शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सरकारची लोकाभिमुख कामे जनतेपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:23 IST

विरोधकांना त्यांच्या काळात झालेले भ्रष्टाचार बाहेर येऊ द्यायचे नाहीत. त्यामुळेच संसदेच्या कामकाजात ते सातत्याने अडथळा आणत आहेत. परंतु त्यांचे सत्य जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचे सत्य व सरकारची लोकाभिमुख कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : विकास महात्मे यांच्या नेतृत्वात भाजप नेते-कार्यकर्त्यांचे लाक्षणिक उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विरोधकांना त्यांच्या काळात झालेले भ्रष्टाचार बाहेर येऊ द्यायचे नाहीत. त्यामुळेच संसदेच्या कामकाजात ते सातत्याने अडथळा आणत आहेत. परंतु त्यांचे सत्य जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचे सत्य व सरकारची लोकाभिमुख कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. संसदेत विरोधी पक्षांकडून सुरू असलेल्या गोंधळाच्या विरोधात राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वात भाजपातर्फे नागपुरात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. बावनकुळे यांच्या उपस्थितीत या उपोषणाचा समारोप झाला. यावेळी ते बोलत होते.संविधान चौकात सकाळी १० वाजल्यापासून या उपोषणाला सुरुवात झाली. उपोषणाला शहराध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. विकास कुंभारे, आ. डॉ.मिलींद माने, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, माजी खासदार अजय संचेती, नागपूर जिल्हा भाजपाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, ‘भाजयुमो’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. कॉंग्रेसने कशा पद्धतीने उपोषण केले, हे साऱ्या देशाने पाहिले. मात्र उपोषण नेमके कसे असावे हे भाजपने दाखवून दिले आहे. हे उपोषण नेमके कशासाठी होते हे जनतेपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचविले पाहिजे. संसद अधिवेशनादरम्यान एका दिवसांचा खर्च प्रचंड मोठा असतो. असा स्थितीत कामकाज चालूच न देणे लोकशाही व जनतेवर अन्याय करण्यासारखे आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची एक जबाबदारी असते. मात्र कॉंग्रेसचे नेते अद्यापही सत्तेत असल्यासारखेच वागतात. केवळ आरोप लावायचे आणि चर्चेपासून दूर पळायचे, अशी त्यांची वृत्ती आहे. तर्काच्या आधारावर ते कुठलीही गोष्ट बोलतच नाही. देशात जातीधर्माच्या आधारावर विष पसरविण्याचे कारस्थान विरोधी पक्षांकडून सुरू आहे, अशी टीका यावेळी आ.अनिल सोले यांनी केली.‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा आवश्यकचकेंद्र सरकारने देशातील भ्रष्टाचार कमी करण्याचे काम केले आहे. प्रत्येक मुद्यावर सरकार चर्चेला तयार आहे. मात्र कॉंग्रेस व विरोधी पक्ष भीतीमुळे चर्चेपासून दूर पळत आहेत. ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा आवश्यकच असल्याची केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली आहे. याची प्रभावी अंमलबजावणी केंद्राकडून करण्यातच येत आहे. केंद्र शासनाने वंचित, शोषित, पीडितांच्या उत्थानासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र तरीदेखील राजकारण मध्ये आणून या योजनांना विरोध होत आहे, असे मत यावेळी खा. डॉ. विकास महात्मे यांनी व्यक्त केले.असे चालले उपोषणसकाळी १० च्या सुमारास संविधान चौक येथील उपोषण मंडपात डॉ. विकास महात्मे यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार, नगरसेवक व विविध पदाधिकारीदेखील होते. त्यानंतर नेते व पदाधिकारी क्रमाक्रमाने येत होते तर अनेक जण डॉ. महात्मे यांच्या समवेत दिवसभर बसून होते. रणरणते ऊन असतानादेखील अनेक जण मंडपात एकाच जागी बसून होते. उपोषण परिसरात कोणताही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी काही खाणार नाही, यासंबंधात अगोदरच सूचना देण्यात आल्या होत्या व त्याचे कटाक्षाने पालन करण्यात आले. सायंकाळी ५.३० च्या सुमारास चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लिंबूपाणी पिऊन डॉ.महात्मे यांनी उपोषण समाप्त केले. दरम्यान, दिवसभर कार्यकर्त्यांकडून घोषणा देण्यात येत होत्या. उपोषण मंडपात महिला आघाडी अध्यक्ष कीर्तिदा अजमेरा, माजी महापौर अर्चना डेहनकर, संदीप जाधव, महामंत्री किशोर पलांदूरकर, भोजराज डुम्बे, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष जमाल सिद्दीकी, सुभाष पारधी, निशा सावरक र, संदीप जाधव, दयाशंकर तिवारी, चंदन गोस्वामी, प्रमोद पेंड़के, श्रीकांत देशपांडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाagitationआंदोलन