शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

नागपूर मेट्रो रेल्वेमध्ये भरतीसाठी बनावट कंपनीची खोटी जाहिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 01:16 IST

नामांकित कंपन्यांमध्ये भरतीच्या नावाखाली बेरोजगारांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे वसुलीचा नवीन धंदा नागपुरात सुरू आहे. पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली असली तरीही दररोज नवीन कंपन्या भरतीची जाहिरात देऊन बेरोजगारांची लूट करीत आहे. या बनावट कंपन्यांच्या जाहिरातीसंदर्भात बेरोजगांनी दक्ष राहावे, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

ठळक मुद्दे बेरोजगारांना लुटण्याचा नवीन धंदा : कंपनीचे संचालक फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नामांकित कंपन्यांमध्ये भरतीच्या नावाखाली बेरोजगारांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे वसुलीचा नवीन धंदा नागपुरात सुरू आहे. पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली असली तरीही दररोज नवीन कंपन्या भरतीची जाहिरात देऊन बेरोजगारांची लूट करीत आहे. या बनावट कंपन्यांच्या जाहिरातीसंदर्भात बेरोजगांनी दक्ष राहावे, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.नागपूर आणि मुंबईत कार्यालय असल्याचे सांगून ए.एन. इंजिनिअरिंग या बनावट कंपनीने नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात अटेंडंटस्च्या १५० जागा भरण्यात येत असल्याचा मॅसेज मोबाईल क्रमांक आणि नागपुरातील म्हाळगीनगर, हुडकेश्वर रिंगरोड अशा पत्त्यासह व्हॉटस्अ‍ॅपवर टाकला. हा मॅसेज व्हायरल झाला. तरुण-तरुणींनी या पत्त्यावर धाव घेतली तर काहींनी मेट्रो रेल्वेच्या कार्यालयात दूरध्वनी केला. अशी जाहिरात मेट्रो रेल्वे कार्यालयाने दिलेली नसल्याची माहिती पोलिसांना दिली. सदर प्रतिनिधीने कंपनीने जाहीर केलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता, तो बंद होता. याशिवाय मंगळवारी पोलिसांनी चौकशी केली असता, नमूद पत्त्यावर कंपनीचे कार्यालय नव्हते. कंपनीच्या खोट्या जाहिरातीमुळे किती जणांची फसवणूक झाली, याची माहिती अजूनही पुढे आलेली नाही.मेट्रो रेल्वेमध्ये तिकीट काऊंटर आणि मेन्टेनन्स व हॅण्डलिंग या स्थायी पदासाठी १५० तरुण-तरुणींची भरती करण्यात येत असल्याचे मॅसेज सर्वत्र व्हायरल करण्यात आला. त्याकरिता १८ ते ३५ वयोगटातील १२ वी पास आणि पदवीधरांना (कॉम्प्युटर आॅपरेटर) संधी असल्याचे सांगण्यात आले. प्रशिक्षण कालावधीत तीन महिने १२,५०० रुपये आणि प्रशिक्षणानंतर २५ ते २७ हजार रुपये पगार आणि अर्ज करण्याची अखेरची तारीख २० नोव्हेंबर असल्याचे मॅसेजमध्ये नमूद करण्यात आले होते. याकरिता कंपनीच्या नागपुरातील म्हाळगीनगर चौक, हुडकेश्वर रिंगरोड येथील कार्यालयात अर्जासह संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. भरतीसंदर्भात अनेकांमध्ये चर्चा सुरू झाली. पण मेट्रो रेल्वे कार्यालयाने वेळीच पावले उचलल्यामुळे बेरोजगारांची फसवणूक थांबली. आता बनावट कंपनीचे कार्यालयही नाही आणि मोबाईलही बंद आहे.भरतीसाठी मेट्रो कार्यालयच थेट जाहिरात काढतेमेट्रो रेल्वेत भरतीसाठी मेट्रो रेल्वेने कोणत्याही कंपनीची अधिकृत नियुक्ती केलेली नाही. बनावट कंपन्या खोट्या जाहिराती काढून बेरोजगारांची फसवणूक करीत आहेत. भरतीच्या मॅसेजची पोलिसांना माहिती दिल्यामुळे कंपनीचे संचालक फरार झाले आणि त्यांनी मोबाईल बंद केला. तरुणांनी खोट्या जाहिरातींना बळी पडू नये.अखिलेश हळवे, उपमहाव्यवस्थापक,महामेट्रो, नागपूर.

टॅग्स :Metroमेट्रोfraudधोकेबाजी