शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

पदोन्नतीत आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एल्गार : स्वतंत्र मजदूर युनियनतर्फे विशाल मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 19:58 IST

६० हजार मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित ठरले आहेत. याविरोधात राज्यभरात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, या अन्यायाविरोधात मंगळवारी राज्यभरातील हजारो कर्मचारी रस्त्यावर उतरले. स्वतंत्र मजदूर युनियनतर्फे हा मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देहजारो मागासवर्गीय अधिकारी - कर्मचारी रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे २९ डिसेंबर २०१७ च्या पत्रानुसार आरक्षणासह खुल्या प्रवर्गातूनही पदोन्नती देणे बंद केले आहे. यामुळे सेवाज्येष्ठता यादीत वरच्या क्रमांकावर असूनही ६० हजार मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित ठरले आहेत. याविरोधात राज्यभरात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, या अन्यायाविरोधात मंगळवारी राज्यभरातील हजारो कर्मचारी रस्त्यावर उतरले.स्वतंत्र मजदूर युनियनतर्फे हा मोर्चा काढण्यात आला. युनियनचे अध्यक्ष जे. एस. पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. यामध्ये राज्यभरातून जवळपास १० हजाराच्यावर मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. यशवंत स्टेडियम येथून मोर्चाला सुरुवात झाली व पंचशील चौक, सीताबर्डी होत संविधान चौकामध्ये सभेत रूपांतर झाले. यावेळी जे.एस. पाटील यांच्यासह युनियनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सागर तायडे, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संजय घोडके व महासचिव प्रेमानंद मोर्य, बानाईचे अध्यक्ष पी. एस. खोब्रागडे, महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे शिवदास वासे, विकास गौर, कंत्राटी कामगार युनियनचे दिलीप कोठारे, राजू चव्हाण, प्रशांत रामटेके आदी उपस्थित होते.जे.एस. पाटील म्हणाले, सामान्य प्रशासन विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील एससी, एसटी, ओबीसी, भटक्या विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्गातील कर्मचारी व अधिकाऱ्यांसह शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या उद्योग व महामंडळातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनुसरून मागासलेपणा, पर्याप्त प्रतिनिधित्व व प्रशासनाची कार्यक्षमता लक्षात घेऊन आकडेवारी सादर न केल्याने पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्यासंदर्भातील निर्णय रद्द केला होता. यावर शासनाने कुठलीही कारवाई केली नाही. दुसरीकडे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना ज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळण्यासाठी कुठलीही बंदी उच्च न्यायालयाने घातली नसताना २९ डिसेंबर २०१७ ला पत्र काढून ज्येष्ठतेनुसार खुल्या प्रवर्गातून पदोन्नती देणे बंद केले. त्यांच्यापेक्षा खालच्या क्रमांकावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची मार्गदर्शक सूचना कुठलाही शासन आदेश जारी न करता सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर सचिवांनी दिल्याचे पाटील यांनी सांगितले. याविरोधात आता लढण्याची वेळ आली आहे. हे आंदोलन शांततेत आहे, मात्र भविष्यात ते अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.सभेनंतर विविध संघटनांच्या शिष्टमंडळाने हैदराबाद हाऊस येथे जाऊन मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना मागण्यांचे निवेदन सोपविले. संचालन मधू उके यांनी केले.काय आहे मेरिट?राज्यात मेरिटच्या नावाने मोर्चे आणि धरणे केले जात आहेत. आरक्षणामुळे मेरिट संपते असे ज्यांना वाटते त्यांनी केंद्राच्या समितीतर्फे रेल्वेमध्ये केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल बघावा, असे आवाहन नरेंद्र जारोंडे यांनी केला. या सर्वेक्षणात गुणवत्ता वाढल्याचे दर्शविले आहे. मात्र संविधानिक हक्क डावलण्यासाठी वातावरणनिर्मिती करण्याचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा लोकांना वठणीवर आणण्याची गरज असल्याचा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :Morchaमोर्चाState Governmentराज्य सरकारEmployeeकर्मचारीreservationआरक्षण