तिसऱ्या फेरी अखेर अकरावीच्या ३९,५९१ जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:11 IST2021-09-14T04:11:29+5:302021-09-14T04:11:29+5:30

नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीतर्फे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी पार पडली. आतापर्यंत १९,२८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. ...

At the end of the third round, 39,591 seats were vacant | तिसऱ्या फेरी अखेर अकरावीच्या ३९,५९१ जागा रिक्त

तिसऱ्या फेरी अखेर अकरावीच्या ३९,५९१ जागा रिक्त

नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीतर्फे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी पार पडली. आतापर्यंत १९,२८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. महापालिकेच्या हद्दीतील २१७ ज्युनि. कॉलेजमधील ५८,८७५ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया होत आहे. तिसऱ्या फेरी अखेर अद्यापही ३९,५९१ जागा रिक्त आहेत.

यंदा दहावीचा निकाल ९९ टक्के लागला असल्याने अकरावीच्या संपूर्ण जागा भरतील अशी अपेक्षा होती. परंतु तीन फेऱ्या अंती झालेले प्रवेश लक्षात घेता यंदाही अकरावीच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहतील असेच दिसते आहे. आतापर्यंत झालेल्या प्रवेशात सर्वाधिक ३८ टक्के प्रवेश विज्ञान शाखेचे झाले असून, वाणिज्य शाखेत २९ टक्के, कला शाखेत २४ टक्के व एमसीव्हीसीचे २५ टक्के प्रवेश झाले आहे.

- फेरीनिहाय झालेले प्रवेश

पहिली फेरी - ११,७६०

दुसरी फेरी - ५,७२१

तिसरी फेरी - ३६८

- शाखा निहाय झालेले प्रवेश व रिक्त जागा

शाखा झालेले प्रवेश रिक्त जागा

कला २,३१९ ७,१०१

वाणिज्य ५,१८५ १२,५३५

विज्ञान १०,७६४ १६,९५६

एमसीव्हीसी १,०१६ २,९९९

Web Title: At the end of the third round, 39,591 seats were vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.