शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कौटुंबिक कलह मुलांसाठी घातक : अनघा राजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 22:27 IST

कौटुंबिक कलह मुलांसाठी अतिशय घातक ठरतो. कौटुंबिक कलहामुळे मुले प्रेमापासून वंचित होतात. त्याचा मुलांच्या मानसिकता व गुणवत्तेवर परिणाम होतो, असे मानसोपचारतज्ज्ञ अनघा राजे यांनी ‘कौटुंबिक कलहाचा नात्यावर परिणाम’ विषयावरील चर्चासत्रात सांगितले.

ठळक मुद्देकुटुंब न्यायालयात चर्चासत्र

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कौटुंबिक कलह मुलांसाठी अतिशय घातक ठरतो. कौटुंबिक कलहामुळे मुले प्रेमापासून वंचित होतात. त्याचा मुलांच्या मानसिकता व गुणवत्तेवर परिणाम होतो, असे मानसोपचारतज्ज्ञ अनघा राजे यांनी ‘कौटुंबिक कलहाचा नात्यावर परिणाम’ विषयावरील चर्चासत्रात सांगितले.हे चर्चासत्र महाराष्ट्र राज्य कुटुंब न्यायालय समुपदेशक संघटना व कुटुंब न्यायालय वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कुटुंब न्यायालयात आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्रात राजे यांच्यासह सेवानिवृत्त न्यायाधीश भावना ठाकर, वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. श्याम आंभोरे, विवाह समुपदेशक लक्ष्मीकांत कामळजकर यांचा समावेश होता.संयुक्त कुटुंब पद्धती मोडित निघून विभक्त कुटुंब पद्धती वाढीस लागली आहे. विभक्त कुटुंबातील पती-पत्नी नोकरी करीत असल्यास मुलांकडे दुर्लक्ष होते. अन्य विविध कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करणे कठीण जाते. त्यामुळे कलह निर्माण होतो, असे मत ठाकर यांनी व्यक्त केले. कौटुंबिक कलहाचा व्यक्तीच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनावर परिणाम होतो, असे अ‍ॅड. आंभोरे यांनी तर, कौटुंबिक कलहामुळे नैराश्य, एकटेपणा व व्यसनाधीनता वाढते, असे कामळजकर यांनी सांगितले. याप्रसंगी प्रधान न्यायाधीश मंगला ठाकरे, न्या. विश्वास पाठक, न्या. प्रशांत अग्निहोत्री प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अ‍ॅड. रश्मी खापर्डे यांनी संचालन केले तर, विवाह समुपदेशक राजेंद्रकुमार कोतवाल यांनी आभार मानले.

टॅग्स :FamilyपरिवारCourtन्यायालय