शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

कुणीही हिंसाचार केला तरी सरकार त्याला सोडणार नाही

By योगेश पांडे | Updated: August 4, 2025 20:27 IST

चंद्रशेखर बावनकुळे : उद्धव ठाकरेंनी उरल्या सुरल्या कार्यकर्त्यांना सांभाळावे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परत एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आता त्यांच्या पक्षात जे उरले सुरले कार्यकर्ते आहे ते सांभाळण्यावर भर दिला पाहिजे. जर त्यांच्या पक्षातील किंवा कुणीही हिंसाचाराबाबत बोलत असेल तर सरकार गंभीरतेने पावले उचले. कुणीही हिंसाचार केला तरी सरकार त्याला सोडणार नाही, या शब्दांत बावनकुळे यांनी विरोधकांना इशाराच दिला आहे. सोमवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा काळ आता गेला. आता कायद्याचे राज्य आहे, हिंसाचार केल्यास सरकार चूप बसणार नाही आणि सरकार सोडणार नाही. कुठे हिंसाचार करते ते आम्ही बघू किती धमक आहे, असे बावनकुळे म्हणाले. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे सनातन धर्माविरोधात मत मिळवण्यासाठी वक्तव्य करत असतात. त्यांनी हिंदू धर्माबद्दल असे वादग्रस्त वक्तव्य केले तरी ते निवडून येणार नाही. हिंदू समाजाच्या भावना भडकवण्याचा काम जितेंद्र आव्हाड यांनी करू नये असेदेखील बावनकुळे म्हणाले.

उद्या जरी निवडणूक झाल्यास तरी आम्हीच जिंकणारउद्या जरी स्थानिक स्वराज्य निवडणूक झाल्यास भाजप तयार आहे. प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बूथपर्यंत आमचे संघटन झाले आहे.कार्यकारिणी पूर्ण झाल्या आहेत. विधानसभामध्ये ५१.७८ टक्के मत घेऊन आम्ही जिंकलो होतो. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही जिंकणार असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला.

महसूल परिषदेत साडेतीनशे सुधारणा सुचविल्यानागपूर येथे झालेल्या दोन दिवसीय महसूल परिषदेमध्ये अधिकाऱ्यांनी जवळपास साडेतीनशे सुधारणा सुचविल्या आहेत. महसूल परिषदेमध्ये विषयावर अभ्यासगट तयार करून महसुली प्रशासनात काय बदल केले पाहिजे, जुने कायदे कालबाह्य झाले आहे, त्यात काय बदल केले पाहिजे, जिल्हा नियोजनमध्ये काय बदल केले पाहिजे यावर सर्व जिल्हाधिकाऱ्या सोबत चर्चा झाली आहे. २०३५ चा विकसित महाराष्ट्र आणि त्यासाठी लागणारे महसूल खात्याचे काम यासाठी दिशा देण्याचे नियोजन या बैठकीत झाले आहे. एकही तक्रार किवा अर्ज येणार नाही असा महसूल विभाग तयार करायचा आहे, असे बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरे