शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

संपूर्ण कुटुंबीय झाले १९७१ च्या लढाईत सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 21:38 IST

ब्रिगेडियर कुलदीप सिंह चांदपुरी यांनी इहलोकाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या शौर्याची गाथा मात्र अमर राहील. शिस्तबद्ध आयुष्य जगलेले ब्रिगेडियर सिंह यांनी आपल्या कर्तृत्वाने शत्रूला धूळ चारली होती. १९७१ च्या युद्धात तर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय लढाईत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे त्यांनी आपली अखेरची मुलाखत ‘लोकमत समाचार’च्या ‘दीप भव’ या विशेषांकासाठी दिली होती. या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील विविधांगी पैलू जगासमोर आले होते.

ठळक मुद्देब्रिगेडियर कुलदीप सिंह चांदपुरी यांनी ‘लोकमत’ समूहाला दिली अखेरची मुलाखत : एका फौजीची अमर शौर्यगाथा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ब्रिगेडियर कुलदीप सिंह चांदपुरी यांनी इहलोकाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या शौर्याची गाथा मात्र अमर राहील. शिस्तबद्ध आयुष्य जगलेले ब्रिगेडियर सिंह यांनी आपल्या कर्तृत्वाने शत्रूला धूळ चारली होती. १९७१ च्या युद्धात तर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय लढाईत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे त्यांनी आपली अखेरची मुलाखत ‘लोकमत समाचार’च्या ‘दीप भव’ या विशेषांकासाठी दिली होती. या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील विविधांगी पैलू जगासमोर आले होते.३ डिसेंबर १९७१ रोजी भारत-पाक सीमेवर लोंगोवाल ‘पोस्ट’वर पाकिस्तानी सैन्याने हल्ला केला होता. पाकिस्तानी सैन्याचा मोठा काफिला होता व लोंगोवाल ‘पोस्ट’वर केवळ १२५ भारतीय जवान होते. मात्र त्यांच्या नेतृत्वात सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याचा सामना केला. पाकिस्तानचे ६० ‘टँक’ नष्ट करण्यात भारतीय सैन्यदल व वायुदलाला यश आले होते. कुलदीप सिंह यांनी चाणाक्षपणे सैन्याची व्यूहरचना केली होती. त्यांच्या या शौर्यासाठी त्यांना महावीर चक्र तसेच सहा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. १९७१ च्या युद्धात त्यांचे संपूर्ण कुटुंबीय सहभागी होते. त्यांचे दोन काका ‘एअरफोर्स’मध्ये ‘फायटर पायलट’ होते व त्या दोघांनाही शौर्यचक्र मिळाले होते. त्यांचे आजोबा सरदार बहादूर सिंत सिंह हेदेखील सैन्यात होते. त्यांच्या मेहुण्यांना मरणोत्तर वीरचक्र प्रदान करण्यात आले होते, अशी माहिती त्यांनीच आपल्या मुलाखतीत दिली होती. कुलदीप सिंह चांदपुरी व त्यांच्या बटालियनच्या शौर्यगाथेवर ‘बॉर्डर’ हा चित्रपटदेखील तयार झाला होता. कुलदीप सिंह चांदपुरी हे अखेरपर्यंत फौजी म्हणूनच जगले व आपल्या कार्यातून त्यांनी तरुण पिढ्यांना मौलिक प्रेरणा दिली.

टॅग्स :warयुद्धIndiaभारत