शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

अखेर त्यांनी थाटली भाज्यांची दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 22:11 IST

कोरोना विषाणूच्या संक्रमणाने अनेक उद्योग-व्यवसाय बंद झाले असून लोकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. बेरोजगार झालेल्या लोकांनी शहरात रस्त्याच्या कडेला आणि गल्लीबोळात भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने थाटली आहेत.

ठळक मुद्देभाजीविक्रेत्यांची पूर्वीपेक्षा दुप्पट गर्दी : कोरोना नियमांचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या संक्रमणाने अनेक उद्योग-व्यवसाय बंद झाले असून लोकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. बेरोजगार झालेल्या लोकांनी शहरात रस्त्याच्या कडेला आणि गल्लीबोळात भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने थाटली आहेत. संबंधित विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता सुरू झालेल्या या दुकानांवर प्रशासनाच्या सूचनांचे पालन होत नसल्याने कोरोनाचा धोका आणखीच वाढला आहे.पूर्वीच्या तुलनेत अशी दुकाने दुप्पट झाली आहेत. कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी बेरोजगारांनी ही पावले उचलली असली तरी संकटकाळात त्यांच्यावर शासनाने नियंत्रण ठेवावे, अशी मागणी पुढे आली आहे.मनपा आयुक्तांनी मुख्य बाजार बंद करून शहराच्या विविध भागात सुरू केलेले भाजीबाजार आता बंद झाले आहेत. त्या बाजारातील विक्रेत्यांनी खुल्या जागेवर भाजी आणि फळांची दुकाने थाटली आहे. नंदनवन, जगनाडे चौक, महाल, झेंडा चौक, सक्करदरा, दिघोरी या भागात मोकळ्या जागेवर दुकाने सुरू आहेत. एवढेच नव्हे तर त्यातील अनेकजण पहिल्यांदाच भाजी विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. सदर प्रतिनिधीने या सर्व दुकानांची पाहणी केली असता या सर्व दुकानदारांनी प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही. पण या दुकानांवर सॅनिटायझरची व्यवस्था दिसून आली.सक्करदरा परिसरातील सोमवारी क्वॉर्टर येथील बाजार बंद केल्यानंतरही भाजीविक्रेत्यांनी क्रीडा चौकात दुकाने सुरू केली आहेत. नंदनवन मार्गावरही अनेकांनी दुकाने लावली आहेत. अनेकजण कळमन्यात भाज्यांची विक्री न करता नंदनवन मार्गावर गाड्या लावून भाज्यांची विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. तिरंगा चौक, गुरुदेवनगर, नंदनवन ते हसनबाग मार्ग, उमरेड रोड, दिघोरी, मोठा ताजबाग, म्हाळगीनगर, हुडकेश्वर, मानेवाडा, बेसा, नरेंद्रनगर, खामला, जयताळा, हिंगणा रोड या परिसरातील प्रमुख मार्गांवर भाजी विक्रेत्यांची गर्दी वाढली आहे.तर वाढू शकतात रुग्ण!कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारचा प्रयत्न आहे. मात्र असे विक्रेते नियमांचे उल्लंघन करून प्रशासनाच्या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत. या विक्रेत्यांकडे नागरिक मास्क न लावता खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांच्या अशा निष्काळजीपणामुळे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवर ताण वाढत आहे. याकरिता प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे काही नागरिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार