शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

प्रत्येक व्यक्ती शासन यंत्रणेपेक्षा श्रेष्ठ : शारदा साठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 23:21 IST

देशाची शासन यंत्रणा, न्याययंत्रणा मूठभर लोकांच्या हातात आहे. येथे कायदा करण्यासाठी, झालेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि कायदा रद्द करण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. त्यामुळे एवढी मोठी यंत्रणा उपलब्ध आहे म्हणून निश्चिंत राहणे योग्य नाही. कारण ही यंत्रणा आपण निर्माण केली असून त्यास वळण लावण्याची जबाबदारीही आपलीच आहे. प्रत्येक व्यक्ती शासन यंत्रणेपेक्षा श्रेष्ठ असतो, असे मनोगत मुंबईच्या स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त शारदा साठे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसी.मो. झाडे फाऊंडेशनच्या पुरस्कारांचे थाटात वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाची शासन यंत्रणा, न्याययंत्रणा मूठभर लोकांच्या हातात आहे. येथे कायदा करण्यासाठी, झालेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि कायदा रद्द करण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. त्यामुळे एवढी मोठी यंत्रणा उपलब्ध आहे म्हणून निश्चिंत राहणे योग्य नाही. कारण ही यंत्रणा आपण निर्माण केली असून त्यास वळण लावण्याची जबाबदारीही आपलीच आहे. प्रत्येक व्यक्ती शासन यंत्रणेपेक्षा श्रेष्ठ असतो, असे मनोगत मुंबईच्या स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त शारदा साठे यांनी व्यक्त केले.सी. मो. फाऊंडेशनच्यावतीने विविध पाच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विनोबा विचार केंद्रात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लीलाताई चितळे होत्या. फाऊंडेशनच्या सचिव भारती झाडे, प्रा. सुषमा कल्लावार, सावनेरच्या मूकबधिर विद्यालयाच्या प्राचार्य मंगला समर्थ व्यासपीठावर होत्या. यावेळी सी. मो. झाडे पत्रकारिता पुरस्कार लोकमतच्या उपवृत्तसंपादक सविता देव-हरकरे यांना प्रदान करण्यात आला. याशिवाय फाऊंडेशनतर्फे डॉ. गोविंद समर्थ अपंग सेवाकार्य पुरस्कार कल्याणी ढोले, मीराबेन शाह सामाजिक कार्य पुरस्कार अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी, ना. बा. सपाटे आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. जयश्री कापसे-गावंडे, , डॉ. अतुल कल्लावार आरोग्य सेवा पुरस्कार प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. माधुरी थोरात यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.शारदा साठे पुढे म्हणाल्या, आपला समाज व देश ईश्वर किंवा शासन यंत्रणेवर नाही तर कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न करता सातत्याने समाज सेवेचे काम करणाऱ्या अशा कार्यकर्त्यांमुळे टिकून आहे. चांगला समाज, चांगला देश घडविण्यासाठी प्रत्येकाने समाजातील हिंसाचार, धार्मिक द्वेष, जातीयवादाला मूठमाती देण्याची गरज आहे. निसर्गाकडून मिळालेला हा जन्म माणसांच्या सत्कार्यी लावण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.लीलाताई चितळे यांनी, भूकेने तान्हुले मरतील, अशी व्यवस्था नको, असा उद्वेग व्यक्त केला. देशातील चार व्यवस्था बेकाम होत असून एक व्यवस्था मनमानी करीत आहे. ही अव्यवस्था दूर करण्यासाठी प्रत्येकाने उभे राहणे गरजेचे आहे. आज देशाचे स्वातंत्र्य गोंधळात असून ही अवस्था पाहून एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून मन उदास होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.समाज व सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले तर निर्भयता निर्माण होईल व कोणतीही सत्ता ही समाजव्यवस्था बिघडविण्याचे धाडस करणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना सविता देव-हरकरे यांनी पुरस्काराची राशी गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्राला देण्याचे जाहीर केले. प्रास्ताविक फाऊंडेशनच्या सचिव भारती झाडे यांनी केले. संचालन दुर्गा समर्थ यांनी केले व मंगला समर्थ यांनी आभार मानले.

 

टॅग्स :nagpurनागपूरSocialसामाजिक