शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

शौचालयाच्या खड्ड्यात पडल्याने चिमुकल्याचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:51 IST

शौचालयाच्या निर्मितीसाठी खोदण्यात आलेल्या सेफ्टी टँकमध्ये पडल्याने पाच वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आर्यन नवदीप राऊत असे या मृत बालकाचे नाव आहे. दवलामेटी ग्रामपंचायततर्फे स्थानिक समाजभवनाजवळ शौचालयाचे बांधकाम सुरू आहे. सेफ्टी टॅन्ककरिता खोदलेल्या खड्ड्यात आर्यनचा मृतदेह पाण्यात तरंगत आढळल्याने मंगळवारी सकाळी या परिसरात खळबळ उडाली.

ठळक मुद्देनागपूरनजीकच्या दवलामेटीतील घटना: ग्रामपंचायत प्रशासनाचा निष्काळजीपणा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर (वाडी) : शौचालयाच्या निर्मितीसाठी खोदण्यात आलेल्या सेफ्टी टँकमध्ये पडल्याने पाच वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आर्यन नवदीप राऊत असे या मृत बालकाचे नाव आहे. दवलामेटी ग्रामपंचायततर्फे स्थानिक समाजभवनाजवळ शौचालयाचे बांधकाम सुरू आहे. सेफ्टी टॅन्ककरिता खोदलेल्या खड्ड्यात आर्यनचा मृतदेह पाण्यात तरंगत आढळल्याने मंगळवारी सकाळी या परिसरात खळबळ उडाली.पोलीस सूत्राच्या माहितीनुसार समाजभवनाच्या काही अंतरावरच नवदीप राऊत यांचे घर आहे. नवदीप राऊत ऑटो चालक आहेत. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास आर्यन या परिसरात खेळत होता. आई सारिका घरच्या दैनंदिन कामात व्यस्त होती. घरी आजी-आजोबा आराम करीत होते. आर्यन घरासमोरील पटांगणात खेळत होता, म्हणून घरची मंडळी निश्चिंत होती. भरपूर वेळ होऊन अंधार पडला असतानाही आर्यन घरी न आल्याने राऊत कुटुंबीयांची तारांबळ उडाली. परिवाराने दोन तास इतरत्र शोध घेतला. परंतू आर्यन न मिळाल्याने वडिलांनी वाडी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनीदेखील आर्यनचा मध्यरात्रीपर्यंत शोध घेतला, मात्र तो मिळाला नाही. मंगळवारी पहाटे ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी असलेल्या समाजभवनाच्या नजीक बांधण्यात येत असलेल्या शौचालयाच्या सेफ्टी टँकच्या खड्ड्यात एका मुलाचा मृतदेह तरंगताना दिसला. स्थानिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. मृतदेह बाहेर काढला असता तो आर्यनचाच होता. समाजभवन परिसरात ताराची जाळी लावली असली तरी मुले नेहमी जाळी ओलांडून खेळण्याकरिता जात असतात. हे माहीत असताना खबरदारीची कोणतीही उपाययोजना न केल्याने आणि ऐन पावसाळ्यात शौचालयाचे बांधकाम का सुरू केले, असे प्रश्न निर्माण होत आहेत. स्थानिक प्रशासनाला कंत्राटदाराचे नाव विचारले असता ग्रामपंचायतच हे काम करीत असल्याची माहिती देण्यात आली. परंतु खेमका नावाचा कंत्राटदार हे काम करीत असल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र ग्रा.पं. प्रशासन कंत्राटदाराचे नाव लपवीत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे. तसेच स्थानिक नेते हे प्रकरण दाबत असल्याचीही चर्चा सर्वत्र आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणाने चिमुकल्याचा जीव गेला. आर्यनला नऊ वर्षाचा मोठा भाऊ व दोन वर्षाची लहान बहीण आहे.

 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर