शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
3
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
4
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
5
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
6
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
7
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
8
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
9
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
10
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
11
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
12
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
13
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
14
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
15
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
16
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
17
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
18
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
19
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
20
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक

शेतकऱ्यांना दोन कोटींचा विमा लाभ!

By admin | Updated: July 12, 2014 02:25 IST

नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना सुरक्षा कवच प्रदान करून, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी राज्यभरात राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविली जात आहे.

नागपूर : नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना सुरक्षा कवच प्रदान करून, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी राज्यभरात राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविली जात आहे. यात गतवर्षी जिल्ह्यातील १३ हजार ६५५ शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा उतरविला होता. त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे एकूण ९७ लाख ३७ हजार ५९५ रूपयांचा विमा हप्ता जमा केला होता. त्या मोबदल्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या ७ हजार ३०३ शेतकऱ्यांना २ कोटी ९१ लाख ९१ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे. यंदा जिल्ह्यात पुन्हा दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी आवाहन केले आहे. ही योजना नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण विभागातील भात, ज्वारी, भुईमुग, सोयाबीन, तीळ, मूग, उडीद, तूर व कापूस या पिकांसाठी लागू करण्यात आली आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पीक पेरणीपासून एक महिना किंवा ३१ जुलै २०१४ यापैकी आधी येत असलेल्या मुदतीच्या आत प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. यासाठी सुरुवातीला तलाठ्यांचा पेरणी दाखला ग्राह्य मानल्या जात होता. परंतु राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी अलीकडेच एक पत्र जारी करून, कृषी सहायकांचाही पेरणी दाखला पीक विम्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत. याचा शेतकऱ्यांना निश्चितच मोठा फायदा मिळणार आहे. अनेकदा तलाठी हा गावात भेटत नसल्याने, शेतकऱ्यांना मुदतीत पीक विम्याचा प्रस्ताव सादर करता येत नाही. परंतु आता शेतकऱ्यांना कृषी सहायकांकडूनसुद्धा तो दाखला घेता येणार आहे.याशिवाय नागपूर व वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन आणि कापूस पिकासाठी यंदा प्रथमच पथदर्शक स्वरूपात हवामान आधारित पीक विमा योजना राबविली जात आहे. मात्र या योजनेत सहभागी होण्यासाठी गत ३० जून २०१४ ही अंतिम मुदत जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे या योजनेत सहभागी होऊ न शकलेल्या शेतकऱ्यांना या ‘राष्ट्रीय पीक विमा योजने’चा लाभ घेता येणार आहे. (प्रतिनिधी)