शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

हवामान बदलाने गतवर्षी राज्यात घेतले ३५० नागरिकांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 14:48 IST

हवामान बदलामुळे मागील वर्षी राज्यात ३५० नागरिकांचे बळी गेले. तर, संपूर्ण देशात यामुळे १७५० लाेकांनी जीव गमावला. सर्वाधिक ७८७ मृत्यू वीज पडल्याने झाले आहेत.

ठळक मुद्देदेशभरात १७५० मृत्यू : वीज पडणे, दरड काेसळणे, अतिवृष्टी, पुराचे कारण

मेहा शर्मा

नागपूर : क्लायमेट चेंज (हवामान बदल) किती धाेकादायक ठरू शकते याचे संकेत देणारी आकडेवारी भारतीय हवामान विभागाने सादर केली आहे. हवामान बदलामुळे मागील वर्षी केवळ राज्यात ३५० नागरिकांचे बळी गेले. संपूर्ण देशात यामुळे १७५० लाेकांनी जीव गमावला. सर्वाधिक ७८७ मृत्यू वीज पडल्याने झाले आहेत. त्यापाठाेपाठ पूर, अतिवृष्टी व दरड काेसळण्याचे प्रमाण असून यामुळे ७५९ नागरिकांचा बळी घेतला. याशिवाय चक्रीवादळाने १७२ तर थंडीची लाट व धुळीच्या वादळाने ३२ जण दगावले.

भारती इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पाॅलिसी, इंडियन स्कूल ऑफ बिजनेसचे सहायक प्राध्यापक व संशाेधन संचालक अंजल प्रकाश यांनी सांगितले, हवामान बदलावरील आंतर शासकीय पॅनलचा नुकताच आलेला अहवाल आणि त्यांच्या क्लायमेट माॅडेलवरून ग्लाेबल वार्मिंगचे माेठे परिणाम नागरिकांना सहन करावे लागत आहेत. हिमनद्यांचे बर्फ वितळण्यास आणि चक्रीवादळात हाेणाऱ्या वाढीसाठी हवामान बदल कारणीभूत आहे. महाराष्ट्रात अनेक परिसंस्था आहेत. यामध्ये वनक्षेत्र, मोठ्या किनारपट्ट्या तसेच अर्ध-शुष्क प्रदेशही आहे. त्यामुळे बदलत्या हवामानासाठी ते सर्वांत असुरक्षित आहे. अलीकडच्या घटनांवरून महाराष्ट्रातील लाेक हवामानाच्या जोखमींशी संपर्कात असल्याचे लक्षात येते.

हवामान बदलाची जागृती शासकीय प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उचललेले पाऊल काैतुकास्पद आहे. मात्र, यासाेबत कृती करणे आणि जिल्हा स्तरावर नियाेजन करण्याची गरज आहे, ज्यामुळे क्लायमेट माॅडेल लाेकांच्या लक्षात येईल. त्यानुसार वैज्ञानिक संस्थांनी शासनासाेबत काम करून हवामानाचा डेटा जिल्हा स्तरापर्यंत पाेहोचविण्यास मदत करावी. या माहितीद्वारे जिल्हा स्तरावर याेजना आखून त्याची अंमलबजावणी करणे साेपे हाेईल. विकासाची प्रक्रिया हवामानाचा धाेका लक्षात घेऊन चालावी आणि प्रत्येक कृती पर्यावरणाचा विचार करून व्हावी, अशी भावना अंजल प्रकाश यांनी व्यक्त केली.

सेंटर फाॅर रिसर्च ऑन क्लिन एअर (सीआरईए) चे विश्लेषक सुनील दहिया म्हणाले, इंधनाच्या अमर्याद वापरामुळे स्थानिक वायू गुणवत्तेवर परिणाम हाेताे. त्यामुळे वातावरणाशी निगडित महापूर, दुष्काळ, चक्रीवादळ यासारख्या घटनांची तीव्रता आणि वारंवारता वाढत चालली आहे. या घटनांमध्ये मानवी आराेग्यासह प्रचंड आर्थिक नुकसानही सहन करावे लागते आहे. त्यामुळे इंधनाचा वापर कमी करणे आणि वायू प्रदूषण कमी करणे, हेच पर्याय हवामान बदल राेखण्यासाठी असल्याचे मत दहिया यांनी व्यक्त केले.

- तर भयावह संकटाचा सामना करावा लागेल

ग्रीन व्हिजिलचे काैस्तुभ चटर्जी यांनी मानवनिर्मित वायू प्रदूषण मुख्य समस्या असल्याचे सांगितले. तापमान वाढ, ग्लाेबल वार्मिंग आणि हवामान बदल त्याचेच परिणाम आहेत. आपण भयंकर आपत्तीकडे चाललाे आहाेत. संपूर्ण जग आज तापमान वाढ १.५ अंशावर मर्यादित ठेवण्यासाठी झगडत आहे. शंभर वर्षांत ते १.१ अंशाने वाढले आहे. हे केवळ एका देशाच्या प्रयत्नाने शक्य हाेणार नाही. वैश्विक तापमान २ अंशाने वाढले तर भयावह संकटाचा सामना करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :environmentपर्यावरणDeathमृत्यूweatherहवामान