शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या अर्थकारणाला थेट धक्का; जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला!
2
मुंबई एअरपोर्टवर १९ कोटींचे ड्रग्ज जप्त; दोन दिवसांत दोन मोठे गुन्हे उघड, कस्टम्सच्या कारवाईत तिघांना अटक!
3
Rohit Sharma Record: हिटमॅन रोहितनं वेळ घेतला; मग पुल शॉटसह बॅक टू बॅक सिक्सरसह सेट केला महारेकॉर्ड
4
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! १५० रुपयांची कार्बाइड गन बेतली जीवावर, १२५ जणांनी गमावली दृष्टी
5
वालूरात दोन ठिकाणी दरोडेखोरांचा हल्ला; एका घटनेत आजी गभीर जखमी, नातू ठार, दुसऱ्या घटनेत वृद्ध दांपत्य जखमी
6
भारतासाठी बांगलादेशमधून खुशखबर! निवडणुकीपूर्वी हंगामी युनूस सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
7
"बंदुकीचा धाक दाखवून रशियासाठी युद्ध लढण्यास..."; भारतीय तरुणाचा धक्कादायक Video
8
केवळ ₹५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; १५ वर्षांत बनवाल मोठा रिटायरमेंट फंड, जबरदस्त आहे सरकारी स्कीम
9
Virat Kohli : पहिल्यांदाच आली ही वेळ! चाहत्यांचे आभार मानत कोहलीनं ॲडलेडला केलं अलविदा? (VIDEO)
10
टाटा ट्रस्टमधील वाद थांबेनात! आता ट्रस्टी मेहली मिस्त्रींनी ठेवली नवी अट, काय होणार बदल?
11
"फटाका इन्व्हर्टरवर पडला, संपूर्ण इमारतीची राख..."; इंदिरापुरममध्ये भीषण आग, नेमकं काय घडलं?
12
दिल्लीत 'कॉन्ट्रॅक्ट किलर' गँगचा थरारक शेवट; एन्काऊंटरमध्ये ४ ठार, बिहार निवडणुकीसाठी रचला होता कट
13
पतीच्या हातात ब्रेसलेट पाहून नाराज, मंगळसूत्र न मिळाल्याने हेल्थ ऑफिसरने मारली नदीत उडी
14
"SDM हूँ, पहले दूसरे की गाडी में...?"; CNG पंप कर्मचाऱ्यानं रुबाब दाखवणाऱ्या 'साहेबां'च्या 'कानफटात' लगावली, फ्रीस्टाइल VIDEO Viral
15
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
16
Gold Silver Price Review: आणखी स्वस्त होणार का सोनं? आता खरेदी करण्याची संधी की अजून थोडी वाट पाहावी...
17
केरळच्या गुरुवायुर मंदिरातून लाखोंचे सोने-चांदी गायब; २५ कोटींच्या वस्तूंची नोंदच नाही!
18
Stock Market Today: शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex मध्ये ५०० अंकांची तेजी; Nifty २६ हजारांच्या पार
19
IND vs AUS 2nd ODI : हिटमॅन रोहितनं रचला इतिहास; ऑस्ट्रेलियात असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
20
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा

पर्यावरण दिन विशेष; २० वर्षांत उपराजधानीतील हिरवळ ३३ टक्क्याने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 10:08 IST

शहर ते महानगर व आता मेट्रो सिटी म्हणून बिरुद मिळविणाऱ्या नागपूर शहराने मिलेनियम इयर २००० पासून २० वर्षांत पर्यावरणाच्या दृष्टीने बरेच काही गमावले आहे. २० वर्षांत शहर क्षेत्राची हिरवळ (ग्रीन कव्हर) तब्बल ३३ टक्क्याने घटली आहे.

ठळक मुद्देतापमानात २-३ डिग्रीने वाढ भूजल स्तर व प्रदूषण स्थिर

निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर ते महानगर व आता मेट्रो सिटी म्हणून बिरुद मिळविणाऱ्या नागपूर शहराने मिलेनियम इयर २००० पासून २० वर्षांत पर्यावरणाच्या दृष्टीने बरेच काही गमावले आहे. २० वर्षांत शहर क्षेत्राची हिरवळ (ग्रीन कव्हर) तब्बल ३३ टक्क्याने घटली आहे. या काळात शहरातील १६ तलावांमधून मोठे म्हणावे असे केवळ चार तलाव शिल्लक राहिले आहेत. नद्यांचे नाल्यात रूपांतर झाले आहे आणि तापमान २ ते ३ डिग्री सेल्सिअसने वाढले आहे. २० वर्षांत प्रदूषण आणि भूजलस्तर स्थिर असल्याचा सकारात्मक दावा केला जात असला तरी परिस्थिती त्याहून विपरीत आहे.२००० हे वर्ष जगभरात मिलेनियम इयर म्हणून साजरे झाले होते. त्यावेळी नवे स्वप्न, नव्या वाटा स्वीकारण्याचा संकल्प प्रत्येकाने केला असेल. मात्र या नव्या वाटावर चालताना पर्यावरणाचा प्रचंड ºहास मानवाने केला आहे. त्यामुळे जगाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असून त्याचा अनुभव आपण घेत आहोतच. या २० वर्षांत नागपूर शहरात अनेक बदल घडले आहेत. मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने आपण बरेच काही गमावलेही आहे. या काळात पर्यावरणाच्या घटकांमध्ये कशी स्थित्यंतरे घडली, याविषयीचा आढावा आम्ही या निमित्ताने घेतला. एका सर्वेक्षणानुसार शहराच्या केंद्रस्थानावरून ३० किलोमीटर म्हणजे ३७२ चौ.किमी.च्या परिघातील हिरवळ ३३ टक्क्याने घटली आहे. १९९९ साली या परिघात ११६ चौ.किमी.चे वनक्षेत्र होते जे २०१३ मध्ये ९१ चौ.किमी व २०१८-१९ मध्ये ७६ चौ.किमी.पर्यंत घसरले आहे. म्हणजे कधी ३१ टक्के असलेले ग्रीन कव्हर २१ वर आले आहे. हीच अवस्था तलावांची झाली आहे. २० वर्षांपूर्वी १६ तलाव शहरात अस्तित्वात होते. त्यातील अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलाव सुस्थितीत आहेत तर शुक्रवारी तलाव, सोनेगाव तलाव अस्तित्वाची लढाई लढत आहेत. त्यातही या तलावातील आॅक्सिजनचे प्रमाण घटले आहे.

शहराची हिरवळ कमी झाली. उद्योग, बांधकामात वाढ झाली असून वाहनांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रदूषण आणि तापमानात वाढ झाली आहे. अशात आधीच औष्णिक विद्युत केंद्र असताना आणखी विद्युत केंद्र उभारण्याचा प्रस्ताव धोकादायक आहे.- जयदीप दास, पर्यावरणतज्ज्ञ

कार्बन, सल्फर आदी प्रदूषण मर्यादेच्या वर गेले नाही ही समाधानकारक बाब आहे पण धूलिकणांचे वाढते प्रमाण आरोग्याच्या दृष्टीने चिंता वाढविणारे आहे. याशिवाय अत्यल्प असलेल्या तलावांचे वाढलेले प्रदूषण जैवविविधतेला हानी पोहचविणारे आहे.- कौस्तुभ चॅटर्जी, पर्यावरणतज्ज्ञ 

टॅग्स :environmentपर्यावरण