रलंबित असतानाच शासनाने शेतकऱ्यांची मागणी पूर्ण केली. याचिकाकर्त्यांमध्ये हिंगणा तालुक्यातील सुकळी, वायफळ, पिपळधरा, दाताळा, सालई दाभा, बोरगाव रिठी, हळदगाव इत्यादी गावांतील शेतकऱ्यांचा समावेश होता. दहा जिल्ह्यांतून जात असलेल्या समृद्धी महामार्गाकरिता सरळ खरेदी पद्धतीने भूसंपादन केले जात आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. प्रदीप क्षीरसागर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग