शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

पावसाळा आला तरी रस्त्यांची दुरुस्ती नाही; मुख्यमार्ग चकाचक अन् ग्रामीणमध्ये खड्डेच खड्डे !

By गणेश हुड | Updated: June 24, 2023 17:28 IST

निधीसाठी शासनाचा हात आखडता

नागपूर : जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख रस्ते चकाचक झाले आहेत. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण मार्ग व इतर मार्गांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे आहेत. पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेले रस्ते मागील सात-आठ वर्षात दुरुस्त झाले नसल्याने पावसाळ्यात ग्रामीण भागातील लोकांना अडचणंचा सामना करावा लागणार आहे. रस्ते नादुरुस्त असल्याने अनेक गावातील एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. 

मागील वर्षाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते व पूल वाहून गेले होते. काही गावातील रस्त्यांवरून वाहतूक करणे कठीण झाले आहे. याचा विचार करता ग्रामीण रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत शासनाकडे ६० कोटींची मागणी केली होती. मात्र फक्त ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून पुलाचे बांधकामही शक्य नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

तिवृष्टीमुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात इतर जिल्हा मार्ग (ओडीआर) आणि ग्रामीण मार्ग (व्हीआर), पुलांचे दरवर्षी मोठे नुकसान होते.  या रस्ते पुलांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून सरकारकडे निधीच्या मागणीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले. गेल्या पाच वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते, पुलांच्या दुरूस्तीसाठी जि.प.कडून सरकारकडे ३२९ कोटींच्यावर निधीच्या मागणीचे प्रस्ताव सादर करण्यात आले. मात्र शासनाकडून फक्त ११५ कोटी मिळाले. 

मागितले ६६ कोटी मिळाले ५ कोटी

 २०२१-२२ या वर्षात जि.प.च्या बांधकाम विभागाला ४५ कोटींचा निधी मंजूर होता. तर  २०२२-२३ या वर्षात ४७ कोटींची मागणी जिल्हा नियोजनकडे केली होती. परंतु ४५ कोटी कामांनाच स्थगिती होती. तर २०२३-२४ या वर्षात ६६ कोटींची मागणी केली होती. मात्र जिल्हा नियोजनकडून फक्त ५ कोटींचा निधी मिळाला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूरRainपाऊस