शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

हवामान बदलाने गतवर्षी राज्यात घेतले ३५० नागरिकांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 14:48 IST

हवामान बदलामुळे मागील वर्षी राज्यात ३५० नागरिकांचे बळी गेले. तर, संपूर्ण देशात यामुळे १७५० लाेकांनी जीव गमावला. सर्वाधिक ७८७ मृत्यू वीज पडल्याने झाले आहेत.

ठळक मुद्देदेशभरात १७५० मृत्यू : वीज पडणे, दरड काेसळणे, अतिवृष्टी, पुराचे कारण

मेहा शर्मा

नागपूर : क्लायमेट चेंज (हवामान बदल) किती धाेकादायक ठरू शकते याचे संकेत देणारी आकडेवारी भारतीय हवामान विभागाने सादर केली आहे. हवामान बदलामुळे मागील वर्षी केवळ राज्यात ३५० नागरिकांचे बळी गेले. संपूर्ण देशात यामुळे १७५० लाेकांनी जीव गमावला. सर्वाधिक ७८७ मृत्यू वीज पडल्याने झाले आहेत. त्यापाठाेपाठ पूर, अतिवृष्टी व दरड काेसळण्याचे प्रमाण असून यामुळे ७५९ नागरिकांचा बळी घेतला. याशिवाय चक्रीवादळाने १७२ तर थंडीची लाट व धुळीच्या वादळाने ३२ जण दगावले.

भारती इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पाॅलिसी, इंडियन स्कूल ऑफ बिजनेसचे सहायक प्राध्यापक व संशाेधन संचालक अंजल प्रकाश यांनी सांगितले, हवामान बदलावरील आंतर शासकीय पॅनलचा नुकताच आलेला अहवाल आणि त्यांच्या क्लायमेट माॅडेलवरून ग्लाेबल वार्मिंगचे माेठे परिणाम नागरिकांना सहन करावे लागत आहेत. हिमनद्यांचे बर्फ वितळण्यास आणि चक्रीवादळात हाेणाऱ्या वाढीसाठी हवामान बदल कारणीभूत आहे. महाराष्ट्रात अनेक परिसंस्था आहेत. यामध्ये वनक्षेत्र, मोठ्या किनारपट्ट्या तसेच अर्ध-शुष्क प्रदेशही आहे. त्यामुळे बदलत्या हवामानासाठी ते सर्वांत असुरक्षित आहे. अलीकडच्या घटनांवरून महाराष्ट्रातील लाेक हवामानाच्या जोखमींशी संपर्कात असल्याचे लक्षात येते.

हवामान बदलाची जागृती शासकीय प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उचललेले पाऊल काैतुकास्पद आहे. मात्र, यासाेबत कृती करणे आणि जिल्हा स्तरावर नियाेजन करण्याची गरज आहे, ज्यामुळे क्लायमेट माॅडेल लाेकांच्या लक्षात येईल. त्यानुसार वैज्ञानिक संस्थांनी शासनासाेबत काम करून हवामानाचा डेटा जिल्हा स्तरापर्यंत पाेहोचविण्यास मदत करावी. या माहितीद्वारे जिल्हा स्तरावर याेजना आखून त्याची अंमलबजावणी करणे साेपे हाेईल. विकासाची प्रक्रिया हवामानाचा धाेका लक्षात घेऊन चालावी आणि प्रत्येक कृती पर्यावरणाचा विचार करून व्हावी, अशी भावना अंजल प्रकाश यांनी व्यक्त केली.

सेंटर फाॅर रिसर्च ऑन क्लिन एअर (सीआरईए) चे विश्लेषक सुनील दहिया म्हणाले, इंधनाच्या अमर्याद वापरामुळे स्थानिक वायू गुणवत्तेवर परिणाम हाेताे. त्यामुळे वातावरणाशी निगडित महापूर, दुष्काळ, चक्रीवादळ यासारख्या घटनांची तीव्रता आणि वारंवारता वाढत चालली आहे. या घटनांमध्ये मानवी आराेग्यासह प्रचंड आर्थिक नुकसानही सहन करावे लागते आहे. त्यामुळे इंधनाचा वापर कमी करणे आणि वायू प्रदूषण कमी करणे, हेच पर्याय हवामान बदल राेखण्यासाठी असल्याचे मत दहिया यांनी व्यक्त केले.

- तर भयावह संकटाचा सामना करावा लागेल

ग्रीन व्हिजिलचे काैस्तुभ चटर्जी यांनी मानवनिर्मित वायू प्रदूषण मुख्य समस्या असल्याचे सांगितले. तापमान वाढ, ग्लाेबल वार्मिंग आणि हवामान बदल त्याचेच परिणाम आहेत. आपण भयंकर आपत्तीकडे चाललाे आहाेत. संपूर्ण जग आज तापमान वाढ १.५ अंशावर मर्यादित ठेवण्यासाठी झगडत आहे. शंभर वर्षांत ते १.१ अंशाने वाढले आहे. हे केवळ एका देशाच्या प्रयत्नाने शक्य हाेणार नाही. वैश्विक तापमान २ अंशाने वाढले तर भयावह संकटाचा सामना करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :environmentपर्यावरणDeathमृत्यूweatherहवामान