शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
2
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
3
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
4
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
5
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
6
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
7
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
8
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
9
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
10
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
11
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
12
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
13
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
14
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
16
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
17
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
18
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
19
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
20
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव

नागपुरी संत्र्याची निर्यात वाढणार : चर्चासत्रात कृषी तज्ज्ञांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 20:55 IST

नागपुरी संत्र्याची जगात ओळख आहे. संत्र्याला जागतिक ब्रॅण्ड म्हणून पुढे आणायचे असल्यास शेतकऱ्यांना शासनाने आधुनिक सोयीसुविधा पुरविण्याची गरज आहे. शासन, शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांनी एकत्रितरीत्या काम करून उत्पादन आणि निर्यात वाढविण्याची गरज असल्याचे मत कृषी विशेषज्ञांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देझाडांची निगा व तोडणीपश्चात प्रक्रिया महत्त्वाची

आॅनलाईन लोकमतनागपूर : नागपुरी संत्र्याची जगात ओळख आहे. टेबल फ्रूट म्हणून सर्वत्र मागणी आहे. संत्र्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून शेतकऱ्यांतर्फे प्रचंड मेहनत घेतली जाते. पण एखाद्या वेळी नैसर्गिक आपत्तीने संत्री खराब झाल्यास उत्पादक आर्थिक संकटात येतो. तोडणीपश्चात संत्र्यावर करण्यात येणाऱ्या आधुनिक प्रक्रियेच्या सोयीसुविधा इस्रायल येथील शेतकऱ्यांप्रमाणे प्रत्येकाच्या शेतात असाव्यात, अशी मागणी पुढे आली आहे. संत्र्याला जागतिक ब्रॅण्ड म्हणून पुढे आणायचे असल्यास शेतकऱ्यांना शासनाने आधुनिक सोयीसुविधा पुरविण्याची गरज आहे. शासन, शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांनी एकत्रितरीत्या काम करून उत्पादन आणि निर्यात वाढविण्याची गरज असल्याचे मत कृषी विशेषज्ञांनी व्यक्त केले.रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरू असलेल्या तीन दिवसीय वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी तांत्रिक सत्रात राज्य आणि केंद्रामध्ये कार्यरत वरिष्ठ कृषी विशेषज्ञ, वैज्ञानिक आणि उत्पादकांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.संत्रा पीक वाढविण्याचे प्रयत्नमिझोरममध्ये संत्र्यांचे उत्पादन वाढविणे, हे जिकिरीचे काम आहे. त्यासाठी राज्य सरकार संशोधन आणि विकासावर विशेष प्रयत्न घेते. संत्र्याच्या मशागतीसाठी अनेक अडचणी आहेत. डोंगराळ प्रदेशात उतरत्या जागेवर संत्र्यांचे पीक घेतले जाते. सध्या राज्यात १६,०३० हेक्टरवर संत्र्याची लागवड आहे. पण अनेकदा नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नष्ट होते. माती आम्लीय, झिंकची कमतरता असून कीटकांवर काहीही नियंत्रण नाही. एमआयडीएचतर्फे बागायतदारांना व्यवस्थापनावर प्रशिक्षण देण्यात येते.पी.सी. लालनघाहसंगीवैज्ञानिक, हॉर्टिकल्चर विभाग, मिझोरम.आॅनलाईनने शेतकी उत्पादने विका‘राष्ट्रीय कृषी बाजार’ (एनएएम) हे शेतकऱ्यांना शेतकी उत्पादने विकण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. ई-नाम हे इलेक्ट्रॉनिक्स पोर्टल असून, त्यामुळे राज्य आणि केंद्रामध्ये पारदर्शकता आली आहे. या पोर्टलचे उद्घाटन १४ एप्रिल २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावर १४ राज्यांमधील ४७० बाजारपेठांना जोडले आहे. २०१८ पर्यंत एकूण ५८५ बाजारपेठा जोडण्यात येणार आहेत. ९० कृषिमालाची नोंदणी असून त्यात संत्र्याचा समावेश आहे. अ‍ॅप मोबाईलवर डाऊनलोड करता येतो.गुंजन शिवहरेअधिकारी, ‘ई-नाम’.

 

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरnagpurनागपूर