शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

तलावातील कचरा, जाळ्यामुळे दरवर्षी हजारो पक्षी गमावतात जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2022 14:24 IST

नागपूर जिल्ह्यात दरवर्षी जाळ्यात अडकून १२०० च्यावर पक्ष्यांचा जीव जाताे. यामध्ये परदेशी पक्ष्यांचा समावेश अधिक असल्याचे पक्षीतज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

ठळक मुद्देपरदेशी पक्ष्यांसाठी घातक : तलावावरील प्लास्टिक कचरा, जाळे धोकादायक

नागपूर : हिवाळ्याचा काळ हा पक्ष्यांसाठी महत्त्वाचा असताे. बहुतेक प्रजातीच्या पक्ष्यांचा हा प्रजननाचा काळ असताे. त्यामुळे बरेचसे पक्षी पानथळ जमीन किंवा तलावांकडे वळत असतात. मात्र, सध्या तलावावरील अव्यवस्था या पक्ष्यांसाठी धाेकादायक ठरली आहे. तलाव काठावर असलेला प्लास्टिकचा कचरा आणि मासेमारी करणाऱ्यांचे अस्ताव्यस्त पसरलेले जाळे पक्ष्यांसाठी जीवघेणे ठरत आहेत.

पक्षी अभ्यासकांनी जिल्ह्यातील तलावांवर केलेल्या निरीक्षणानुसार हे भीषण वास्तव मांडले आहे. थंडीचा काळ असल्याने माेठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी विदर्भाकडे पाेहोचले आहेत. अनेक प्रजातींच्या असंख्य पक्ष्यांचा मुक्काम सध्या तलाव परिसर व पानथळ जमिनीवर दिसून येत आहे. यामुळे हा परिसर निरनिराळ्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने फुलला आहे. मात्र, तलाव परिसरात पसरलेला प्लास्टिकचा कचरा आणि मत्स्यजाळे पक्ष्यांच्या जिवावर उठले आहेत.

नागपूर जिल्ह्यात २५० च्यावर तलाव आहेत आणि या बहुतेक तलावांवर मासेमारी केली जाते. पाणथळ भागात पाेषण करणारे पक्षी तलावातील मासे, किडे खाण्यासाठी गर्दी करीत असतात. मात्र, मासेमारी करणाऱ्यांनी टाकलेल्या जाळ्यात हमखास अडकतात. अनेकदा मासे पकडल्यानंतर जाळे काठावर ठेवले जाते. तुटलेले जाळे तसेच फेकून दिले जाते. त्यात अडकून पक्ष्यांचा तडफडत जीव जाताे. दुसरीकडे प्लास्टिकचा कचरा माेठ्या प्रमाणात विखुरलेला असल्याचे दिसून येत आहे. बहुतेक पक्षी जमिनीवर सुरक्षित ठिकाणी अंडी देत असतात. अंडी आणि पिल्ल्यांनाही प्लास्टिकमुळे धाेका उद्भवताे. वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या तलावांचे निरीक्षण करून कचरा हटविण्यात येताे. शिवाय मासेमारी करणाऱ्यांना परवानगी दिली जात नाही. त्यामुळे असे तलाव पक्ष्यांसाठी सुरक्षित ठरतात. मात्र, अशा तलावांची संख्या कमी आहे. पक्षी निरीक्षकांच्या अभ्यासानुसार, केवळ नागपूर जिल्ह्यात दरवर्षी जाळ्यात अडकून १२०० च्यावर पक्ष्यांचा जीव जाताे. यामध्ये परदेशी पक्ष्यांचा समावेश अधिक असल्याचे पक्षीतज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

वनविभागाच्या अखत्यारित तलावांची देखरेख हाेते, पण इतर तलावांवर कुणाचे नियंत्रण नसते. तलावांचे नियंत्रण पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे असते. वनविभागाचा हस्तक्षेप चालत नाही. त्यामुळे या विभागांचा समन्वय असणे गरजेचे आहे. तलावाच्या काठावर जाळे पडून राहणार नाही, या अटींवर मासेमारीला परवानगी द्यायला हवी. शिवाय तलावांची नियमित स्वच्छता हाेणेही गरजेचे आहे.

- यादव तरटे पाटील, मानद वन्यजीव रक्षक.

टॅग्स :environmentपर्यावरणkiteपतंगDeathमृत्यू