शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
2
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
3
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
4
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
5
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
6
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
7
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
8
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
9
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
10
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
11
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
12
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
13
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
14
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
15
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
16
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
17
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
18
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
19
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
20
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 

मागेल त्याला प्रवेश !

By admin | Updated: May 20, 2014 01:13 IST

सीबीएसई दहावीचे सोमवारी निकाल जाहीर झाले; शिवाय उर्वरित निकालही आठवडाभरात लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांची अकरावीच्या प्रवेशासाठी लगबग

अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने : शिक्षण विभाग सज्ज

नागपूर : सीबीएसई दहावीचे सोमवारी निकाल जाहीर झाले; शिवाय उर्वरित निकालही आठवडाभरात लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांची अकरावीच्या प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे; शिवाय शिक्षण विभागानेही ‘मिशन अ‍ॅडमिशन’ची तयारी सुरू केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अकरावीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. मात्र यंदा विज्ञान व द्विलक्षी अभ्यासक्रमासोबतच कला व वाणिज्य शाखेतही केंद्रीय पद्घतीने प्रवेश दिले जाणार आहेत. यासंबंधी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सूचनाही जारी केल्या आहेत. नागपूर शहरात सुमारे १७० कनिष्ठ महाविद्यालये असून, त्यात अकरावी प्रवेशासाठी ३९ हजार ७८० जागा उपलब्ध आहेत. यात विज्ञान शाखेतील १७ हजार १२०, कला शाखेतील ७ हजार ३८०, वाणिज्य शाखेतील ११ हजार ५२० व द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या ३ हजार ७६० जागांचा समावेश आहे. नागपूर शहराबाहेरील व सीबीएसई शाळांमधून दहावी उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी कला शाखेकरिता एम. एम. मोहता विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, सक्करदरा, वाणिज्य शाखेसाठी डॉ. आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, दीक्षाभूमी व विज्ञान आणि द्विलक्षी अभ्यासक्रमाकरिता धनवटे नॅशनल कनिष्ठ महाविद्यालय, काँग्रेसनगर या तीन केंद्रांवरून शाखानिहाय आवेदनपत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत; शिवाय याच केंद्रावर ते स्वीकारले जातील. विद्यार्थ्यांना ‘एसएमएस’वर माहिती आतापर्यंत दरवर्षी विद्यार्थी व पालकांना अकरावीच्या प्रवेशासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. प्रवेश अर्ज खरेदीपासून तर तो केंद्रीय प्रवेश समितीकडे सादर करून, प्रवेश निश्चित होईपर्यंत विद्यार्थी व पालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. परंतु यंदा शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना घरबसल्या प्रवेशाची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिवाय विद्यार्थ्याने ज्या शाळेतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली, त्याच शाळेत त्याला अकरावी प्रवेशाचा अर्ज उपलब्ध होणार असून, तेथेच तो स्वीकारलाही जाणार आहे. यानंतर त्या विद्यार्थ्याला घरबसल्या एसएमएसच्या माध्यमातून त्याचा प्रवेश निश्चित करण्यात आलेल्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती दिली जाईल. त्यानुसार तो विद्यार्थी थेट संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेऊ शकेल. परंतु ही सुविधा केवळ कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनाच मिळणार असून, विज्ञान व द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मात्र नियमित प्रक्रियेला पुढे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी) प्रत्येकाला प्रवेश मिळणार दहावी उत्तीर्ण होणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला अकरावी प्रवेश मिळावा, यासाठी शिक्षण विभागाने पूर्ण काळजी घेतली आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जाणार असल्याने कोणावरही अन्याय होणार नाही; शिवाय कुणीही प्रवेशापासून वंचित राहणार नाही. शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेशासाठी संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. आता केवळ दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. ते निकाल जाहीर होताच, प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाईल. आतापर्यंत केंद्रीय प्रवेश पद्घतीच्या माध्यमातून केवळ विज्ञान व द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जात होता. परंतु यंदा प्रथमच कला व वाणिज्य शाखेतही केंद्रीय पद्धतीनेच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. एस. एन. पटवे सहायक शिक्षण संचालक