शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

सोयाबीन व्हायरसच्या तावडीत, अख्खी शेते काळवंडली; नागपूरसह दोन जिल्ह्यांना फटका 

By जितेंद्र ढवळे | Updated: September 19, 2023 14:10 IST

शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी

नागपूर : हिरवाकंच मोठ्या डौलात उभा असलेला आणि शेंगामध्ये दाणे धरू पाहणारा शेतातील सोयाबीन काळवंडला आहे. हा प्रकार एक-दोन शेतात नसून भिवापूर तालुक्यासह नागपूर जिल्ह्याचा सीमावर्ती भाग असलेला चिमुर (जि. चंद्रपूर) व पवनी (जि. भंडारा) येथेही दिसून येतो आहे. शेतातील उभ्या स्वप्नांची राखरांगोळी झाल्याने शेतकरी चिंतित झाला आहे. भिवापूर तालुक्यात २० हजार ४१७ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड आहे.

अस्मानी संकटांचा सामना करीत शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीनची पेरणी केली. ‘ॲलोमोझॅक’ ग्रस्त काही अपवादात्मक शेतकऱ्यांचा सोयाबीन वगळता १३ सप्टेंबरपर्यंत तालुक्यातील प्रत्येक शेतात हिरवाकंच सोयाबीन डौलात उभा होता. पन्नास टक्के शेंगाही धरल्या होत्या. दाणे बारीक असले तरी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गुणवत्ता प्राप्त भरीव सोयाबीन कापणीला येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. १४ व १५ सप्टेंबरला अनुक्रमे पोळा व पाडव्यामुळे शेतकरी थेट दोन दिवसांनी १६ सप्टेंबरला शेतात गेला.

बांधावरून शेतातील दृश्य बघताच, धक्का बसला. काल परवा हिरवाकंच असलेला सोयाबीन तासांतच काळवंडला. झाडे अचानक वाळून गेली. प्रत्येक शेतात ८० टक्के सोयाबीन वाळल्यागत झाला आहे. एकप्रकारे मृत पावलेल्या सोयाबीनची झाडे पुन्हा ऑक्सिजन घेण्याची शक्यता मुळीच नाही? त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची अक्षरश: राखरांगोळी झालेली आहे.

महत्त्वाचे म्हणजे रोग कोणता आणि प्रादुर्भाव कशाचा? याबाबत कुणाला काहीच कळताना दिसत नाही. उलटफेर वातावरण कारणीभूत ठरल्याचे सांगत, कृषी विभागही अनभिज्ञच असल्याचे दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे हा प्रकार एक-दोन शेतातील आणि गावातील नसून संपूर्ण तालुक्यात सोयाबीनचे पीक मागील दोन दिवसांत उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे. १० ते २० टक्के पीक थोडेबहुत शिल्लक असून तेसुद्धा हाताबाहेर गेले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरFarmerशेतकरी