उष्माघाताची धास्ती !
By Admin | Updated: June 8, 2014 01:19 IST2014-06-08T01:03:30+5:302014-06-08T01:19:16+5:30
शहराचे तापमान ४७ अंशावर गेले आहे. अंगाची लाहीलाही होत असताना सनस्ट्रोकची धास्तीही वाढली आहे. सनस्ट्रोक म्हणजेच उष्माघात. वैद्यकीय भाषेत त्याला म्हणतात हायपरथर्मिया म्हणतात.

उष्माघाताची धास्ती !
नागपूर : शहराचे तापमान ४७ अंशावर गेले आहे. अंगाची लाहीलाही होत असताना सनस्ट्रोकची धास्तीही वाढली आहे. सनस्ट्रोक म्हणजेच उष्माघात. वैद्यकीय भाषेत त्याला म्हणतात हायपरथर्मिया म्हणतात. उपराजधानीत उष्माघाताच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. हा आजार होऊच नये यासाठी प्रत्येकाने जागरुक राहणे आवश्यक आहे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) औषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले, मानवाच्या शरीराचं सामान्य तापमान ३५.९ सेल्सिअस स्थिर असतं.
हवेतला उष्मा वाढला किंवा कमी झाला तरीही शरीराच्या सामान्य तापमानात फारसा बदल होत नाही. तापमान नियंत्रण करणारी यंत्रणा आपल्या त्वचेच्या, रक्ताच्या, मेंदूच्या संरचनेत आहेच. (प्रतिनिधी)
उपाय
या लक्षणांसाठी वैद्यकीय उपचारांची खरं म्हणजे गरजच नसते. भरपूर पाणी पिणं, सैल कपडे घालणं, सुती कपडे वापरणं, घाम पुसून काढणं, पंखा लावणं एवढय़ा उपायांनीच सामान्यत: बरं वाटतं, गुण येतो. ताप वाढत असल्यास गार पाण्याने अगदी बर्फाच्या पाण्याने वारंवार अंग पुसून काढावं. गार पाणी, नारळपाणी, नैसर्गिक सरबतं, फळांचे रस, गूळपाणी दर २0 मिनिटांनी तहान नसली तरीही घोट घोट पीत राहावं. तीव्र लक्षणे दिसताच किंवा ताप आल्यास वैद्यकीय सल्ला घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
मादक पेय टाळावे
उन्हाळ्यात चहा कॉफी उत्तेजक पेयं मुळीच पिऊ नयेत. कोणत्याही स्वरूपातील मादक पेय पिऊ नयेत. विशेषत: बीअर पिऊ नये. बीअरमुळे लघवीचं प्रमाण वाढतं, घाम कमी येतो आणि उष्माघाताची तीव्रता उलट वाढते. सावलीत राहावे. खेळाडूंनी दर २0 मिनिटांनी स्पोर्ट ड्रिंक, लिंबू सरबत, जीवनसत्व कयुक्त पेय, मीठ साखरेचा आणि क्षारांचा समतोल सांभाळणारी पेयं जरूर प्यावीत.
उष्माघात म्हणजे काय?
वाढत्या वातावरणातील तापमानामुळे मानवी शरीराचे तापमान सर्वसाधारण न राहिल्यास शरीरावर होणारा अपाय यास उष्माघात म्हणता येईल. उष्माघात वातावरणातील वाढलेले तापमान व वाढलेल्या आद्र्रतामुळे होतो, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
सामान्य लक्षणे
थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरु त्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानिसक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्ध होणे आदी उष्माघाताची लक्षणे आहेत.
तीव्र लक्षणे
उष्माघाताची लक्षणे वेळेवर ओळखली नाहीत तर तीव्र लक्षणं दिसू लागतात. त्वचा रु क्ष होणे आणि सुरकुतलेली दिसते. जीभ आत ओढली जाते. हृदयाचे ठोके जलद पडू लागतात. उलटी होते. व्यक्ती बेशुद्ध पडते, कोमात जाण्याची शक्यता असते.