शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

इथेही शेतकऱ्याची लुबाडणूक; ग्राहक मागेल त्या भावाला भाजी दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 10:48 IST

महानगरपालिकेने बुधवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात भाजीबाजार भरवून शेतकऱ्यांना तिथे विक्री करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र बहुतेक शेतकऱ्यांनी यापूर्वी अशा पद्धतीने कधीच भाजी विकलेली नाही. परिणामत: त्यांना बरेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

ठळक मुद्देथेट विक्रीच्या आदेशाचा शेतकऱ्यांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिकेने बुधवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात भाजीबाजार भरवून शेतकऱ्यांना तिथे विक्री करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र बहुतेक शेतकऱ्यांनी यापूर्वी अशा पद्धतीने कधीच भाजी विकलेली नाही. या संदर्भात त्यांना अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शनही मिळाले नाही. त्यामुळे ग्राहक मागेल त्या भावात भाजी विकून शेतकरी मोकळे झाले. परिणामत: त्यांना बरेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले.सकाळच्या सुमारास फुले मार्केट, कॉटन मार्केटमधील भाजीबाजार एका तासासाठी सुरू ठेवण्यात आला होता. मात्र त्यानंतर तो बंद करण्यात आला. ताजी भाजी न मिळाल्याने या परिसरातील नागरिक नाराज झाले. दुसरीकडे कळमना बाजार सुरू होता. मात्र ग्राहकच नसल्याने तो बंद करावा लागला. महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रयोग केला असला तरी, तो अयशस्वी ठरला. याचा परिणाम शेतकऱ्यांवर झाला. त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बाजारात आणलेली भाजी परत नेऊनही खराबच होणार असल्याने ग्राहक मागतील त्या भावाने अनेक शेतकºयांना विक्री करावी लागली.महात्मा फुले भाजी बाजार अडते (दलाल) असोसिएशनचे सचिव राम महाजन यांच्या मते, शहरातील विविध भागांमध्ये भाजीबाजार सुरू केल्याने जुना बाजार बंद करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. ही व्यवस्था सुरू करताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, त्यांच्या मेहनतीचे योग्य दाम मिळावे यासाठी शेतकऱ्यांचीही बाजू ऐकून घ्यायला हवी होती. शहरातील सर्व मुख्य भाजीबाजार, उपबाजारसुद्धा सुरू ठेवले तर नागरिकांना ताजा भाजीपाला योग्य दरात मिळू शकेल. वाढणारी गर्दीही नियंत्रित करता येऊ शकेल. त्यामुळे शहरातील सर्व भाजी बाजार सुरू करावेत, अश्ी मागणी महात्मा फुले भाजी बाजार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना दिवसभर विक्रीची सवय नाहीराम महाजन म्हणाले, शेतकरी शेतातील भाजीपाला दलालांना विकतात, दलाल दिवसभर बसून चिल्लर विक्रेत्यांना विकतात तसेच दिवसभर विक्री करतात. शेतकऱ्यांना ही सवय नाही. त्यांच्याकडे यासाठी वेळही नाही. यामुळेच शेतकऱ्यांना बराच त्रास सहन क रावा लागला.

 

टॅग्स :Farmerशेतकरी