शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नागपूर मेट्रो रेल्वेमध्ये भरतीसाठी बनावट कंपनीची खोटी जाहिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 01:16 IST

नामांकित कंपन्यांमध्ये भरतीच्या नावाखाली बेरोजगारांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे वसुलीचा नवीन धंदा नागपुरात सुरू आहे. पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली असली तरीही दररोज नवीन कंपन्या भरतीची जाहिरात देऊन बेरोजगारांची लूट करीत आहे. या बनावट कंपन्यांच्या जाहिरातीसंदर्भात बेरोजगांनी दक्ष राहावे, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

ठळक मुद्दे बेरोजगारांना लुटण्याचा नवीन धंदा : कंपनीचे संचालक फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नामांकित कंपन्यांमध्ये भरतीच्या नावाखाली बेरोजगारांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे वसुलीचा नवीन धंदा नागपुरात सुरू आहे. पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली असली तरीही दररोज नवीन कंपन्या भरतीची जाहिरात देऊन बेरोजगारांची लूट करीत आहे. या बनावट कंपन्यांच्या जाहिरातीसंदर्भात बेरोजगांनी दक्ष राहावे, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.नागपूर आणि मुंबईत कार्यालय असल्याचे सांगून ए.एन. इंजिनिअरिंग या बनावट कंपनीने नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात अटेंडंटस्च्या १५० जागा भरण्यात येत असल्याचा मॅसेज मोबाईल क्रमांक आणि नागपुरातील म्हाळगीनगर, हुडकेश्वर रिंगरोड अशा पत्त्यासह व्हॉटस्अ‍ॅपवर टाकला. हा मॅसेज व्हायरल झाला. तरुण-तरुणींनी या पत्त्यावर धाव घेतली तर काहींनी मेट्रो रेल्वेच्या कार्यालयात दूरध्वनी केला. अशी जाहिरात मेट्रो रेल्वे कार्यालयाने दिलेली नसल्याची माहिती पोलिसांना दिली. सदर प्रतिनिधीने कंपनीने जाहीर केलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता, तो बंद होता. याशिवाय मंगळवारी पोलिसांनी चौकशी केली असता, नमूद पत्त्यावर कंपनीचे कार्यालय नव्हते. कंपनीच्या खोट्या जाहिरातीमुळे किती जणांची फसवणूक झाली, याची माहिती अजूनही पुढे आलेली नाही.मेट्रो रेल्वेमध्ये तिकीट काऊंटर आणि मेन्टेनन्स व हॅण्डलिंग या स्थायी पदासाठी १५० तरुण-तरुणींची भरती करण्यात येत असल्याचे मॅसेज सर्वत्र व्हायरल करण्यात आला. त्याकरिता १८ ते ३५ वयोगटातील १२ वी पास आणि पदवीधरांना (कॉम्प्युटर आॅपरेटर) संधी असल्याचे सांगण्यात आले. प्रशिक्षण कालावधीत तीन महिने १२,५०० रुपये आणि प्रशिक्षणानंतर २५ ते २७ हजार रुपये पगार आणि अर्ज करण्याची अखेरची तारीख २० नोव्हेंबर असल्याचे मॅसेजमध्ये नमूद करण्यात आले होते. याकरिता कंपनीच्या नागपुरातील म्हाळगीनगर चौक, हुडकेश्वर रिंगरोड येथील कार्यालयात अर्जासह संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. भरतीसंदर्भात अनेकांमध्ये चर्चा सुरू झाली. पण मेट्रो रेल्वे कार्यालयाने वेळीच पावले उचलल्यामुळे बेरोजगारांची फसवणूक थांबली. आता बनावट कंपनीचे कार्यालयही नाही आणि मोबाईलही बंद आहे.भरतीसाठी मेट्रो कार्यालयच थेट जाहिरात काढतेमेट्रो रेल्वेत भरतीसाठी मेट्रो रेल्वेने कोणत्याही कंपनीची अधिकृत नियुक्ती केलेली नाही. बनावट कंपन्या खोट्या जाहिराती काढून बेरोजगारांची फसवणूक करीत आहेत. भरतीच्या मॅसेजची पोलिसांना माहिती दिल्यामुळे कंपनीचे संचालक फरार झाले आणि त्यांनी मोबाईल बंद केला. तरुणांनी खोट्या जाहिरातींना बळी पडू नये.अखिलेश हळवे, उपमहाव्यवस्थापक,महामेट्रो, नागपूर.

टॅग्स :Metroमेट्रोfraudधोकेबाजी