शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा आला तरी रस्त्यांची दुरुस्ती नाही; मुख्यमार्ग चकाचक अन् ग्रामीणमध्ये खड्डेच खड्डे !

By गणेश हुड | Updated: June 24, 2023 17:28 IST

निधीसाठी शासनाचा हात आखडता

नागपूर : जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख रस्ते चकाचक झाले आहेत. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण मार्ग व इतर मार्गांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे आहेत. पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेले रस्ते मागील सात-आठ वर्षात दुरुस्त झाले नसल्याने पावसाळ्यात ग्रामीण भागातील लोकांना अडचणंचा सामना करावा लागणार आहे. रस्ते नादुरुस्त असल्याने अनेक गावातील एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. 

मागील वर्षाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते व पूल वाहून गेले होते. काही गावातील रस्त्यांवरून वाहतूक करणे कठीण झाले आहे. याचा विचार करता ग्रामीण रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत शासनाकडे ६० कोटींची मागणी केली होती. मात्र फक्त ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून पुलाचे बांधकामही शक्य नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

तिवृष्टीमुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात इतर जिल्हा मार्ग (ओडीआर) आणि ग्रामीण मार्ग (व्हीआर), पुलांचे दरवर्षी मोठे नुकसान होते.  या रस्ते पुलांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून सरकारकडे निधीच्या मागणीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले. गेल्या पाच वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते, पुलांच्या दुरूस्तीसाठी जि.प.कडून सरकारकडे ३२९ कोटींच्यावर निधीच्या मागणीचे प्रस्ताव सादर करण्यात आले. मात्र शासनाकडून फक्त ११५ कोटी मिळाले. 

मागितले ६६ कोटी मिळाले ५ कोटी

 २०२१-२२ या वर्षात जि.प.च्या बांधकाम विभागाला ४५ कोटींचा निधी मंजूर होता. तर  २०२२-२३ या वर्षात ४७ कोटींची मागणी जिल्हा नियोजनकडे केली होती. परंतु ४५ कोटी कामांनाच स्थगिती होती. तर २०२३-२४ या वर्षात ६६ कोटींची मागणी केली होती. मात्र जिल्हा नियोजनकडून फक्त ५ कोटींचा निधी मिळाला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूरRainपाऊस