शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कृषी वानिकी योजनांवर भर द्या :  वनराज्यमंत्र्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 21:19 IST

राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. निसर्गानेही यंदा योग्य साथ दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना साहाय्यभूत ठरतील अशा कृषी वानिका योजना राबवा, असे आवाहन वन राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले.

ठळक मुद्देकंट्रोल कमांड रूमची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. निसर्गानेही यंदा योग्य साथ दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना साहाय्यभूत ठरतील अशा कृषी वानिका योजना राबवा, असे आवाहन वन राज्यमंत्रीसंजय राठोड यांनी केले.वन राज्यमंत्री म्हणून पदाची सूत्रे स्वीकारल्यावर संजय राठोड यांनी शनिवारी प्रथमच वनभवन कार्यालयाला दिलेल्या भेटीत येथील कंट्रोल कंमाड रूमला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी संपूर्ण कार्यालयात फिरून येथील कामकाज जाणून घेतले. अधिकाऱ्यांच्या कक्षांचीही पाहणी केली.बैठकीच्या प्रारंभी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) डॉ. एन. रामबाबू यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. वनभवन येथील कंमाड कंट्रोल रूमविषयक माहिती दिली. प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) साईप्रकाश यांनी वनविभागाच्या सर्व योजनांच्या आर्थिक बाबीचा आढावा घेणारे सादरीकरण केले. प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती तंत्रज्ञान व धोरण) एम. के. राव यांनी वनविभागाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मविषयी सादरीकरण केले. ५० कोटी वृक्ष लागवडीच्या सर्व नोंदीची व जीएसआय प्रणालीची माहिती दिली.यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) प्रवीण श्रीवास्तव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर आदी उपस्थित होते. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) महिप गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (केंद्रस्थ अधिकारी) संजीव गौड, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ट वनोपज) टी. के. चौबे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संधारण) शैलेश टेंभूर्णीकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) मोहन कर्नाट, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) बी.एस.हुडा, मुख्य वनसंरक्षक (प्रा) नागपूर कल्याण कुमार, पेंच व्याघ्र प्रकल्प संचालक गोवेकर, प्रसिद्धी व माहिती अधिकारी (वने) स्नेहल पाटील उपस्थित होत्या. वनभवन येथील आढावा बैठकीनंतर सेमिनरी हिल्स येथील हायटेक नर्सरीचीही त्यांनी पाहणी केली.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडministerमंत्रीforestजंगलFarmerशेतकरी