शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलाने गतवर्षी राज्यात घेतले ३५० नागरिकांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 14:48 IST

हवामान बदलामुळे मागील वर्षी राज्यात ३५० नागरिकांचे बळी गेले. तर, संपूर्ण देशात यामुळे १७५० लाेकांनी जीव गमावला. सर्वाधिक ७८७ मृत्यू वीज पडल्याने झाले आहेत.

ठळक मुद्देदेशभरात १७५० मृत्यू : वीज पडणे, दरड काेसळणे, अतिवृष्टी, पुराचे कारण

मेहा शर्मा

नागपूर : क्लायमेट चेंज (हवामान बदल) किती धाेकादायक ठरू शकते याचे संकेत देणारी आकडेवारी भारतीय हवामान विभागाने सादर केली आहे. हवामान बदलामुळे मागील वर्षी केवळ राज्यात ३५० नागरिकांचे बळी गेले. संपूर्ण देशात यामुळे १७५० लाेकांनी जीव गमावला. सर्वाधिक ७८७ मृत्यू वीज पडल्याने झाले आहेत. त्यापाठाेपाठ पूर, अतिवृष्टी व दरड काेसळण्याचे प्रमाण असून यामुळे ७५९ नागरिकांचा बळी घेतला. याशिवाय चक्रीवादळाने १७२ तर थंडीची लाट व धुळीच्या वादळाने ३२ जण दगावले.

भारती इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पाॅलिसी, इंडियन स्कूल ऑफ बिजनेसचे सहायक प्राध्यापक व संशाेधन संचालक अंजल प्रकाश यांनी सांगितले, हवामान बदलावरील आंतर शासकीय पॅनलचा नुकताच आलेला अहवाल आणि त्यांच्या क्लायमेट माॅडेलवरून ग्लाेबल वार्मिंगचे माेठे परिणाम नागरिकांना सहन करावे लागत आहेत. हिमनद्यांचे बर्फ वितळण्यास आणि चक्रीवादळात हाेणाऱ्या वाढीसाठी हवामान बदल कारणीभूत आहे. महाराष्ट्रात अनेक परिसंस्था आहेत. यामध्ये वनक्षेत्र, मोठ्या किनारपट्ट्या तसेच अर्ध-शुष्क प्रदेशही आहे. त्यामुळे बदलत्या हवामानासाठी ते सर्वांत असुरक्षित आहे. अलीकडच्या घटनांवरून महाराष्ट्रातील लाेक हवामानाच्या जोखमींशी संपर्कात असल्याचे लक्षात येते.

हवामान बदलाची जागृती शासकीय प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उचललेले पाऊल काैतुकास्पद आहे. मात्र, यासाेबत कृती करणे आणि जिल्हा स्तरावर नियाेजन करण्याची गरज आहे, ज्यामुळे क्लायमेट माॅडेल लाेकांच्या लक्षात येईल. त्यानुसार वैज्ञानिक संस्थांनी शासनासाेबत काम करून हवामानाचा डेटा जिल्हा स्तरापर्यंत पाेहोचविण्यास मदत करावी. या माहितीद्वारे जिल्हा स्तरावर याेजना आखून त्याची अंमलबजावणी करणे साेपे हाेईल. विकासाची प्रक्रिया हवामानाचा धाेका लक्षात घेऊन चालावी आणि प्रत्येक कृती पर्यावरणाचा विचार करून व्हावी, अशी भावना अंजल प्रकाश यांनी व्यक्त केली.

सेंटर फाॅर रिसर्च ऑन क्लिन एअर (सीआरईए) चे विश्लेषक सुनील दहिया म्हणाले, इंधनाच्या अमर्याद वापरामुळे स्थानिक वायू गुणवत्तेवर परिणाम हाेताे. त्यामुळे वातावरणाशी निगडित महापूर, दुष्काळ, चक्रीवादळ यासारख्या घटनांची तीव्रता आणि वारंवारता वाढत चालली आहे. या घटनांमध्ये मानवी आराेग्यासह प्रचंड आर्थिक नुकसानही सहन करावे लागते आहे. त्यामुळे इंधनाचा वापर कमी करणे आणि वायू प्रदूषण कमी करणे, हेच पर्याय हवामान बदल राेखण्यासाठी असल्याचे मत दहिया यांनी व्यक्त केले.

- तर भयावह संकटाचा सामना करावा लागेल

ग्रीन व्हिजिलचे काैस्तुभ चटर्जी यांनी मानवनिर्मित वायू प्रदूषण मुख्य समस्या असल्याचे सांगितले. तापमान वाढ, ग्लाेबल वार्मिंग आणि हवामान बदल त्याचेच परिणाम आहेत. आपण भयंकर आपत्तीकडे चाललाे आहाेत. संपूर्ण जग आज तापमान वाढ १.५ अंशावर मर्यादित ठेवण्यासाठी झगडत आहे. शंभर वर्षांत ते १.१ अंशाने वाढले आहे. हे केवळ एका देशाच्या प्रयत्नाने शक्य हाेणार नाही. वैश्विक तापमान २ अंशाने वाढले तर भयावह संकटाचा सामना करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :environmentपर्यावरणDeathमृत्यूweatherहवामान