शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सोयाबीन व्हायरसच्या तावडीत, अख्खी शेते काळवंडली; नागपूरसह दोन जिल्ह्यांना फटका 

By जितेंद्र ढवळे | Updated: September 19, 2023 14:10 IST

शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी

नागपूर : हिरवाकंच मोठ्या डौलात उभा असलेला आणि शेंगामध्ये दाणे धरू पाहणारा शेतातील सोयाबीन काळवंडला आहे. हा प्रकार एक-दोन शेतात नसून भिवापूर तालुक्यासह नागपूर जिल्ह्याचा सीमावर्ती भाग असलेला चिमुर (जि. चंद्रपूर) व पवनी (जि. भंडारा) येथेही दिसून येतो आहे. शेतातील उभ्या स्वप्नांची राखरांगोळी झाल्याने शेतकरी चिंतित झाला आहे. भिवापूर तालुक्यात २० हजार ४१७ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड आहे.

अस्मानी संकटांचा सामना करीत शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीनची पेरणी केली. ‘ॲलोमोझॅक’ ग्रस्त काही अपवादात्मक शेतकऱ्यांचा सोयाबीन वगळता १३ सप्टेंबरपर्यंत तालुक्यातील प्रत्येक शेतात हिरवाकंच सोयाबीन डौलात उभा होता. पन्नास टक्के शेंगाही धरल्या होत्या. दाणे बारीक असले तरी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गुणवत्ता प्राप्त भरीव सोयाबीन कापणीला येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. १४ व १५ सप्टेंबरला अनुक्रमे पोळा व पाडव्यामुळे शेतकरी थेट दोन दिवसांनी १६ सप्टेंबरला शेतात गेला.

बांधावरून शेतातील दृश्य बघताच, धक्का बसला. काल परवा हिरवाकंच असलेला सोयाबीन तासांतच काळवंडला. झाडे अचानक वाळून गेली. प्रत्येक शेतात ८० टक्के सोयाबीन वाळल्यागत झाला आहे. एकप्रकारे मृत पावलेल्या सोयाबीनची झाडे पुन्हा ऑक्सिजन घेण्याची शक्यता मुळीच नाही? त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची अक्षरश: राखरांगोळी झालेली आहे.

महत्त्वाचे म्हणजे रोग कोणता आणि प्रादुर्भाव कशाचा? याबाबत कुणाला काहीच कळताना दिसत नाही. उलटफेर वातावरण कारणीभूत ठरल्याचे सांगत, कृषी विभागही अनभिज्ञच असल्याचे दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे हा प्रकार एक-दोन शेतातील आणि गावातील नसून संपूर्ण तालुक्यात सोयाबीनचे पीक मागील दोन दिवसांत उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे. १० ते २० टक्के पीक थोडेबहुत शिल्लक असून तेसुद्धा हाताबाहेर गेले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरFarmerशेतकरी