शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
5
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
6
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
7
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
8
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
9
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
10
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
11
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
12
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
13
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
14
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
15
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
16
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
17
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
18
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
19
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
20
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध साहित्यिक अनिल नितनवरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 20:05 IST

मराठीचे गाढे अभ्यासक, साहित्यिक, कवी, प्रयोगशील एकांकिकाकार तथा समीक्षक प्रा.अनिल नितनवरे (५३) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुपारी १ वाजताच्या सुमारास निधन झाले.

ठळक मुद्देवर्गातच आला हृदयविकाराचा झटका मराठीचा अभ्यासक हरविलासाहित्यवर्तुळात शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठीचे गाढे अभ्यासक, साहित्यिक, कवी, प्रयोगशील एकांकिकाकार तथा समीक्षक  डॉ. अनिल नितनवरे (५३) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुपारी १ वाजताच्या सुमारास निधन झाले. साकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयात ते मराठीचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. ज्या मराठी भाषेसाठी त्यांनी स्वत:ला समर्पित केले होते, त्याचेच अध्यापन कार्य करत वर्गखोलीतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या अचानक निघून जाणे साहित्याप्रमाणे सामाजिक वर्तुळालादेखील चटका लावून गेले आहे.प्रा. नितनवरे हे दैनंदिनीप्रमाणे मंगळवारी महाविद्यालयात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ते वर्गात गेले. काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. त्यांच्यामागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी , तीन बहिणी, भाऊ आहेत. त्यांच्या पार्थिवावर बुधवारला दुपारी १२ वाजता नागपूर येथे जयताळा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.मूळचे नागपूर जिल्ह्यातील असलेले नितनवरे सुरुवातीपासूनच मराठीसाठी समर्पित होते. १९८५ साली माध्यमिक शालांत परीक्षेत कला शाखेतून ते गुणवत्ता यादीत आले होते व मराठी विषयात तर ते विदर्भातून प्रथम होते. त्यांनी १९९० मध्ये नागपूर विद्यापीठातून एम.ए. मराठीची पदवी घेतली. त्यावेळी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानिमित्त त्यांना कै. ना.के. बेहेरे सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले होते. १९८९ पासून ते ‘समुचित’ या त्रैमासिकाचे सहसंपादक होते.महाराष्ट्रातील दर्जेदार नियतकालिकात त्यांचे ललित, वैचारिक आणि समीक्षापर लेखन प्रकाशित झाले. अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संसद कवितानिल चळवळ यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९९१ पासून ते मराठी विषयाचे अध्यापन करीत होते. धम्मराष्ट्राची घटना हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. नामांतर आंदोलन, कळा अभंगाची, आंबेडकरवादी विचारकविता, नामांतर : स्वप्न आणि सत्य ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध नियतकालिकांमधून त्यांची कविता, समीक्षा, लेख प्रकाशित होत. विविध समकालीन साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. हळवे व्यक्तिमत्त्व असलेले नितनवरे हे विद्यार्थ्यांमध्येदेखील लोकप्रिय होते.

टॅग्स :literatureसाहित्यDeathमृत्यू