शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

नागपूर जिल्ह्यातील पिकविम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 23:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात ४५ हजार शेतकऱ्यांनी विमा करवून घेतला. नुकसान भरपाई देण्याची वेळ आली, तेव्हा कृषी विभाग नियमांवर बोट ठेवून, शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवत आहे.अवकाळीपासून, गारपीट, दुष्काळ, कीड, रोग यापासून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारने पंतप्रधान पिक विमा योजना राबविली. पिक विमा काढताना शासन ...

ठळक मुद्देविमा कंपनी आणि कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात ४५ हजार शेतकऱ्यांनी विमा करवून घेतला. नुकसान भरपाई देण्याची वेळ आली, तेव्हा कृषी विभाग नियमांवर बोट ठेवून, शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवत आहे.अवकाळीपासून, गारपीट, दुष्काळ, कीड, रोग यापासून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारने पंतप्रधान पिक विमा योजना राबविली. पिक विमा काढताना शासन निर्णय १७ नोव्हेंबर २०१७ नुसार ज्या नियम आणि अटी ठेवण्यात आल्या होता. त्या नियम अटीकडे नुकसान भरपाई देताना शासनाने दूर्लक्ष केले. शेतकऱ्यांना नुकसान भरपायी देण्यासाठी कृषी विभागाकडून वेगळाच शासन आदेश दाखविण्यात येत आहे. या नव्या आदेशामुळे शेतकरी लाभापासून वंचित राहणार असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.यावर्षी झालेला अपुरा पाऊस आणि पिकांवर आलेल्या रोगामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकºयांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पिक विमा काढण्यास सांगितले होते. त्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धीही करण्यात आली. विमा योजनेची प्रसिद्धी करताना, शासन निर्णयानुसार दुष्काळ, कीड, भूस्खलन, पूर, चक्रीवादळ, पाण्याअभावी नुकसान झाल्यास विमा रक्कम मिळणार असल्याचे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. ४५ हजार शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरला. यातून कोट्यावधी रुपये विमा कंपनीकडे जमा झाले. परंतु पिकांवर आलेली कीड आणि अपुऱ्या पावसामुळे यावर्षी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी विम्याच्या रकमेसाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज केले. नियमानुसार मदतीसाठी कृषी, महसूल आणि विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करणे आवश्यक होते. मात्र सर्वेक्षणच झाले नाही. यासंदर्भात डीपीसीच्या बैठकीत जि.प. सदस्य शिवकुमार यादव यांनी हा मुद्दा पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक मिलिंद शेंडे यांनी नियमावर बोट ठेवत विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे सांगितले. यासाठी शासनाच्या आदेशाचे कारण पुढे करण्यात आले. अधिकाऱ्यांकडून विमा कंपन्यांची पाठराखण का?शासनाचा जीआरमध्ये स्पष्ट उल्लेख असतानाही, कृषी अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. कृषी अधिकाऱ्यांची ही भूमिका शेतकऱ्यांचे नुकसान व विमा कंपन्याना लाभ मिळवून देणारी आहे. अधिकाऱ्यांकडून विमा कंपन्यांची पाठराखण करण्यामागचे कारण संशय निर्माण करणारे आहे.शिवकुमार यादव, सदस्य, जि.प.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर