शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

एसटी कर्मचाऱ्यांना घामाचाच दाम मिळेना! १२ तारीख होऊनही पगार झालाच नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 10:42 IST

कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष

नागपूर : दुसरा आठवडा पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असूनही एसटीच्या कर्मचाऱ्यांना अजून वेतन मिळाले नसल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.

राज्य परिवहन महामंडळात हजारो अधिकारी, कर्मचारी काम करतात. राज्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी बसेसचे संचलन, व्यवस्थापन आणि देखभालीची जबाबदारी ही मंडळी सांभाळते. सरकारच्या इतर विभागांच्या तुलनेत त्यांना पगार आणि भत्तेही कमी स्वरूपात मिळते. मात्र, किमान वेतन महिन्याच्या महिन्याला ७ तारखेच्या आत मिळावे, अशी या सर्वांची अपेक्षा असते. मात्र, तेसुद्धा वेळेवर मिळत नाही. या संबंधाने एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने न्यायालयाकडेही दाद मागितली आहे. त्यासंबंधाने गेल्या वर्षी निकाल देताना न्यायालयाने प्रत्येक महिन्याच्या देय तारखेस एसटी कामगारांना वेतन दिले पाहिजे, असा निकाल दिला होता, असे संघटनेचे पदाधिकारी सांगतात. मात्र, त्यालाही दाद मिळत नसून एसटी महामंडळाने वर्षाच्या पहिल्याच महिन्यात वेतनाच्या संबंधाने बोंबाबोंब चालविली आहे. दि. १२ जानेवारी होऊनही कर्मचाऱ्यांना एसटीकडून वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.

आम्ही काय करायला हवे?

प्रलंबित मागण्याच्या पूर्ततेसाठी आंदोलन करावे लागते. आंदोलन केल्यास सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसतो. त्यामुळे एसटीच्या कर्मचारी संघटना जनहित लक्षात घेऊन काम करतात. मात्र, महिनाभर काम करूनही चक्क १२ तारखेपर्यंत आम्हाला वेतन मिळत नसेल तर आम्ही काय करायला पाहिजे, असा उद्विग्न सवाल महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी केला आहे.

टॅग्स :state transportएसटीEmployeeकर्मचारी