शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

अवकाळी पाऊस व गारपिट : नागपूर जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 20:47 IST

मागील तीन दिवसात नागपुरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज : ५ तालुक्यातील ११६ गावांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील तीन दिवसात नागपुरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहे. येत्या १० दिवसात सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईल.३१ डिसेंबर, आणि १ व २ जानेवारी या दिवशी नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. वादळ वाऱ्यासह गारपीटही झाली. यामुळे कापूस, सोयाबीन, तूर , हरभरा, गहू या पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी व लोकप्रनिधींनुसार जवळपास ५० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. परंतु जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कापसाचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील जवळपास १३ हजार हेक्टरवरील कापसाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संत्रा व मोसंबीचे ४ हजार हेक्टरवरील फळांचे नुकसान झाले आहे.तर ३ हजार हेक्टरवरील तुरीचेही नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कळमेश्वर, काटोल, सावनेर, रामटेक, नागपूर ग्रामीणचा काही भाग अशा ५ तालुक्यातील ११६ गावांना या गारपिटीचा फटका बसल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगितले जाते. सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आलेले आहेत. येत्यादहा दिवसात सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईल.सर्वेक्षणाचे काम सुरुगारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रशासनाच्या प्राथमिक अंदजानुसार २२ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ह अहवाल सरकारकडे पाठवण्यात आला आहे. सर्वेक्षणाचे काम आजपासून सुरु झाले आहे.रवींद्र ठाकरेजिल्हाधिकारी नागपूर

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर