शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दोन कोटींचा विमा लाभ!

By admin | Updated: July 12, 2014 02:25 IST

नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना सुरक्षा कवच प्रदान करून, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी राज्यभरात राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविली जात आहे.

नागपूर : नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना सुरक्षा कवच प्रदान करून, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी राज्यभरात राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविली जात आहे. यात गतवर्षी जिल्ह्यातील १३ हजार ६५५ शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा उतरविला होता. त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे एकूण ९७ लाख ३७ हजार ५९५ रूपयांचा विमा हप्ता जमा केला होता. त्या मोबदल्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या ७ हजार ३०३ शेतकऱ्यांना २ कोटी ९१ लाख ९१ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे. यंदा जिल्ह्यात पुन्हा दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी आवाहन केले आहे. ही योजना नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण विभागातील भात, ज्वारी, भुईमुग, सोयाबीन, तीळ, मूग, उडीद, तूर व कापूस या पिकांसाठी लागू करण्यात आली आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पीक पेरणीपासून एक महिना किंवा ३१ जुलै २०१४ यापैकी आधी येत असलेल्या मुदतीच्या आत प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. यासाठी सुरुवातीला तलाठ्यांचा पेरणी दाखला ग्राह्य मानल्या जात होता. परंतु राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी अलीकडेच एक पत्र जारी करून, कृषी सहायकांचाही पेरणी दाखला पीक विम्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत. याचा शेतकऱ्यांना निश्चितच मोठा फायदा मिळणार आहे. अनेकदा तलाठी हा गावात भेटत नसल्याने, शेतकऱ्यांना मुदतीत पीक विम्याचा प्रस्ताव सादर करता येत नाही. परंतु आता शेतकऱ्यांना कृषी सहायकांकडूनसुद्धा तो दाखला घेता येणार आहे.याशिवाय नागपूर व वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन आणि कापूस पिकासाठी यंदा प्रथमच पथदर्शक स्वरूपात हवामान आधारित पीक विमा योजना राबविली जात आहे. मात्र या योजनेत सहभागी होण्यासाठी गत ३० जून २०१४ ही अंतिम मुदत जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे या योजनेत सहभागी होऊ न शकलेल्या शेतकऱ्यांना या ‘राष्ट्रीय पीक विमा योजने’चा लाभ घेता येणार आहे. (प्रतिनिधी)