शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

सरकारची लोकाभिमुख कामे जनतेपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:23 IST

विरोधकांना त्यांच्या काळात झालेले भ्रष्टाचार बाहेर येऊ द्यायचे नाहीत. त्यामुळेच संसदेच्या कामकाजात ते सातत्याने अडथळा आणत आहेत. परंतु त्यांचे सत्य जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचे सत्य व सरकारची लोकाभिमुख कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : विकास महात्मे यांच्या नेतृत्वात भाजप नेते-कार्यकर्त्यांचे लाक्षणिक उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विरोधकांना त्यांच्या काळात झालेले भ्रष्टाचार बाहेर येऊ द्यायचे नाहीत. त्यामुळेच संसदेच्या कामकाजात ते सातत्याने अडथळा आणत आहेत. परंतु त्यांचे सत्य जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचे सत्य व सरकारची लोकाभिमुख कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. संसदेत विरोधी पक्षांकडून सुरू असलेल्या गोंधळाच्या विरोधात राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वात भाजपातर्फे नागपुरात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. बावनकुळे यांच्या उपस्थितीत या उपोषणाचा समारोप झाला. यावेळी ते बोलत होते.संविधान चौकात सकाळी १० वाजल्यापासून या उपोषणाला सुरुवात झाली. उपोषणाला शहराध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. विकास कुंभारे, आ. डॉ.मिलींद माने, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, माजी खासदार अजय संचेती, नागपूर जिल्हा भाजपाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, ‘भाजयुमो’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. कॉंग्रेसने कशा पद्धतीने उपोषण केले, हे साऱ्या देशाने पाहिले. मात्र उपोषण नेमके कसे असावे हे भाजपने दाखवून दिले आहे. हे उपोषण नेमके कशासाठी होते हे जनतेपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचविले पाहिजे. संसद अधिवेशनादरम्यान एका दिवसांचा खर्च प्रचंड मोठा असतो. असा स्थितीत कामकाज चालूच न देणे लोकशाही व जनतेवर अन्याय करण्यासारखे आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची एक जबाबदारी असते. मात्र कॉंग्रेसचे नेते अद्यापही सत्तेत असल्यासारखेच वागतात. केवळ आरोप लावायचे आणि चर्चेपासून दूर पळायचे, अशी त्यांची वृत्ती आहे. तर्काच्या आधारावर ते कुठलीही गोष्ट बोलतच नाही. देशात जातीधर्माच्या आधारावर विष पसरविण्याचे कारस्थान विरोधी पक्षांकडून सुरू आहे, अशी टीका यावेळी आ.अनिल सोले यांनी केली.‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा आवश्यकचकेंद्र सरकारने देशातील भ्रष्टाचार कमी करण्याचे काम केले आहे. प्रत्येक मुद्यावर सरकार चर्चेला तयार आहे. मात्र कॉंग्रेस व विरोधी पक्ष भीतीमुळे चर्चेपासून दूर पळत आहेत. ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा आवश्यकच असल्याची केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली आहे. याची प्रभावी अंमलबजावणी केंद्राकडून करण्यातच येत आहे. केंद्र शासनाने वंचित, शोषित, पीडितांच्या उत्थानासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र तरीदेखील राजकारण मध्ये आणून या योजनांना विरोध होत आहे, असे मत यावेळी खा. डॉ. विकास महात्मे यांनी व्यक्त केले.असे चालले उपोषणसकाळी १० च्या सुमारास संविधान चौक येथील उपोषण मंडपात डॉ. विकास महात्मे यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार, नगरसेवक व विविध पदाधिकारीदेखील होते. त्यानंतर नेते व पदाधिकारी क्रमाक्रमाने येत होते तर अनेक जण डॉ. महात्मे यांच्या समवेत दिवसभर बसून होते. रणरणते ऊन असतानादेखील अनेक जण मंडपात एकाच जागी बसून होते. उपोषण परिसरात कोणताही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी काही खाणार नाही, यासंबंधात अगोदरच सूचना देण्यात आल्या होत्या व त्याचे कटाक्षाने पालन करण्यात आले. सायंकाळी ५.३० च्या सुमारास चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लिंबूपाणी पिऊन डॉ.महात्मे यांनी उपोषण समाप्त केले. दरम्यान, दिवसभर कार्यकर्त्यांकडून घोषणा देण्यात येत होत्या. उपोषण मंडपात महिला आघाडी अध्यक्ष कीर्तिदा अजमेरा, माजी महापौर अर्चना डेहनकर, संदीप जाधव, महामंत्री किशोर पलांदूरकर, भोजराज डुम्बे, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष जमाल सिद्दीकी, सुभाष पारधी, निशा सावरक र, संदीप जाधव, दयाशंकर तिवारी, चंदन गोस्वामी, प्रमोद पेंड़के, श्रीकांत देशपांडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाagitationआंदोलन