शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आकाश कोसळले तरी, न्यायदान थांबायला नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 3:09 PM

Nagpur News आकाश कोसळले तरी, न्यायदान सुरू राहिले पाहिजे असे मत देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे कोरोनामुळे देशात धोकादायक परिस्थिती

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनामुळे देशात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, या परिस्थितीतही न्यायदान प्रक्रिया थांबवली जाऊ शकत नाही. आकाश कोसळले तरी, न्यायदान सुरू राहिले पाहिजे असे मत देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाद्वारे रामगिरी परिसरातील न्यायिक अधिकारी प्रशिक्षण केंद्रात स्थापित ई-रिसोर्स सेंटरचे शनिवारी दुपारी न्या. बोबडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनामुळे न्यायालयांमध्ये नियमित पद्धतीने कामकाज करणे अशक्य होते. परिणामी तातडीने आवश्यक उपाययोजना करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रकरणे ऐकायला सुरुवात केली. न्यायदान प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी न्याय व्यवस्थेतील प्रत्येक घटकाने परिश्रम घेतले. आगामी आव्हानांनाही असेच तोंड देऊन पुढे जायचे आहे असे न्या. बोबडे यांनी सांगितले.

न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू केल्यानंतर वकिलांमधील असमानतेचा प्रश्न पुढे आला. काही वकिलांकडे तंत्रज्ञान होते तर, काहींकडे नव्हते. न्यायदान प्रक्रिया बाधित होऊ नये आणि सर्वांना समान संधी मिळावी याकरिता सदर समस्येवर उपाय करणे आवश्यक होते. ई-रिसोर्स सेंटर त्याचाच भाग आहे. या सेंटरमधून गरजू वकिलांना देशातील कोणत्याही न्यायालयात याचिका दाखल करता येतील. तसेच, ऑनलाईन सुनावणीत सहभागी होता येईल. देशातील या पहिल्या सेंटरला देशाचा केंद्र बिंदू असलेल्या नागपुरातून सुरुवात करण्यात आली आहे. लवकरच संपूर्ण देशामध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती न्या. बोबडे यांनी दिली.

प्रलंबित प्रकरणाचा प्रश्न भेडसावेल

कोरोनामुळे सर्व न्यायालयांमध्ये केवळ अत्यावश्यक व तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी घेतली जात आहे. परिणामी, येणाऱ्या काळात प्रलंबित प्रकरणांचा प्रश्न भेडसावेल याकडे न्या. बोबडे यांनी लक्ष वेधले. तसेच, या समस्येतून बाहेर पडण्यासाठी मध्यस्थी न्यायव्यवस्थेचा उपयोग करणे अत्यावश्यक ठरेल असे सांगून या उपायाचा गांभिर्याने विचार करण्याचे पक्षकारांना आवाहन केले.

टॅग्स :Courtन्यायालय