विशेष परीक्षेच्या प्रारूपाला मिळणार मान्यता

By Admin | Updated: July 3, 2014 00:55 IST2014-07-03T00:55:13+5:302014-07-03T00:55:13+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रवेशबंदी लावूनदेखील विद्यार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाने पूर्ण जोर लावला आहे.

Expert approval for the special exam | विशेष परीक्षेच्या प्रारूपाला मिळणार मान्यता

विशेष परीक्षेच्या प्रारूपाला मिळणार मान्यता

नागपूर विद्यापीठ : आज विद्वत परिषदेची तातडीची बैठक
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रवेशबंदी लावूनदेखील विद्यार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाने पूर्ण जोर लावला आहे. यासंदर्भात गुरुवारी विद्वत्त परिषदेच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत विशेष परीक्षेच्या अध्यादेशाच्या प्रारूपाला मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
११ जून रोजी राज्य शासनाने प्रवेशबंदीच्या यादीतील महाविद्यालयांमधील प्रविष्ट विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. यानंतर २६ जून रोजी झालेल्या विद्वत्त परिषदेच्या तातडीच्या बैठकीत संस्थाचालकांच्या दबावामुळे ६३ महाविद्यालयांतील ६,६१६ विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांची परीक्षा कशी आणि कधी आयोजित करण्यात यावी यासंदर्भात नियम ठरविण्यासाठी तसेच प्रारूप तयार करण्यासाठी संबंधित प्रस्ताव परीक्षा मंडळाकडे पाठविण्यात आला. परंतु संबंधित मुद्यावर प्रारूप तयार करण्याचे परीक्षा मंडळाला अधिकारच नाही अशी भूमिका सदस्यांनी घेतल्यामुळे या मुद्याला अजेंड्यावरून हटवावे लागले.
अध्यादेश प्रारूप समितीने प्रस्तावित अध्यादेशाचे प्रारूप तयार केले असून विद्वत्त परिषदेच्या मान्यतेसाठी याला ठेवण्यात आले आहे. त्यामुळेच गुरुवारी विद्वत्त परिषदेची तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे. या प्रारूपाला मान्यता मिळाल्यानंतर त्याला व्यवस्थापन परिषदेकडे पाठविण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Expert approval for the special exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.