शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कौटुंबिक कलह वाढताहेत, नागपुरात वर्षाला सव्वातीन हजार तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 14:23 IST

जगामध्ये भारतीय विवाह संस्था सर्वात बळकट मानली जाते, पण येणारा काळ ही ओळख पुसून टाकेल, अशी परिस्थिती तयार होत आहे. कुटुंब न्यायालयात दरवर्षी दाखल होणाऱ्या प्रकरणांची आकडेवारी भारतीय विवाह संस्थेचे आरोग्य बिघडल्याचे स्पष्ट करीत आहे. एकट्या नागपूर कुटुंब न्यायालयाचे उदाहरण घेतल्यास, येथे दरवर्षी कौटुंबिक कलहाच्या सरासरी सव्वातीन हजारावर तक्रारी (प्रकरणे) दाखल होत आहेत.

ठळक मुद्देविवाह संस्थेचे आरोग्य बिघडलेदाम्पत्यांमधील हेवेदावे कारणीभूतदहा वर्षात ३३ हजार ५६६ प्रकरणे दाखल

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगामध्ये भारतीय विवाह संस्था सर्वात बळकट मानली जाते, पण येणारा काळ ही ओळख पुसून टाकेल, अशी परिस्थिती तयार होत आहे. कुटुंब न्यायालयात दरवर्षी दाखल होणाऱ्या प्रकरणांची आकडेवारी भारतीय विवाह संस्थेचे आरोग्य बिघडल्याचे स्पष्ट करीत आहे. एकट्या नागपूर कुटुंब न्यायालयाचे उदाहरण घेतल्यास, येथे दरवर्षी कौटुंबिक कलहाच्या सरासरी सव्वातीन हजारावर तक्रारी (प्रकरणे) दाखल होत आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर कुटुंब न्यायालयात २००८ ते २०१७ या १० वर्षांत एकूण ३३ हजार ५६६ (दरवर्षी सरासरी ३,३५६) प्रकरणे दाखल झाली होती. यावर्षी मार्चपर्यंत १०५२ प्रकरणे दाखल झाली. ती संख्या आता निश्चितच वाढली आहे. त्यावरून विवाह संस्थेला तडे जात असल्याचे सिद्ध होते.ही आहेत कारणेयामागे विविध कारणे असून त्यासंदर्भात नागपूर कुटुंब न्यायालय विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. श्याम अंभोरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वकिली व्यवसायातील अनुभवावरून अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. स्वत:बद्दचा अहंकार, एकमेकांना कमी लेखणे, जोडीदाराने आपल्या मनासारखे वागावे असा आग्रह धरणे, एकमेकांच्या कामात हस्तक्षेप, सहनशीलतेचा अभाव, विभक्त कुटुंब पद्धती, एकमेकांना पुरेसा वेळ देण्यास टाळाटाळ, विवाहबाह्य संबंध, शारीरिक व मानसिक छळ, एकमेकांच्या नातेवाईकांचा अनादर करणे इत्यादी अनेक कारणांमुळे विवाह संस्थेला तडे जात असल्याचे त्यांनी सांगितले.भांडणामुळे एका छताखाली राहणे अशक्य झाल्यानंतर पती-पत्नी, घटस्फोट, पोटगी, अपत्यांचा ताबा, राहायला घर मिळणे, स्त्रीधन परत मिळणे, मालमत्ता विक्रीवर मनाईहुकूम मिळविणे यासह अन्य विविध वैवाहिक अधिकार मिळविण्यासाठी कुटुंब न्यायालयात धाव घेतात.पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे पती-पत्नीमधील वाद, संबंध कायमचे तोडण्यापर्यंतच्या विकोपाला जात नव्हता. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी मध्यस्थी करून भांडणाऱ्या  पती-पत्नीमध्ये मेळ घडवून आणत होते. आज तशी परिस्थिती नाही. त्यामुळे पती-पत्नी एकमेकांना समजून घेण्यात कमी पडल्यास त्याचा थेट परिणाम विवाहावर होतो व त्यांचे वैवाहिक संबंध कायमचे संपुष्टात येतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

वर्ष    प्रकरण संख्या२००८    २५२४२००९    ३६२९२०१०    २५६०२०११    २६७४२०१२    ३३००२०१३    ३६८२२०१४    ३८८१२०१५    ३६५५२०१६    ३७९८२०१७    ३८६३ 
  
  

 

टॅग्स :FamilyपरिवारCourtन्यायालय