शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारामुळे नागपुरात हजारो झाडांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 20:56 IST

बांधकाम व विकास प्रकल्पामुळे शहरातील वृक्षतोड वाढली आहे. परंतु त्याचवेळी महापालिकेने शहरातील प्रमुख दहनघाटावर अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर न करता गोवरी व मोक्षकाष्ठ वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच हजारो झाडांना जीवदान मिळत आहे.

ठळक मुद्देगोवऱ्या व मोक्षकाष्ठाचा वापर : नागपूर शहरातील नागरिकांचाही प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बांधकाम व विकास प्रकल्पामुळे शहरातील वृक्षतोड वाढली आहे. परंतु त्याचवेळी महापालिकेने शहरातील प्रमुख दहनघाटावर अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर न करता गोवरी व मोक्षकाष्ठ वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच हजारो झाडांना जीवदान मिळत आहे.२०१३ मध्ये पर्यावरणपूरक पथदर्शी प्रकल्प म्हणून अंबाझरी घाटाची निवड करण्यात आली होती. सुरुवातीला या उपक्रमाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु जनजागृती व नागरिकांची पर्यावरणाविषयीची जागरूक ता यामुळे हळूहळू या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद वाढत गेला. आता महापालिकेच्या अंबाझरी, मोक्षधाम, मानेवाडा व मानकापूर यासह प्रमुख दहनघाटावर अंत्यसंस्कारासाठी गोवरी व मोक्षकाष्ठ याचा वापर केला जात आहे. लाकडाचा वापर थांबल्याने हजारो वृक्षांना जीवनदान मिळाले आहे.मनपातर्फे पर्यावरण रक्षणार्थ अनेक प्रयत्न करण्यात येतात. यात झाडे लावणे, झाडे जगवणे, नद्या स्वच्छ करणे, प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर नियंत्रण ठेवणे, पर्यावरणपूरक दहनाची व्यवस्था आदींचा समावेश आहे. झाडे वाचविण्यासाठी शहरातील अंबाझरी व मोक्षधाम दहनघाटावर एलपीजी शवदाहिनी व गंगाबाई तसेच वैशालीनगर घाटावर शवदाहिनी लावलेली आहे. अन्य दहनघाटावर एलपीजी दाहिनी लावणे प्रस्तावित आहे. पाच दहनघाटावर शेणाच्या गोवऱ्या व मोक्षकाष्ठ यांचा उपयोग करून अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली आहे.७,२०० झाडांना जीवनदानदर महिन्याला सुमारे ३०० अंत्यसंस्कार पर्यावरणपूरक पद्धतीने केले जातात. नागपूर शहरात अंत्यसंस्कारासाठी मोक्षकाष्ठ व गोवऱ्यांचा वापर होत असल्याने दर महिन्याला १५ वर्षे वयाच्या सुमारे ६०० झाडांना जीवदान दिले जात आहे. एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी १५ ते २० वर्षे वयाच्या दोन वृक्षांचा बळी जातो. त्यानुसार आता या शहरात एका महिन्यात सुमारे ६०० आणि एका वर्षात सुमारे ७,२०० झाडांना जीवदान मिळत आहे.कोट्यवधी वृक्ष वाचतीलपर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची पद्धत संपूर्ण राज्यात लागू झाली तर कोट्यवधी वृक्ष वाचवण्यात यश येईल. पर्यावरण संवर्धनाला मोठी मदत होणार आहे. महापालिकेने ही संकल्पना मांडली, परंतु नागरिकांनीही याला प्रतिसाद दिल्याने हा उपक्रम राबविणे शक्य झाले आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणnagpurनागपूर