शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

तलावातील कचरा, जाळ्यामुळे दरवर्षी हजारो पक्षी गमावतात जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2022 14:24 IST

नागपूर जिल्ह्यात दरवर्षी जाळ्यात अडकून १२०० च्यावर पक्ष्यांचा जीव जाताे. यामध्ये परदेशी पक्ष्यांचा समावेश अधिक असल्याचे पक्षीतज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

ठळक मुद्देपरदेशी पक्ष्यांसाठी घातक : तलावावरील प्लास्टिक कचरा, जाळे धोकादायक

नागपूर : हिवाळ्याचा काळ हा पक्ष्यांसाठी महत्त्वाचा असताे. बहुतेक प्रजातीच्या पक्ष्यांचा हा प्रजननाचा काळ असताे. त्यामुळे बरेचसे पक्षी पानथळ जमीन किंवा तलावांकडे वळत असतात. मात्र, सध्या तलावावरील अव्यवस्था या पक्ष्यांसाठी धाेकादायक ठरली आहे. तलाव काठावर असलेला प्लास्टिकचा कचरा आणि मासेमारी करणाऱ्यांचे अस्ताव्यस्त पसरलेले जाळे पक्ष्यांसाठी जीवघेणे ठरत आहेत.

पक्षी अभ्यासकांनी जिल्ह्यातील तलावांवर केलेल्या निरीक्षणानुसार हे भीषण वास्तव मांडले आहे. थंडीचा काळ असल्याने माेठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी विदर्भाकडे पाेहोचले आहेत. अनेक प्रजातींच्या असंख्य पक्ष्यांचा मुक्काम सध्या तलाव परिसर व पानथळ जमिनीवर दिसून येत आहे. यामुळे हा परिसर निरनिराळ्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने फुलला आहे. मात्र, तलाव परिसरात पसरलेला प्लास्टिकचा कचरा आणि मत्स्यजाळे पक्ष्यांच्या जिवावर उठले आहेत.

नागपूर जिल्ह्यात २५० च्यावर तलाव आहेत आणि या बहुतेक तलावांवर मासेमारी केली जाते. पाणथळ भागात पाेषण करणारे पक्षी तलावातील मासे, किडे खाण्यासाठी गर्दी करीत असतात. मात्र, मासेमारी करणाऱ्यांनी टाकलेल्या जाळ्यात हमखास अडकतात. अनेकदा मासे पकडल्यानंतर जाळे काठावर ठेवले जाते. तुटलेले जाळे तसेच फेकून दिले जाते. त्यात अडकून पक्ष्यांचा तडफडत जीव जाताे. दुसरीकडे प्लास्टिकचा कचरा माेठ्या प्रमाणात विखुरलेला असल्याचे दिसून येत आहे. बहुतेक पक्षी जमिनीवर सुरक्षित ठिकाणी अंडी देत असतात. अंडी आणि पिल्ल्यांनाही प्लास्टिकमुळे धाेका उद्भवताे. वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या तलावांचे निरीक्षण करून कचरा हटविण्यात येताे. शिवाय मासेमारी करणाऱ्यांना परवानगी दिली जात नाही. त्यामुळे असे तलाव पक्ष्यांसाठी सुरक्षित ठरतात. मात्र, अशा तलावांची संख्या कमी आहे. पक्षी निरीक्षकांच्या अभ्यासानुसार, केवळ नागपूर जिल्ह्यात दरवर्षी जाळ्यात अडकून १२०० च्यावर पक्ष्यांचा जीव जाताे. यामध्ये परदेशी पक्ष्यांचा समावेश अधिक असल्याचे पक्षीतज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

वनविभागाच्या अखत्यारित तलावांची देखरेख हाेते, पण इतर तलावांवर कुणाचे नियंत्रण नसते. तलावांचे नियंत्रण पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे असते. वनविभागाचा हस्तक्षेप चालत नाही. त्यामुळे या विभागांचा समन्वय असणे गरजेचे आहे. तलावाच्या काठावर जाळे पडून राहणार नाही, या अटींवर मासेमारीला परवानगी द्यायला हवी. शिवाय तलावांची नियमित स्वच्छता हाेणेही गरजेचे आहे.

- यादव तरटे पाटील, मानद वन्यजीव रक्षक.

टॅग्स :environmentपर्यावरणkiteपतंगDeathमृत्यू