शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पावसाळा आला तरी रस्त्यांची दुरुस्ती नाही; मुख्यमार्ग चकाचक अन् ग्रामीणमध्ये खड्डेच खड्डे !

By गणेश हुड | Updated: June 24, 2023 17:28 IST

निधीसाठी शासनाचा हात आखडता

नागपूर : जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख रस्ते चकाचक झाले आहेत. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण मार्ग व इतर मार्गांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे आहेत. पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेले रस्ते मागील सात-आठ वर्षात दुरुस्त झाले नसल्याने पावसाळ्यात ग्रामीण भागातील लोकांना अडचणंचा सामना करावा लागणार आहे. रस्ते नादुरुस्त असल्याने अनेक गावातील एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. 

मागील वर्षाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते व पूल वाहून गेले होते. काही गावातील रस्त्यांवरून वाहतूक करणे कठीण झाले आहे. याचा विचार करता ग्रामीण रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत शासनाकडे ६० कोटींची मागणी केली होती. मात्र फक्त ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून पुलाचे बांधकामही शक्य नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

तिवृष्टीमुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात इतर जिल्हा मार्ग (ओडीआर) आणि ग्रामीण मार्ग (व्हीआर), पुलांचे दरवर्षी मोठे नुकसान होते.  या रस्ते पुलांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून सरकारकडे निधीच्या मागणीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले. गेल्या पाच वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते, पुलांच्या दुरूस्तीसाठी जि.प.कडून सरकारकडे ३२९ कोटींच्यावर निधीच्या मागणीचे प्रस्ताव सादर करण्यात आले. मात्र शासनाकडून फक्त ११५ कोटी मिळाले. 

मागितले ६६ कोटी मिळाले ५ कोटी

 २०२१-२२ या वर्षात जि.प.च्या बांधकाम विभागाला ४५ कोटींचा निधी मंजूर होता. तर  २०२२-२३ या वर्षात ४७ कोटींची मागणी जिल्हा नियोजनकडे केली होती. परंतु ४५ कोटी कामांनाच स्थगिती होती. तर २०२३-२४ या वर्षात ६६ कोटींची मागणी केली होती. मात्र जिल्हा नियोजनकडून फक्त ५ कोटींचा निधी मिळाला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूरRainपाऊस