शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

संपूर्ण कुटुंबीय झाले १९७१ च्या लढाईत सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 21:38 IST

ब्रिगेडियर कुलदीप सिंह चांदपुरी यांनी इहलोकाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या शौर्याची गाथा मात्र अमर राहील. शिस्तबद्ध आयुष्य जगलेले ब्रिगेडियर सिंह यांनी आपल्या कर्तृत्वाने शत्रूला धूळ चारली होती. १९७१ च्या युद्धात तर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय लढाईत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे त्यांनी आपली अखेरची मुलाखत ‘लोकमत समाचार’च्या ‘दीप भव’ या विशेषांकासाठी दिली होती. या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील विविधांगी पैलू जगासमोर आले होते.

ठळक मुद्देब्रिगेडियर कुलदीप सिंह चांदपुरी यांनी ‘लोकमत’ समूहाला दिली अखेरची मुलाखत : एका फौजीची अमर शौर्यगाथा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ब्रिगेडियर कुलदीप सिंह चांदपुरी यांनी इहलोकाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या शौर्याची गाथा मात्र अमर राहील. शिस्तबद्ध आयुष्य जगलेले ब्रिगेडियर सिंह यांनी आपल्या कर्तृत्वाने शत्रूला धूळ चारली होती. १९७१ च्या युद्धात तर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय लढाईत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे त्यांनी आपली अखेरची मुलाखत ‘लोकमत समाचार’च्या ‘दीप भव’ या विशेषांकासाठी दिली होती. या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील विविधांगी पैलू जगासमोर आले होते.३ डिसेंबर १९७१ रोजी भारत-पाक सीमेवर लोंगोवाल ‘पोस्ट’वर पाकिस्तानी सैन्याने हल्ला केला होता. पाकिस्तानी सैन्याचा मोठा काफिला होता व लोंगोवाल ‘पोस्ट’वर केवळ १२५ भारतीय जवान होते. मात्र त्यांच्या नेतृत्वात सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याचा सामना केला. पाकिस्तानचे ६० ‘टँक’ नष्ट करण्यात भारतीय सैन्यदल व वायुदलाला यश आले होते. कुलदीप सिंह यांनी चाणाक्षपणे सैन्याची व्यूहरचना केली होती. त्यांच्या या शौर्यासाठी त्यांना महावीर चक्र तसेच सहा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. १९७१ च्या युद्धात त्यांचे संपूर्ण कुटुंबीय सहभागी होते. त्यांचे दोन काका ‘एअरफोर्स’मध्ये ‘फायटर पायलट’ होते व त्या दोघांनाही शौर्यचक्र मिळाले होते. त्यांचे आजोबा सरदार बहादूर सिंत सिंह हेदेखील सैन्यात होते. त्यांच्या मेहुण्यांना मरणोत्तर वीरचक्र प्रदान करण्यात आले होते, अशी माहिती त्यांनीच आपल्या मुलाखतीत दिली होती. कुलदीप सिंह चांदपुरी व त्यांच्या बटालियनच्या शौर्यगाथेवर ‘बॉर्डर’ हा चित्रपटदेखील तयार झाला होता. कुलदीप सिंह चांदपुरी हे अखेरपर्यंत फौजी म्हणूनच जगले व आपल्या कार्यातून त्यांनी तरुण पिढ्यांना मौलिक प्रेरणा दिली.

टॅग्स :warयुद्धIndiaभारत