शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

तंबी नंतरही मर्जीतील कर्मचारी ‘रिलिव्ह ’नाही’, अनेक कर्मचारी मूळ कार्यालयातच

By गणेश हुड | Updated: July 19, 2023 16:15 IST

बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नाही

नागपूर : मे महिन्यात जिल्हा परिषदेत बदल्यांची प्रक्रिया पार पडली. सर्व विभागांतील १५८ कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यांना ३० जून पर्यंत बदलीच्या ठिकाणी रुजू व्हायचे होते. मात्र, विभागप्रमुखांनी आपल्या मर्जीतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना अद्यापही कार्यमुक्त केलेले नाही.  विशेष म्हणजे  मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी विभागप्रमुखांना तंबी दिल्यानंतरही मर्जीतील कर्मचाऱ्यांना विभाग प्रमुखांनी रिलिव्ह केलेले नाही. 

बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ रिलिव्ह करा, अन्यथ नवीन बदली होवून आलेल्या कर्मचाऱ्यांना रुजू करून घेता येणार नाही. असे शर्मा यांनी निर्देश दिले. जि.प. मुख्यालयात बदली करण्यात आलेले कर्मचारी येथे येण्यास उत्सुक नसल्याचे चित्र आहे. काहींनी प्रतिनियुक्तीने सोयीच्या जागेसाठी प्रयत्न चालविले आहे. शासनाने ३० जून पर्यत बदल्यांना मुदतवाढ दिली होती. बदल्यांची प्रक्रीया पारदर्शक पार पडली असताना अनेक कर्मचारी आपला मूळ विभाग सोडण्यात तयार नसल्याचे दिसते. 

सीईओंच्या भूमिकेकडे लक्ष

प्रशासकीय बदलीनंतरही विभागप्रमुखांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करणे हा शिस्तभंगाचा प्रकार आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यासंदर्भात वारंवार सूचना, निर्देश देण्यात आले. त्यानंतरही संबंधितांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. बदलीनंतरही संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन जुन्याच विभागातून काढले जात असल्याने सीईओ सौम्या शर्मा काय भूमिका घेतात याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदTransferबदलीnagpurनागपूरEmployeeकर्मचारी