शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ईव्हीएम हटाव, देश बचाव : वंचित बहुजन आघाडीचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 21:33 IST

ईव्हीएम मशीन या पारदर्शी नाहीत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मोजण्यात आलेली मते, यात बरीच तफावत आढळून आली आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीन या देशाच्या लोकशाहीसाठी घातक असून, त्या निवडणूक प्रक्रियेतून तात्काळ हटवण्यात याव्यात आणि बॅलेट पेपरनेच मतदान घ्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघातर्फे करण्यात आली आहे. ईव्हीएम हटाव, देश बचाव असा नारा देत सोमवारी राज्यभरात घंटानाद करण्यात आला. नागपुरात संविधान चौक येथे शहर अध्यक्ष रवी शेंडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देबॅलेट पेपरनेच निवडणुका घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ईव्हीएम मशीन या पारदर्शी नाहीत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मोजण्यात आलेली मते, यात बरीच तफावत आढळून आली आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीन या देशाच्या लोकशाहीसाठी घातक असून, त्या निवडणूक प्रक्रियेतून तात्काळ हटवण्यात याव्यात आणि बॅलेट पेपरनेच मतदान घ्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघातर्फे करण्यात आली आहे. ईव्हीएम हटाव, देश बचाव असा नारा देत सोमवारी राज्यभरात घंटानाद करण्यात आला. नागपुरात संविधान चौक येथे शहर अध्यक्ष रवी शेंडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.यावेळी रवी शेंडे यांनी सांगितले की, ईव्हीएमबाबत आधीपासूनच संशय आहे. लोकसभा निवडणुकीतही महाराष्ट्रात ईव्हीएममध्ये गडबड दिसून आली. झालेल्या मतदानाच्या तुलनेत मोजण्यात आलेल्या मतांची संख्या अधिक आढळून आली. याबाबत निवडणूक आयोगाने मौन धारण केले आहे. आयोगाच्या धोरणामुळे लोकांच्या मतांची चोरी होत आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, तेव्हा त्यांनी यावर तातडीने कारवाई करावी. याबाबत आमचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यांना काही प्रश्न विचारले आहे. येत्या १५ दिवसात निवडणूक आयोगाने या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न दिल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी संपूर्ण राज्यात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयांवर आंदोलन करण्यात आल्याचेही शेंडे यांनी सांगितले.यावेळी कार्यकर्त्यांनी ईव्हीएमच्या विरोधात घोषणा देत ती हटविण्याची मागणी लावून धरली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्यामार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाला निवेदन सादर करण्यात आले.या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते राजू लोखंडे, प्रदेश महासचिव सागर डबरासे, मिलिंद मेश्राम, अरुण फुलझेले, भाऊराव सोनपिंपळे, अनिता मेश्राम, नालंदा गणवीर, कांचन देवगडे, समिता नंदेश्वर, गोवर्धन बेळे, हरीश नारनवरे, संजय सूर्यवंशी, रमेश कांबळे, अंकुश मोहिले, देवेंद्र मेश्राम, गौतम पाटील, प्रिन्स गवई आदी उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी