शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

आदिवासी आणि ग्रामीणांच्या गरजांवर फोकस करून प्रयोग करावेत : अनुश्री मलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 22:56 IST

वस्तुस्थिती जाणून केलेले प्रयोग अधिक प्रभावी होतात आणि आम्हाला आदिवासी व ग्रामीण गरजांना ध्यानात ठेवून प्रयोग केले पाहिजेत, असे मत आयआयटी, दिल्ली येथील सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड टेक्नालॉजीच्या इन्स्टिट्यूट चेअर प्राध्यापक व प्रमुख अनुश्री मलिक यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देनीरीमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विज्ञानाचे नाव आले तर प्रयोगशाळेचा उल्लेख होतो. प्रयोगशाळेत केवळ उपलब्ध नमुन्यांवर प्रयोग होतात. त्यामुळे विज्ञान केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित न राहता त्याबाहेरील विज्ञानावर लक्ष देण्याची गरज आहे. आम्ही जे प्रयोग करीत आहोत त्याची समाज वा इंडस्ट्रीला गरज आहे का, हे पाहण्याची आवश्यकता आहे. वस्तुस्थिती जाणून केलेले प्रयोग अधिक प्रभावी होतात आणि आम्हाला आदिवासी व ग्रामीण गरजांना ध्यानात ठेवून प्रयोग केले पाहिजेत, असे मत आयआयटी, दिल्ली येथील सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड टेक्नालॉजीच्या इन्स्टिट्यूट चेअर प्राध्यापक व प्रमुख अनुश्री मलिक यांनी येथे व्यक्त केले.राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थानमध्ये (नीरी) राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जवाहर नवोदय विद्यालय, नवेगांव खैरीचे डॉ. जरीन कुरैशी, नीरीचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. हेमंत पुरोहित, डॉ. जे.एस. पांडेय आणि प्रकाश कुंभारे उपस्थित होते.मलिक म्हणाल्या, प्रयोग करताना अनेकदा आम्हाला विफलता मिळते. परंतु निराश न होता पुढे जावे. त्यांनी सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड टेक्नालॉजीतर्फे करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. बायोगॅसवर कार चालविणे, वॉटरलेस युरिनल, महुआच्या फूलांपासून कॅन्डी तयार करणे, उत्पादनातून दुषित पदार्थ वेगळे करणे, बायोडायव्हर्सिटी पार्क विकसित करणे, ८० टक्के वेस्टचा रियूज करणे आदींची माहिती दिली.डॉ. पुरोहित म्हणाले, यावर्षी ‘वुमन इन सायन्स’ ही विज्ञान दिनाची थीम आहे. समाजाच्या विकासात महिलांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी जिजामाता आणि सावित्रीबाई फुले यांची उदाहरणे दिली. डॉ. पांडेय यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. संचालन एस. लांबा आणि प्रकाश कुंंभारे यांनी आभार मानले. या प्रसंगी नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.‘विज्ञान ज्योती’ प्रकल्पाचे उद्घाटनयाप्रसंगी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प ‘विज्ञान ज्योती’चे उद्घाटन करण्यात आले. डॉ. जरीन कुरैशी म्हणाले, भारत सरकारने महिला आणि विद्यार्थिनींमध्ये विज्ञानाची आवड आणि महिला व पुरुष वैज्ञानिकांचे प्रमाण समान करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प सुरू केला आहे. त्याच्या संचालनाची जबाबदारी नवोदय विद्यालय समितीकडे दिली आहे. याअंतर्गत देशातील ५० जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूरचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यातून अकरावी विज्ञान इयत्तेतून ५० मुलींची निवड केली आहे.नवोदय विद्यालयात ५० विद्यार्थिनी नसल्यास तेथील केंद्रीय विद्यालय, केंद्र सरकारच्या शाळा आणि राज्य सरकारच्या शाळांमधून विद्यार्थिनींना निवडण्यात येणार आहे. दरवर्षीकरिता २० लाख रुपये प्रकल्पासाठी वितरित करण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येक विद्यार्थिनीला एक हजार रुपये शिष्यवृत्ती आणि संशोधन कार्यासाठी एक हजार रुपये देण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत वर्षभर वैज्ञानिक, रोल मॉडेलची मुलाखत, एनजीओ, प्रयोगशाळांना भेट, संशोधन कार्य आणि पालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.

टॅग्स :scienceविज्ञानnagpurनागपूर