शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

नररुपी सैतान राजू बिरहाची फाशी रद्द, हायकोर्टाने सुनावली ३० वर्षे कारावासाची शिक्षा

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: October 31, 2023 16:03 IST

तीन मित्रांची शहाळे कापण्याच्या सत्तूरने निर्घृण हत्या करणारा गुन्हेगार

नागपूर : वागदरा शिवार येथील चहा व पान टपरीच्या जागेवरून वाद झाल्यानंतर तीन मित्रांची शहाळे कापण्याच्या सत्तूरने निर्घृण हत्या करणारा नररुपी सैतान राजू छन्नूलाल बिरहा (५५) याची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने रद्द करून त्याला ३० वर्षे कारावासाची सुधारित शिक्षा सुनावली. न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वाल्मिकी मेनेझेस यांनी मंगळवारी हा निर्णय जाहीर केला.

ही दुर्मिळातली दुर्मिळ घटना नाही. त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नाही. परंतु, आरोपीने तीन जणांची निर्घृण हत्या केली आहे. त्यासाठी त्याला ३० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. तसेच, सरकारला त्याला या शिक्षेत सूट देता येणार नाही, असे उच्च न्यायालय निर्णयात म्हणाले.

सत्र न्यायालयाने बिरहाला २८ डिसेंबर २०२२ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम ३६६ अनुसार या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी त्यावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाने हे प्रकरण उच्च न्यायालयासमक्ष सादर केले होते. तसेच, या शिक्षेविरुद्ध बिरहाने अपील दाखल केले होते. त्यावर गेल्या जुलैमध्ये अंतिम सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला होता.

समाजाला हादरवून सोडणारी ही घटना १७ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी १० च्या सुमारास वागदरा शिवार, ता. हिंगणा येथे घडली होती. मृतांमध्ये सुनील हेमराज कोटांगळे (३१), आशिष ऊर्फ गोलू लहुभान गायकवाड (२६) व कैलाश नारायण बहादुरे (३२) यांचा समावेश आहे. आरोपी राजू बिरहाने अत्यंत क्रूर व अमानवीय पद्धतीने हा गुन्हा केला. त्याने आधी बहादुरेवर हल्ला केला होता. कोटांगळे त्याला वाचविण्यासाठी गेला असता, शरीरात सैतान संचारलेला बिरहा बहादुरेला सोडून कोटांगळेवर तुटून पडला. बिरहाने कोटांगळेच्या पोटावर, गळ्यावर व डोक्यावर सत्तूरचे सपासप वार केले. तो कोटांगळेला ठार करीत असताना जखमी बहादुरे व गायकवाड संदेश सिटीच्या रस्त्याने पळून गेले. त्यामुळे बिरहारने बहादुरेला पाठलाग करून पकडले व त्याचाही निर्घृण खून केला.

दरम्यान, दूरपर्यंत पळून गेलेल्या गायकवाडला बिरहाने दुचाकीवरून पाठलाग करून पकडले व त्यालादेखील जाग्यावरच ठार मारले. आरोपी बिरहा व कोटांगळे हे दोघेही वृंदावन सिटी गृह प्रकल्पापुढे चहा व पान टपरी चालवित होते. उच्च न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. संजय डोईफोडे तर, आरोपीतर्फे वरिष्ठ ॲड. अनिल मार्डीकर व ॲड. सुमित जोशी यांनी कामकाज पाहिले.

बिरहा कुख्यात गुन्हेगार

राजू बिरहा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध नागपुरातील सदर, अंबाझरी व सोनेगाव पोलीस ठाण्यातही विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला हद्दपार केले होते.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर