शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

कौटुंबिक कलह वाढताहेत, नागपुरात वर्षाला सव्वातीन हजार तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 14:23 IST

जगामध्ये भारतीय विवाह संस्था सर्वात बळकट मानली जाते, पण येणारा काळ ही ओळख पुसून टाकेल, अशी परिस्थिती तयार होत आहे. कुटुंब न्यायालयात दरवर्षी दाखल होणाऱ्या प्रकरणांची आकडेवारी भारतीय विवाह संस्थेचे आरोग्य बिघडल्याचे स्पष्ट करीत आहे. एकट्या नागपूर कुटुंब न्यायालयाचे उदाहरण घेतल्यास, येथे दरवर्षी कौटुंबिक कलहाच्या सरासरी सव्वातीन हजारावर तक्रारी (प्रकरणे) दाखल होत आहेत.

ठळक मुद्देविवाह संस्थेचे आरोग्य बिघडलेदाम्पत्यांमधील हेवेदावे कारणीभूतदहा वर्षात ३३ हजार ५६६ प्रकरणे दाखल

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगामध्ये भारतीय विवाह संस्था सर्वात बळकट मानली जाते, पण येणारा काळ ही ओळख पुसून टाकेल, अशी परिस्थिती तयार होत आहे. कुटुंब न्यायालयात दरवर्षी दाखल होणाऱ्या प्रकरणांची आकडेवारी भारतीय विवाह संस्थेचे आरोग्य बिघडल्याचे स्पष्ट करीत आहे. एकट्या नागपूर कुटुंब न्यायालयाचे उदाहरण घेतल्यास, येथे दरवर्षी कौटुंबिक कलहाच्या सरासरी सव्वातीन हजारावर तक्रारी (प्रकरणे) दाखल होत आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर कुटुंब न्यायालयात २००८ ते २०१७ या १० वर्षांत एकूण ३३ हजार ५६६ (दरवर्षी सरासरी ३,३५६) प्रकरणे दाखल झाली होती. यावर्षी मार्चपर्यंत १०५२ प्रकरणे दाखल झाली. ती संख्या आता निश्चितच वाढली आहे. त्यावरून विवाह संस्थेला तडे जात असल्याचे सिद्ध होते.ही आहेत कारणेयामागे विविध कारणे असून त्यासंदर्भात नागपूर कुटुंब न्यायालय विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. श्याम अंभोरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वकिली व्यवसायातील अनुभवावरून अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. स्वत:बद्दचा अहंकार, एकमेकांना कमी लेखणे, जोडीदाराने आपल्या मनासारखे वागावे असा आग्रह धरणे, एकमेकांच्या कामात हस्तक्षेप, सहनशीलतेचा अभाव, विभक्त कुटुंब पद्धती, एकमेकांना पुरेसा वेळ देण्यास टाळाटाळ, विवाहबाह्य संबंध, शारीरिक व मानसिक छळ, एकमेकांच्या नातेवाईकांचा अनादर करणे इत्यादी अनेक कारणांमुळे विवाह संस्थेला तडे जात असल्याचे त्यांनी सांगितले.भांडणामुळे एका छताखाली राहणे अशक्य झाल्यानंतर पती-पत्नी, घटस्फोट, पोटगी, अपत्यांचा ताबा, राहायला घर मिळणे, स्त्रीधन परत मिळणे, मालमत्ता विक्रीवर मनाईहुकूम मिळविणे यासह अन्य विविध वैवाहिक अधिकार मिळविण्यासाठी कुटुंब न्यायालयात धाव घेतात.पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे पती-पत्नीमधील वाद, संबंध कायमचे तोडण्यापर्यंतच्या विकोपाला जात नव्हता. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी मध्यस्थी करून भांडणाऱ्या  पती-पत्नीमध्ये मेळ घडवून आणत होते. आज तशी परिस्थिती नाही. त्यामुळे पती-पत्नी एकमेकांना समजून घेण्यात कमी पडल्यास त्याचा थेट परिणाम विवाहावर होतो व त्यांचे वैवाहिक संबंध कायमचे संपुष्टात येतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

वर्ष    प्रकरण संख्या२००८    २५२४२००९    ३६२९२०१०    २५६०२०११    २६७४२०१२    ३३००२०१३    ३६८२२०१४    ३८८१२०१५    ३६५५२०१६    ३७९८२०१७    ३८६३ 
  
  

 

टॅग्स :FamilyपरिवारCourtन्यायालय