शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

हवामान बदलाने गतवर्षी राज्यात घेतले ३५० नागरिकांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 14:48 IST

हवामान बदलामुळे मागील वर्षी राज्यात ३५० नागरिकांचे बळी गेले. तर, संपूर्ण देशात यामुळे १७५० लाेकांनी जीव गमावला. सर्वाधिक ७८७ मृत्यू वीज पडल्याने झाले आहेत.

ठळक मुद्देदेशभरात १७५० मृत्यू : वीज पडणे, दरड काेसळणे, अतिवृष्टी, पुराचे कारण

मेहा शर्मा

नागपूर : क्लायमेट चेंज (हवामान बदल) किती धाेकादायक ठरू शकते याचे संकेत देणारी आकडेवारी भारतीय हवामान विभागाने सादर केली आहे. हवामान बदलामुळे मागील वर्षी केवळ राज्यात ३५० नागरिकांचे बळी गेले. संपूर्ण देशात यामुळे १७५० लाेकांनी जीव गमावला. सर्वाधिक ७८७ मृत्यू वीज पडल्याने झाले आहेत. त्यापाठाेपाठ पूर, अतिवृष्टी व दरड काेसळण्याचे प्रमाण असून यामुळे ७५९ नागरिकांचा बळी घेतला. याशिवाय चक्रीवादळाने १७२ तर थंडीची लाट व धुळीच्या वादळाने ३२ जण दगावले.

भारती इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पाॅलिसी, इंडियन स्कूल ऑफ बिजनेसचे सहायक प्राध्यापक व संशाेधन संचालक अंजल प्रकाश यांनी सांगितले, हवामान बदलावरील आंतर शासकीय पॅनलचा नुकताच आलेला अहवाल आणि त्यांच्या क्लायमेट माॅडेलवरून ग्लाेबल वार्मिंगचे माेठे परिणाम नागरिकांना सहन करावे लागत आहेत. हिमनद्यांचे बर्फ वितळण्यास आणि चक्रीवादळात हाेणाऱ्या वाढीसाठी हवामान बदल कारणीभूत आहे. महाराष्ट्रात अनेक परिसंस्था आहेत. यामध्ये वनक्षेत्र, मोठ्या किनारपट्ट्या तसेच अर्ध-शुष्क प्रदेशही आहे. त्यामुळे बदलत्या हवामानासाठी ते सर्वांत असुरक्षित आहे. अलीकडच्या घटनांवरून महाराष्ट्रातील लाेक हवामानाच्या जोखमींशी संपर्कात असल्याचे लक्षात येते.

हवामान बदलाची जागृती शासकीय प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उचललेले पाऊल काैतुकास्पद आहे. मात्र, यासाेबत कृती करणे आणि जिल्हा स्तरावर नियाेजन करण्याची गरज आहे, ज्यामुळे क्लायमेट माॅडेल लाेकांच्या लक्षात येईल. त्यानुसार वैज्ञानिक संस्थांनी शासनासाेबत काम करून हवामानाचा डेटा जिल्हा स्तरापर्यंत पाेहोचविण्यास मदत करावी. या माहितीद्वारे जिल्हा स्तरावर याेजना आखून त्याची अंमलबजावणी करणे साेपे हाेईल. विकासाची प्रक्रिया हवामानाचा धाेका लक्षात घेऊन चालावी आणि प्रत्येक कृती पर्यावरणाचा विचार करून व्हावी, अशी भावना अंजल प्रकाश यांनी व्यक्त केली.

सेंटर फाॅर रिसर्च ऑन क्लिन एअर (सीआरईए) चे विश्लेषक सुनील दहिया म्हणाले, इंधनाच्या अमर्याद वापरामुळे स्थानिक वायू गुणवत्तेवर परिणाम हाेताे. त्यामुळे वातावरणाशी निगडित महापूर, दुष्काळ, चक्रीवादळ यासारख्या घटनांची तीव्रता आणि वारंवारता वाढत चालली आहे. या घटनांमध्ये मानवी आराेग्यासह प्रचंड आर्थिक नुकसानही सहन करावे लागते आहे. त्यामुळे इंधनाचा वापर कमी करणे आणि वायू प्रदूषण कमी करणे, हेच पर्याय हवामान बदल राेखण्यासाठी असल्याचे मत दहिया यांनी व्यक्त केले.

- तर भयावह संकटाचा सामना करावा लागेल

ग्रीन व्हिजिलचे काैस्तुभ चटर्जी यांनी मानवनिर्मित वायू प्रदूषण मुख्य समस्या असल्याचे सांगितले. तापमान वाढ, ग्लाेबल वार्मिंग आणि हवामान बदल त्याचेच परिणाम आहेत. आपण भयंकर आपत्तीकडे चाललाे आहाेत. संपूर्ण जग आज तापमान वाढ १.५ अंशावर मर्यादित ठेवण्यासाठी झगडत आहे. शंभर वर्षांत ते १.१ अंशाने वाढले आहे. हे केवळ एका देशाच्या प्रयत्नाने शक्य हाेणार नाही. वैश्विक तापमान २ अंशाने वाढले तर भयावह संकटाचा सामना करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :environmentपर्यावरणDeathमृत्यूweatherहवामान