शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
3
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
4
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
5
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
7
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
8
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
9
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
10
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
11
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
12
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
13
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
14
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
15
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
16
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
17
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
18
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
19
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
20
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती

अखेर त्यांनी थाटली भाज्यांची दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 22:11 IST

कोरोना विषाणूच्या संक्रमणाने अनेक उद्योग-व्यवसाय बंद झाले असून लोकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. बेरोजगार झालेल्या लोकांनी शहरात रस्त्याच्या कडेला आणि गल्लीबोळात भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने थाटली आहेत.

ठळक मुद्देभाजीविक्रेत्यांची पूर्वीपेक्षा दुप्पट गर्दी : कोरोना नियमांचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या संक्रमणाने अनेक उद्योग-व्यवसाय बंद झाले असून लोकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. बेरोजगार झालेल्या लोकांनी शहरात रस्त्याच्या कडेला आणि गल्लीबोळात भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने थाटली आहेत. संबंधित विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता सुरू झालेल्या या दुकानांवर प्रशासनाच्या सूचनांचे पालन होत नसल्याने कोरोनाचा धोका आणखीच वाढला आहे.पूर्वीच्या तुलनेत अशी दुकाने दुप्पट झाली आहेत. कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी बेरोजगारांनी ही पावले उचलली असली तरी संकटकाळात त्यांच्यावर शासनाने नियंत्रण ठेवावे, अशी मागणी पुढे आली आहे.मनपा आयुक्तांनी मुख्य बाजार बंद करून शहराच्या विविध भागात सुरू केलेले भाजीबाजार आता बंद झाले आहेत. त्या बाजारातील विक्रेत्यांनी खुल्या जागेवर भाजी आणि फळांची दुकाने थाटली आहे. नंदनवन, जगनाडे चौक, महाल, झेंडा चौक, सक्करदरा, दिघोरी या भागात मोकळ्या जागेवर दुकाने सुरू आहेत. एवढेच नव्हे तर त्यातील अनेकजण पहिल्यांदाच भाजी विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. सदर प्रतिनिधीने या सर्व दुकानांची पाहणी केली असता या सर्व दुकानदारांनी प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही. पण या दुकानांवर सॅनिटायझरची व्यवस्था दिसून आली.सक्करदरा परिसरातील सोमवारी क्वॉर्टर येथील बाजार बंद केल्यानंतरही भाजीविक्रेत्यांनी क्रीडा चौकात दुकाने सुरू केली आहेत. नंदनवन मार्गावरही अनेकांनी दुकाने लावली आहेत. अनेकजण कळमन्यात भाज्यांची विक्री न करता नंदनवन मार्गावर गाड्या लावून भाज्यांची विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. तिरंगा चौक, गुरुदेवनगर, नंदनवन ते हसनबाग मार्ग, उमरेड रोड, दिघोरी, मोठा ताजबाग, म्हाळगीनगर, हुडकेश्वर, मानेवाडा, बेसा, नरेंद्रनगर, खामला, जयताळा, हिंगणा रोड या परिसरातील प्रमुख मार्गांवर भाजी विक्रेत्यांची गर्दी वाढली आहे.तर वाढू शकतात रुग्ण!कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारचा प्रयत्न आहे. मात्र असे विक्रेते नियमांचे उल्लंघन करून प्रशासनाच्या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत. या विक्रेत्यांकडे नागरिक मास्क न लावता खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांच्या अशा निष्काळजीपणामुळे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवर ताण वाढत आहे. याकरिता प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे काही नागरिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार