शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

पेंच प्रकल्प परिसरातील प्रत्येक शेतकऱ्यास विहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 10:55 PM

मध्य प्रदेशात बांधण्यात आलेल्या धरणामुळे पेंच प्रकल्पातील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तेव्हा पाणीसाठा वाढविण्यासाठी १०२० कोटीचा एक प्रस्ताव तयार करण्यात आला असून सिंचनासाठी पेंच प्रकल्प परिसरातील प्रत्येक शेतकऱ्यांना विहीर बांधून देण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे : १०२० कोटीचा शासनास प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशात बांधण्यात आलेल्या धरणामुळे पेंच प्रकल्पातील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तेव्हा पाणीसाठा वाढविण्यासाठी १०२० कोटीचा एक प्रस्ताव तयार करण्यात आला असून सिंचनासाठी पेंच प्रकल्प परिसरातील प्रत्येक शेतकऱ्यांना विहीर बांधून देण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी विविध योजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शेतकरी कर्जमाफी व कर्ज वाटपावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. आतापर्यंत २०० कोटींचे कर्जवाटप करण्यात आले असून तालुका स्तरावर शिबिर लावण्यात येत आहे. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या बँकेच्या शाखेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव आरबीआयकडे पाठविण्यात येईल. तसेच त्या बँकेतून शासकीय ठेवीही काढून घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, अन्नधान्य पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, लीलाधर वार्डेकर उपस्थित होते.साडेआठ लाख नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभपालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, अन्न सुरक्षा अभियानांतर्गत २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदूळ देण्यात येते. या लाभासाठी शहरी भागात ५० हजार रुपये तर ग्रामीण भागासाठी ४४ हजार रुपये वार्षिक उत्पन्नाची अट आहे. जुन्या निकषामुळे जिल्ह्यात १ लाख ६१ हजार २० कार्डधारक लाभ घेण्यास अपात्र ठरले होते. मात्र आता नवीन निकषामुळे जिल्ह्यातील जवळपास सव्वा लाख कार्डधारकांना म्हणजेच जवळपास साडेआठ लाख नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळेल. यासाठी त्यांना फक्त हमी व वार्षिक उत्पन्न निकषात असल्याची माहिती द्यायची आहे.एनआयटी बरखास्तीची कारणे न्यायालयास सांगूशहरात एकच विकास संस्था हवी, या मताचे शासन आहे. त्यामुळेच एनआयटी (नागपूर सुधार प्रन्यास) बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. एनआयटीकडे असलेल्या योजना आणि मालमत्ता हस्तांतरणाचा प्रश्न आहे. त्याच्या अविकसित क्षेत्राचा विकासाचा मुद्दा आहे. यावर अद्याप तोडगा निघायचा आहे. तो लवकरच निघेल. एनआयटी बरखास्तीबाबतची योग्य बाजू कोर्टात मांडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेFarmerशेतकरी