शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

अखेर त्यांनी थाटली भाज्यांची दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 22:11 IST

कोरोना विषाणूच्या संक्रमणाने अनेक उद्योग-व्यवसाय बंद झाले असून लोकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. बेरोजगार झालेल्या लोकांनी शहरात रस्त्याच्या कडेला आणि गल्लीबोळात भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने थाटली आहेत.

ठळक मुद्देभाजीविक्रेत्यांची पूर्वीपेक्षा दुप्पट गर्दी : कोरोना नियमांचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या संक्रमणाने अनेक उद्योग-व्यवसाय बंद झाले असून लोकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. बेरोजगार झालेल्या लोकांनी शहरात रस्त्याच्या कडेला आणि गल्लीबोळात भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने थाटली आहेत. संबंधित विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता सुरू झालेल्या या दुकानांवर प्रशासनाच्या सूचनांचे पालन होत नसल्याने कोरोनाचा धोका आणखीच वाढला आहे.पूर्वीच्या तुलनेत अशी दुकाने दुप्पट झाली आहेत. कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी बेरोजगारांनी ही पावले उचलली असली तरी संकटकाळात त्यांच्यावर शासनाने नियंत्रण ठेवावे, अशी मागणी पुढे आली आहे.मनपा आयुक्तांनी मुख्य बाजार बंद करून शहराच्या विविध भागात सुरू केलेले भाजीबाजार आता बंद झाले आहेत. त्या बाजारातील विक्रेत्यांनी खुल्या जागेवर भाजी आणि फळांची दुकाने थाटली आहे. नंदनवन, जगनाडे चौक, महाल, झेंडा चौक, सक्करदरा, दिघोरी या भागात मोकळ्या जागेवर दुकाने सुरू आहेत. एवढेच नव्हे तर त्यातील अनेकजण पहिल्यांदाच भाजी विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. सदर प्रतिनिधीने या सर्व दुकानांची पाहणी केली असता या सर्व दुकानदारांनी प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही. पण या दुकानांवर सॅनिटायझरची व्यवस्था दिसून आली.सक्करदरा परिसरातील सोमवारी क्वॉर्टर येथील बाजार बंद केल्यानंतरही भाजीविक्रेत्यांनी क्रीडा चौकात दुकाने सुरू केली आहेत. नंदनवन मार्गावरही अनेकांनी दुकाने लावली आहेत. अनेकजण कळमन्यात भाज्यांची विक्री न करता नंदनवन मार्गावर गाड्या लावून भाज्यांची विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. तिरंगा चौक, गुरुदेवनगर, नंदनवन ते हसनबाग मार्ग, उमरेड रोड, दिघोरी, मोठा ताजबाग, म्हाळगीनगर, हुडकेश्वर, मानेवाडा, बेसा, नरेंद्रनगर, खामला, जयताळा, हिंगणा रोड या परिसरातील प्रमुख मार्गांवर भाजी विक्रेत्यांची गर्दी वाढली आहे.तर वाढू शकतात रुग्ण!कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारचा प्रयत्न आहे. मात्र असे विक्रेते नियमांचे उल्लंघन करून प्रशासनाच्या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत. या विक्रेत्यांकडे नागरिक मास्क न लावता खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांच्या अशा निष्काळजीपणामुळे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवर ताण वाढत आहे. याकरिता प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे काही नागरिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार