शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारामुळे नागपुरात हजारो झाडांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 20:56 IST

बांधकाम व विकास प्रकल्पामुळे शहरातील वृक्षतोड वाढली आहे. परंतु त्याचवेळी महापालिकेने शहरातील प्रमुख दहनघाटावर अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर न करता गोवरी व मोक्षकाष्ठ वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच हजारो झाडांना जीवदान मिळत आहे.

ठळक मुद्देगोवऱ्या व मोक्षकाष्ठाचा वापर : नागपूर शहरातील नागरिकांचाही प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बांधकाम व विकास प्रकल्पामुळे शहरातील वृक्षतोड वाढली आहे. परंतु त्याचवेळी महापालिकेने शहरातील प्रमुख दहनघाटावर अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर न करता गोवरी व मोक्षकाष्ठ वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच हजारो झाडांना जीवदान मिळत आहे.२०१३ मध्ये पर्यावरणपूरक पथदर्शी प्रकल्प म्हणून अंबाझरी घाटाची निवड करण्यात आली होती. सुरुवातीला या उपक्रमाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु जनजागृती व नागरिकांची पर्यावरणाविषयीची जागरूक ता यामुळे हळूहळू या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद वाढत गेला. आता महापालिकेच्या अंबाझरी, मोक्षधाम, मानेवाडा व मानकापूर यासह प्रमुख दहनघाटावर अंत्यसंस्कारासाठी गोवरी व मोक्षकाष्ठ याचा वापर केला जात आहे. लाकडाचा वापर थांबल्याने हजारो वृक्षांना जीवनदान मिळाले आहे.मनपातर्फे पर्यावरण रक्षणार्थ अनेक प्रयत्न करण्यात येतात. यात झाडे लावणे, झाडे जगवणे, नद्या स्वच्छ करणे, प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर नियंत्रण ठेवणे, पर्यावरणपूरक दहनाची व्यवस्था आदींचा समावेश आहे. झाडे वाचविण्यासाठी शहरातील अंबाझरी व मोक्षधाम दहनघाटावर एलपीजी शवदाहिनी व गंगाबाई तसेच वैशालीनगर घाटावर शवदाहिनी लावलेली आहे. अन्य दहनघाटावर एलपीजी दाहिनी लावणे प्रस्तावित आहे. पाच दहनघाटावर शेणाच्या गोवऱ्या व मोक्षकाष्ठ यांचा उपयोग करून अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली आहे.७,२०० झाडांना जीवनदानदर महिन्याला सुमारे ३०० अंत्यसंस्कार पर्यावरणपूरक पद्धतीने केले जातात. नागपूर शहरात अंत्यसंस्कारासाठी मोक्षकाष्ठ व गोवऱ्यांचा वापर होत असल्याने दर महिन्याला १५ वर्षे वयाच्या सुमारे ६०० झाडांना जीवदान दिले जात आहे. एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी १५ ते २० वर्षे वयाच्या दोन वृक्षांचा बळी जातो. त्यानुसार आता या शहरात एका महिन्यात सुमारे ६०० आणि एका वर्षात सुमारे ७,२०० झाडांना जीवदान मिळत आहे.कोट्यवधी वृक्ष वाचतीलपर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची पद्धत संपूर्ण राज्यात लागू झाली तर कोट्यवधी वृक्ष वाचवण्यात यश येईल. पर्यावरण संवर्धनाला मोठी मदत होणार आहे. महापालिकेने ही संकल्पना मांडली, परंतु नागरिकांनीही याला प्रतिसाद दिल्याने हा उपक्रम राबविणे शक्य झाले आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणnagpurनागपूर