शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
5
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
6
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
7
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
8
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
9
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
12
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
13
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
14
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
15
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
16
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
17
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
18
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
19
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
20
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरचे कर्मचारी सांभाळताहेत नागपूर शहरातील वीज वितरण व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 23:51 IST

९ सप्टेंबरपासून महावितरणने पूर्ण शहरातील वीज वितरण यंत्रणा आपल्या हाती घेतली आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे कंपनीतील बहुतांश अधिकारी व कर्मचारी नागपुरात स्थायिक नाहीत. सर्वांना प्रतिनियुक्तीवर शहरात आणण्यात आले आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यापासून एमपीआर अडकून : कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएल गेल्यानंतर ९ सप्टेंबरपासून महावितरणने पूर्ण शहरातील वीज वितरण यंत्रणा आपल्या हाती घेतली आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे कंपनीतील बहुतांश अधिकारी व कर्मचारी नागपुरात स्थायिक नाहीत. सर्वांना प्रतिनियुक्तीवर शहरात आणण्यात आले आहे. एकीकडे कर्मचारी स्थायी नियुक्तीची मागणी करीत आहेत तर दुसरीकडे महावितरण गेल्या सहा महिन्यापासून एमपीआर (मॅनपॉवर रिव्ह्यू) ला मंजुरी देत नाही.महावितरणने एक महिन्यापर्यंत एसएनडीएलसोबत महाल, गांधीबाग आणि सिव्हील लाईन्स डिव्हीजनमध्ये समानांतर कामकाज केले. ९ ऑक्टोबर रोजी स्वतंत्रपणे कामकाज आपल्या ताब्यात घेतले. या एक महिन्यात कंपनीला सर्व ठिकाणी कर्मचारी नियुक्त करावयाचे होते. कंपनीने घाईगडबडीत नागपूरच्या बाहेर कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर नागपुरात बोलावले. सहा महिने लोटल्यानंतर यापैकी कुणीही स्थायी होऊ शकले नाही. एमपीआरलाही मंजुरी मिळाली नाही. महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी २४ फेब्रुवारी रोजी मुख्यालयाला पत्र पाठवून कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्ती व स्वीकृत पदावर कर्मचारी देण्याची मागणी केली आहे. महावितरणचे म्हणणे आहे की, एसएनडीएलच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे. आज त्यांची संख्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक आहे.एसएनडीएलच्या काळापासूनच कर्मचाऱ्यांची संख्या कमीएसएनडीएलच्या काळात त्यांच्या गांधीबाग, महाल व सिव्हील लाईन्स डिव्हीजनमध्ये एकूण ११०० लोकांचा स्टाफ होता. आता केवळ ७६३ कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. एकूण १०७३ पदे मंजुर आहेत. नियुक्त कर्मचाऱ्यांमध्येही महावितरणचे २३७ कर्मचारी आहेत. उर्वरित ५२५ आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून काम करीत आहेत. प्रस्तावित पुनर्गठनमध्ये २५७ कर्मचारी आणखी कमी आहेत. अशा परिस्थितीत त्यांना हटवले जाण्याची भीती कर्मचाऱ्यांमध्ये पसरली आहे.थकीत वसुलीसाठी मनुष्यबळाची गरजमहावितरणचे म्हणणे आहे की, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे केवळ २५ हजारावर थकबाकीदारांपर्यंतच पोहोचता येऊ शकत आहे. ऑक्टोबरमध्ये ९७ टक्के, डिसेंबर ९४ टक्के आणि जानेवारीमध्ये १०० टक्के वसुली झाली. यात जुनी थकबाकी कमी आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे थकीत वसुली प्रभावित होत आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर