शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

भरतीच्या बनावट मॅसेजने शेकडो तरुणांना फसविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 00:09 IST

भरतीचा बनावट मॅसेज वाचून राज्यातील विविध जिल्ह्यातून बुधवारी नागपूरला आलेल्या तरुणांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. एरिया रिक्रूटमेंट ऑफीस(एआरओ)कडून कोणत्याही भरतीची प्रक्रिया नसल्याची माहिती मिळाल्यानंतर उमेदवार निराश झाले.

ठळक मुद्देराज्यभरातून आले उमेदवार : अखेर पोलिसांना काढावी लागली समजूत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भरतीचा बनावट मॅसेज वाचून राज्यातील विविध जिल्ह्यातून बुधवारी नागपूरला आलेल्या तरुणांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. एरिया रिक्रूटमेंट ऑफीस(एआरओ)कडून कोणत्याही भरतीची प्रक्रिया नसल्याची माहिती मिळाल्यानंतर उमेदवार निराश झाले. त्यामुळे व्हॉटस्अप मॅसेज आल्यानंतर त्याची खातरजमा केली असती तर आपली फसवणूक झाली नसती, असे उमेदवारांना वाटले.सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, पुणे, जळगाव, भुसावळ आदी ठिकाणचे तरुण दुपारी २ पासून नागपुरात पोहोचणे सुरू झाले. विदर्भातूनही उमेदवार दाखल झाले. त्यामुळे एआरओ कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गर्दी झाली. तरुणांंना आतमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. प्रवेशद्वारावर जवान तरुणांंना भरती नसल्याचे सांगून घरी परत जाण्याचा सल्ला देत होते.‘लोकमत’शी बोलताना तरुणांंनी भरती असल्यामुळे अपेक्षेने आल्याचे सांगितले. अनेकजण उसणे पैसे घेऊन आले होते. येथे आल्यानंतर त्यांना फटका बसला. बनावट मॅसेज कुणी पसरविला, याचा तरुण शोध घेत आहेत. याबाबत पोलिसात तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांची संख्या अधिक असल्यामुळे पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांनी तरुणांंची समजूत घातली. यानंतर पुन्हा असा मॅसेज आल्यास खातरजमा करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला.नागपुरात नाही ‘टीए’विशेष म्हणजे टेरिटोरियल आर्मी (टीए) म्हणजे प्रादेशिक सेनेचे कार्यालय नागपुरातून स्थानांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यालयाच्या वतीने नागपुरात भरती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भरतीच्या वेळी सेनेकडून अधिकृतरीत्या माहिती देण्यात येते. त्यामुळे हा मॅसेज बनावट असल्याचे सिद्ध झाले.राहणार कुठे ?भरती नसल्याचे समजल्यानंतर तरुणांना रात्र कुठे काढावी, असा प्रश्न पडला. गोंदिया, भंडारा, नागपूरच्या आजूबाजूच्या परिसरातील युवक परत गेले. परंतु गडचिरोलीसह राज्यातील इतर भागातून आलेल्या तरुणांंना राहण्याचा प्रश्न पडला. गावाकडे जाण्यासाठी रेल्वे तसेच बसही नव्हती. खासगी वाहनाने जाण्यापुरतेही पैसे त्यांच्याकडे नव्हते.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारीfraudधोकेबाजी