शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कृषी वानिकी योजनांवर भर द्या :  वनराज्यमंत्र्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 21:19 IST

राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. निसर्गानेही यंदा योग्य साथ दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना साहाय्यभूत ठरतील अशा कृषी वानिका योजना राबवा, असे आवाहन वन राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले.

ठळक मुद्देकंट्रोल कमांड रूमची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. निसर्गानेही यंदा योग्य साथ दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना साहाय्यभूत ठरतील अशा कृषी वानिका योजना राबवा, असे आवाहन वन राज्यमंत्रीसंजय राठोड यांनी केले.वन राज्यमंत्री म्हणून पदाची सूत्रे स्वीकारल्यावर संजय राठोड यांनी शनिवारी प्रथमच वनभवन कार्यालयाला दिलेल्या भेटीत येथील कंट्रोल कंमाड रूमला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी संपूर्ण कार्यालयात फिरून येथील कामकाज जाणून घेतले. अधिकाऱ्यांच्या कक्षांचीही पाहणी केली.बैठकीच्या प्रारंभी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) डॉ. एन. रामबाबू यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. वनभवन येथील कंमाड कंट्रोल रूमविषयक माहिती दिली. प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) साईप्रकाश यांनी वनविभागाच्या सर्व योजनांच्या आर्थिक बाबीचा आढावा घेणारे सादरीकरण केले. प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती तंत्रज्ञान व धोरण) एम. के. राव यांनी वनविभागाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मविषयी सादरीकरण केले. ५० कोटी वृक्ष लागवडीच्या सर्व नोंदीची व जीएसआय प्रणालीची माहिती दिली.यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) प्रवीण श्रीवास्तव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर आदी उपस्थित होते. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) महिप गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (केंद्रस्थ अधिकारी) संजीव गौड, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ट वनोपज) टी. के. चौबे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संधारण) शैलेश टेंभूर्णीकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) मोहन कर्नाट, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) बी.एस.हुडा, मुख्य वनसंरक्षक (प्रा) नागपूर कल्याण कुमार, पेंच व्याघ्र प्रकल्प संचालक गोवेकर, प्रसिद्धी व माहिती अधिकारी (वने) स्नेहल पाटील उपस्थित होत्या. वनभवन येथील आढावा बैठकीनंतर सेमिनरी हिल्स येथील हायटेक नर्सरीचीही त्यांनी पाहणी केली.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडministerमंत्रीforestजंगलFarmerशेतकरी