शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
5
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
6
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
7
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
8
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
9
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
10
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
11
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
12
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
13
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
14
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
15
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
16
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
17
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
18
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
19
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
20
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
Daily Top 2Weekly Top 5

तलावातील कचरा, जाळ्यामुळे दरवर्षी हजारो पक्षी गमावतात जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2022 14:24 IST

नागपूर जिल्ह्यात दरवर्षी जाळ्यात अडकून १२०० च्यावर पक्ष्यांचा जीव जाताे. यामध्ये परदेशी पक्ष्यांचा समावेश अधिक असल्याचे पक्षीतज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

ठळक मुद्देपरदेशी पक्ष्यांसाठी घातक : तलावावरील प्लास्टिक कचरा, जाळे धोकादायक

नागपूर : हिवाळ्याचा काळ हा पक्ष्यांसाठी महत्त्वाचा असताे. बहुतेक प्रजातीच्या पक्ष्यांचा हा प्रजननाचा काळ असताे. त्यामुळे बरेचसे पक्षी पानथळ जमीन किंवा तलावांकडे वळत असतात. मात्र, सध्या तलावावरील अव्यवस्था या पक्ष्यांसाठी धाेकादायक ठरली आहे. तलाव काठावर असलेला प्लास्टिकचा कचरा आणि मासेमारी करणाऱ्यांचे अस्ताव्यस्त पसरलेले जाळे पक्ष्यांसाठी जीवघेणे ठरत आहेत.

पक्षी अभ्यासकांनी जिल्ह्यातील तलावांवर केलेल्या निरीक्षणानुसार हे भीषण वास्तव मांडले आहे. थंडीचा काळ असल्याने माेठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी विदर्भाकडे पाेहोचले आहेत. अनेक प्रजातींच्या असंख्य पक्ष्यांचा मुक्काम सध्या तलाव परिसर व पानथळ जमिनीवर दिसून येत आहे. यामुळे हा परिसर निरनिराळ्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने फुलला आहे. मात्र, तलाव परिसरात पसरलेला प्लास्टिकचा कचरा आणि मत्स्यजाळे पक्ष्यांच्या जिवावर उठले आहेत.

नागपूर जिल्ह्यात २५० च्यावर तलाव आहेत आणि या बहुतेक तलावांवर मासेमारी केली जाते. पाणथळ भागात पाेषण करणारे पक्षी तलावातील मासे, किडे खाण्यासाठी गर्दी करीत असतात. मात्र, मासेमारी करणाऱ्यांनी टाकलेल्या जाळ्यात हमखास अडकतात. अनेकदा मासे पकडल्यानंतर जाळे काठावर ठेवले जाते. तुटलेले जाळे तसेच फेकून दिले जाते. त्यात अडकून पक्ष्यांचा तडफडत जीव जाताे. दुसरीकडे प्लास्टिकचा कचरा माेठ्या प्रमाणात विखुरलेला असल्याचे दिसून येत आहे. बहुतेक पक्षी जमिनीवर सुरक्षित ठिकाणी अंडी देत असतात. अंडी आणि पिल्ल्यांनाही प्लास्टिकमुळे धाेका उद्भवताे. वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या तलावांचे निरीक्षण करून कचरा हटविण्यात येताे. शिवाय मासेमारी करणाऱ्यांना परवानगी दिली जात नाही. त्यामुळे असे तलाव पक्ष्यांसाठी सुरक्षित ठरतात. मात्र, अशा तलावांची संख्या कमी आहे. पक्षी निरीक्षकांच्या अभ्यासानुसार, केवळ नागपूर जिल्ह्यात दरवर्षी जाळ्यात अडकून १२०० च्यावर पक्ष्यांचा जीव जाताे. यामध्ये परदेशी पक्ष्यांचा समावेश अधिक असल्याचे पक्षीतज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

वनविभागाच्या अखत्यारित तलावांची देखरेख हाेते, पण इतर तलावांवर कुणाचे नियंत्रण नसते. तलावांचे नियंत्रण पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे असते. वनविभागाचा हस्तक्षेप चालत नाही. त्यामुळे या विभागांचा समन्वय असणे गरजेचे आहे. तलावाच्या काठावर जाळे पडून राहणार नाही, या अटींवर मासेमारीला परवानगी द्यायला हवी. शिवाय तलावांची नियमित स्वच्छता हाेणेही गरजेचे आहे.

- यादव तरटे पाटील, मानद वन्यजीव रक्षक.

टॅग्स :environmentपर्यावरणkiteपतंगDeathमृत्यू