शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

महिला बचत गटांचा फराळ प्रशासनाच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 17:45 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने ग्रामीण भागातील घरगुती महिलांनी तयार केलेला रुचकर फराळ सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचविला आहे.

ठळक मुद्देजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा पुढाकार साहित्य विक्रीतून महिलांच्या आर्थिक विकासाला हातभार

नागपूर : ग्रामीण भागातील महिला बचत गटांची दिवाळी गोड व्हावी, बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या साहित्यांची विक्री करून महिलांच्या आर्थिक विकासात हातभार लावावा, या उद्देशाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने बचत गटांच्या महिलांचा ‘फराळ प्रशासनाच्या दारी’ हा उपक्रम राबविला आहे.

शहरात सरकारी कर्मचाऱ्यांचा जास्तीत जास्त वावर असलेल्या सिव्हील लाईन्स परिसरात महिला बचत गटांनी तयार केलेल्या दिवाळी फराळाचे स्टॉल लावण्यात येणार आहे. बचत गटांच्या साहित्याची जास्तीत जास्त विक्री व्हावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांपासून सामान्य प्रशासनकडे सुद्धा कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यासंदर्भात विनंती केली आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटांची चळवळ व्यापक व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रम राबविले जातात. अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी म्हणून प्रयत्न केले जातात. दिवाळीच्या काळात नोकरीपेशा महिलांना दिवाळीच्या तयारीला फार कमी वेळ मिळतो. त्या दिवाळीचा फराळ असो की साहित्य बाजारातूनच खरेदी करतात. त्यामुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने ग्रामीण भागातील घरगुती महिलांनी तयार केलेला रुचकर फराळ सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचविला आहे. प्रशासकीय इमारत क्रमांक २ समोर महिला बचत गटांचे स्टॉल लागणार आहे. येथे दिवाळीच्या फराळासह रांगोळ्या, पणत्याही उपलब्ध राहणार आहे.

- उद्योग आणि बँकिंग क्षेत्रालाही आवाहन

दिवाळीनिमित्त उद्योग क्षेत्रात आणि बँकिंग क्षेत्रात भेटवस्तू, सुकामेवा आणि फराळाच्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. या भेटवस्तू आणि साहित्य महिला बचत गटांकडून खरेदी करून या महिलांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना आत्मनिर्भर होण्यास मदत मिळेल, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी उद्योग आणि बँकिंग क्षेत्राला केले आहे.

शहरात प्रशासकीय इमारत क्रमांक २ समोर व तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये स्टॉल लावण्यात येणार आहे. बचत गटांनी तयार केलेल्या फराळाच्या विक्रीसाठी सर्व शासकीय कार्यालयांना पत्र देऊन महोत्सवाला भेट देऊन खरेदीसाठी आवाहन करणार आहोत. जेणे करून महिलांना त्यांची चांगली विक्री व्हावी हा आमचा उद्देश आहे.

- विवेक इलमे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

टॅग्स :GovernmentसरकारWomenमहिला