शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
2
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
3
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
4
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
5
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
6
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
7
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
8
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान
9
दिवाळी पाडवा २०२५: १० राशींना गुड न्यूज, समस्या संपतील; भाग्योदय-भरभराट, इच्छापूर्तीचा काळ!
10
Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी
11
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
12
Ashwin Amavasya 2025:अमावस्या तिथीला अमावस्याच का म्हणतात? वाचा ही रहस्य उलगडणारी कथा
13
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
14
वीरेंद्र सेहवागच्या 'फॅमिली फोटो'तून पत्नी आरती गायब; नात्यात दुराव्याच्या चर्चांना खतपाणी
15
टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
16
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
17
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
18
IND vs AUS : दिवाळीच्या शुभेच्छा! विमानतळावर विराट-रोहितची चाहत्यांसोबत सेल्फी अन् बरंच काही (VIDEO)
19
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
20
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!

पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारामुळे नागपुरात हजारो झाडांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 20:56 IST

बांधकाम व विकास प्रकल्पामुळे शहरातील वृक्षतोड वाढली आहे. परंतु त्याचवेळी महापालिकेने शहरातील प्रमुख दहनघाटावर अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर न करता गोवरी व मोक्षकाष्ठ वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच हजारो झाडांना जीवदान मिळत आहे.

ठळक मुद्देगोवऱ्या व मोक्षकाष्ठाचा वापर : नागपूर शहरातील नागरिकांचाही प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बांधकाम व विकास प्रकल्पामुळे शहरातील वृक्षतोड वाढली आहे. परंतु त्याचवेळी महापालिकेने शहरातील प्रमुख दहनघाटावर अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर न करता गोवरी व मोक्षकाष्ठ वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच हजारो झाडांना जीवदान मिळत आहे.२०१३ मध्ये पर्यावरणपूरक पथदर्शी प्रकल्प म्हणून अंबाझरी घाटाची निवड करण्यात आली होती. सुरुवातीला या उपक्रमाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु जनजागृती व नागरिकांची पर्यावरणाविषयीची जागरूक ता यामुळे हळूहळू या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद वाढत गेला. आता महापालिकेच्या अंबाझरी, मोक्षधाम, मानेवाडा व मानकापूर यासह प्रमुख दहनघाटावर अंत्यसंस्कारासाठी गोवरी व मोक्षकाष्ठ याचा वापर केला जात आहे. लाकडाचा वापर थांबल्याने हजारो वृक्षांना जीवनदान मिळाले आहे.मनपातर्फे पर्यावरण रक्षणार्थ अनेक प्रयत्न करण्यात येतात. यात झाडे लावणे, झाडे जगवणे, नद्या स्वच्छ करणे, प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर नियंत्रण ठेवणे, पर्यावरणपूरक दहनाची व्यवस्था आदींचा समावेश आहे. झाडे वाचविण्यासाठी शहरातील अंबाझरी व मोक्षधाम दहनघाटावर एलपीजी शवदाहिनी व गंगाबाई तसेच वैशालीनगर घाटावर शवदाहिनी लावलेली आहे. अन्य दहनघाटावर एलपीजी दाहिनी लावणे प्रस्तावित आहे. पाच दहनघाटावर शेणाच्या गोवऱ्या व मोक्षकाष्ठ यांचा उपयोग करून अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली आहे.७,२०० झाडांना जीवनदानदर महिन्याला सुमारे ३०० अंत्यसंस्कार पर्यावरणपूरक पद्धतीने केले जातात. नागपूर शहरात अंत्यसंस्कारासाठी मोक्षकाष्ठ व गोवऱ्यांचा वापर होत असल्याने दर महिन्याला १५ वर्षे वयाच्या सुमारे ६०० झाडांना जीवदान दिले जात आहे. एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी १५ ते २० वर्षे वयाच्या दोन वृक्षांचा बळी जातो. त्यानुसार आता या शहरात एका महिन्यात सुमारे ६०० आणि एका वर्षात सुमारे ७,२०० झाडांना जीवदान मिळत आहे.कोट्यवधी वृक्ष वाचतीलपर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची पद्धत संपूर्ण राज्यात लागू झाली तर कोट्यवधी वृक्ष वाचवण्यात यश येईल. पर्यावरण संवर्धनाला मोठी मदत होणार आहे. महापालिकेने ही संकल्पना मांडली, परंतु नागरिकांनीही याला प्रतिसाद दिल्याने हा उपक्रम राबविणे शक्य झाले आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणnagpurनागपूर