शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पदे कमी करण्याच्या आदेशामुळे नागपुरात कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 20:54 IST

सातव्या वेतन आयोगाचा राज्यावर पडणारा बोजा तसेच संगणकीकरण आणि आऊटसोर्सिंगमुळे अधिक मनुष्यबळाची गरज नसल्याचे कारण पुढे करून ३० टक्के पदसंख्या कमी करून नवे आकृतिबंध सादर करण्याचे आदेश वित्त विभागाने दिले आहे. शासनाच्या या निर्णयाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे.

ठळक मुद्देशासनाचा जाहीर निषेधमागासवर्गीय कर्मचारी संघटनांचा विरोध

आॅनलाईन लोकमतनागपूर : सातव्या वेतन आयोगाचा राज्यावर पडणारा बोजा तसेच संगणकीकरण आणि आऊटसोर्सिंगमुळे अधिक मनुष्यबळाची गरज नसल्याचे कारण पुढे करून ३० टक्के पदसंख्या कमी करून नवे आकृतिबंध सादर करण्याचे आदेश वित्त विभागाने दिले आहे. त्यामुळे कर्मचारी-अधिकाऱ्यांची साडेपाच ते सहा लाख पदे कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. शासनाच्या या निर्णयाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे. विशेषत: मागासवर्गीय कर्मचारी संघटनांनी याचा तीव्र निषेध करीत इशारा दिला आहे.एससी-एसटीची पदे रद्द करता येत नाही२ एप्रिल १९५३ रोजीच्या ४६/४९० या शासन निर्णयानुसार एससी एसटीच्या पदांचा अनुशेष असेल तर ती पदे रद्द करता येत नाही. महाराष्ट्रात आजच्या घडीला तब्बल ३ लाख ४३ हजार पदांचा अनुशेष आहे. तेव्हा शासनाला पदे रद्द करायची असेल तर अगोदर अनुशेष भरून काढावा लागेल. डॉ. श्रीकांत जिचकार यांनी झिरो बजेट आणले, तेव्हा सुद्धा पाच वर्षासाठी पदभरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यालाही आम्ही विरोध केला. अखेर मागासवर्गीयांची भरती करावी लागली होती. सध्याचा निर्णय सुद्धा तशाच प्रकारचा आहे. आम्ही त्याचा विरोध करतो. यासंबंधात मी स्वत: संबंधित सचिवांशी चर्चा केली आहे. शासनाने अजून निर्णय घेतलेला नाही, आम्ही सोडणार नाही, याविरोधात निश्चितच लढा देऊ.कृष्णा इंगळेअध्यक्ष, कास्ट्राईब कर्मचारी महासंघउद्योगपतींना लाभ पोहोचवण्याचा प्रकारआऊटसोर्सिंगच्या नावावर या देशात खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण सुरू झाले तेव्हाच सरकारच्या संस्था व यंत्रणा मोडकळीस आणून मूठभर उद्योगपतींचे हित साधण्यास सुरुवात झाली.देशातील नवरत्न कंपन्यांचे खासगीकरण करण्यात आले. हे शासनही भांडवलदार धार्जिणे आहे. काही विशिष्ट उद्योगपतींना लाभ पोहोचवण्यासाठीच सरकारी कपातीचा निर्णय घेण्यात येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची कपात करून सरकारला कुठलाही फायदा होणार नाही, उलट उद्योगपतींचे हित साधले जाणार आहे. हा निर्णय सामाजिक न्यायाच्या विरोधात असून उद्योगपतींना लाभ पोहोचवण्यासाठी आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो व करू.अरुण गाडेकास्ट्राईब नेते

टॅग्स :Employeeकर्मचारीnagpurनागपूर