शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दुप्पट रक्कम देण्याची थाप मारून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2022 15:22 IST

या टोळीने गेल्या काही वर्षांत नागपूरसह ठिकठिकाणच्या अनेक व्यापारी, उद्योजकांना अशा प्रकारे कोट्यवधींचा गंडा घातला आहे.

ठळक मुद्देअनेकांची कोट्यवधींची रोकड हडपलीचंद्रपूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यालाही गंडा परतवाड्याचा आरोपी जेरबंद

नागपूर : चाळीस हजार दिल्यास काही वेळेतच एक लाख परत करण्याची थाप मारून अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या टोळीचा अखेर पोलिसांनी छडा लावला. या टोळीतील शेख एजाज शेख अहमद (रा. परतवाडा) याला पोलिसांनी अटक केली. मात्र, टोळीचा सूत्रधार पप्पू अवस्थी (वय ५५, रा. जगनाडे चाैक नंदनवन) आणि राजू काल्या ऊर्फ दीपक चाैधरी त्याच्या साथीदारांसह फरार झाला आहे.

विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने दुप्पटचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी नागपुरात सक्रिय असल्याचे वृत्त २२ आणि २३ नोव्हेंबर २०२१ ला प्रकाशित करून या टोळीचा खुलासा केला होता.

कुख्यात पप्पू अवस्थी आणि राजू काल्या फायनान्स किंवा इन्शुरन्स कंपनीत काम करणाऱ्या तसेच व्यापारी उद्योजकांच्या संपर्कात असणाऱ्या तरुणांना हेरून त्यांच्या माध्यमातून आर्थिक स्थिती भक्कम असणाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढतात. या टोळीने गेल्या काही वर्षांत नागपूरसह ठिकठिकाणच्या अनेक व्यापारी, उद्योजकांना अशा प्रकारे कोट्यवधींचा गंडा घातला आहे. ब्रम्हपुरी (जि. चंद्रपूर) येथील रुक्मिणी वाॅर्डात राहणारे कापड व्यावसायिक जयप्रकाश बिकमचंद पाटणी (वय ४६) यांच्यासोबत डिसेंबर २०२१ ला राजू काल्याची ओळख झाली.

आमच्याकडे मोठ्या प्रमाणात बनावट (ब्लॅक) नोटा असून काही वेळेतच तुम्हाला चाळीस लाखांच्या बदल्यात एक कोटी रुपये देऊ, अशी बतावणी केली. संशय असेल तर आमच्या नोटा कोणत्याही बँकेत चालवून बघा, असे म्हणत पाचशेंच्या काही नोटाही पाटणी यांना दाखविल्या. त्या असलीच असल्याने संशय घेण्याचे कारण नव्हते. अशा प्रकारे विश्वास संपादन केल्यानंतर पाटणी यांनी काल्यासोबत डील करण्याचे ठरवले. त्यानुसार, २३ डिसेंबर २०२१ ला पाटनी त्यांच्या एका मित्रासह २ लाखांची रोकड घेऊन नागपुरातील वर्धामाननगरात पोहचले. येथे एमएच ४३- एआर ७३९९ क्रमांकाच्या कारमध्ये काल्या आणि मोहम्मद एजाज पोहोचले. सायंकाळपर्यंत टाईमपास केल्यानंतर पाटनी यांच्याकडून रोकड घेऊन चार लाख रुपये घेण्यासाठी येण्याची तारीख दिली.

दरम्यान, २८ डिसेंबरला दुपारी २ वाजता पाटनी खरेदीच्या निमित्ताने सात लाख रुपये घेऊन नागपुरात आले. यावेळी त्यांनी काल्याशी संपर्क करून आपल्या चार लाखांची मागणी केली. काल्याने सायंकाळी ६ वाजता देशपांडे लेआउटमधील इंडियन ओव्हरसिज बँकेजवळच्या पुलाखाली बोलविले. तेथे काल्या, एजाज आणि अवस्थी त्यांच्या मर्सिडिज बेंझ कार (एमएच ४३ - एआर ७३९९) ने पोहोचले. त्यांनी पाटनी आणि त्यांच्या मित्राला चार लाख देण्याऐवजी त्यांच्या जवळची सात लाखांची रोकड हिसकावून घेतली.

यावेळी आरोपींसोबत वाद सुरू असतानाच तेथे पोलिसांसारखे दिसणारे वाहन घेऊन काहीजण आले. त्यांनी कशाचा वाद आहे, असे म्हणत काल्याला ताब्यात घेऊन आपल्या वाहनात बसविले. पोलीस कारवाईच्या शंकेने पाटनी तेथून त्यांच्या मित्रासोबत निघून गेले. काही दिवसांनंतर त्यांनी पप्पू आणि काल्याशी संपर्क केला असता त्याने पोलीस कारवाई झाली रक्कम विसरून जा, असे म्हणत पाटनींची बोळवण केली.

तक्रार मिळताच पोलीस ॲक्शन मोडवर

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटनी यांनी त्यांच्या एका मित्राच्या मदतीने पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांची भेट घेतली. त्यांची तक्रार ऐकून घेताच उपायुक्त हसन यांनी लगेच आपल्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी एजाजला अटक केली. सूत्रधार काल्या आणि पप्पू फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांच्या मदतीनेच फसवणूक ?

आरोपी राजू काल्या आणि पप्पू अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा चालवत आहेत. त्यांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यासोबत खास बातचित आहे. त्यामुळे या टोळीवर कारवाईच होत नाही. झाली तरी हे कर्मचारी ‘साहेबांचे’ नाव घेऊन त्या कारवाईचे स्वरूप मवाळ करतात. या कारवाईच्या निमित्ताने पुन्हा एकदा आता ही चर्चा जोरात सुरू झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी