शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

नागपुरात मेंटेनन्सच्या नावावर ७ तास वीज बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 23:45 IST

महावितरणचे मेंटेनन्सचे काम संपायचे नावच घेत नाही आहे. या आठवड्यात बुधवारी कंपनीने वर्धमाननगर परिसरात सात तास वीज बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे.

ठळक मुद्देबुधवारी महावितरण देणार ‘शॉक’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणचे मेंटेनन्सचे काम संपायचे नावच घेत नाही आहे. या आठवड्यात बुधवारी कंपनीने वर्धमाननगर परिसरात सात तास वीज बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. या आठवड्यात मेंटेनन्सच्या नावावर वीज बंद ठेवणे आता चर्चेचा विषय झाला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, जेव्हा वीज वितरण यंत्रणा इतकी देखभाल दुरुस्ती करीत आहे तर शहरात अचानक वीज बंद का होत असते. दर आठवड्यात मेंटेनन्सनंतरही वीज वितरण यंत्रणेची कार्यपद्धती किती ढेपाळलेली आहे याचे उदाहरण महाराजबाग, अमरावती रोड परिसरात आजही स्पष्ट दिसून आले. या परिसरात दिवसभरात दोन ते तीन वेळा वीज बंद राहिली. यावर कंपनीचे म्हणणे आहे की, तांत्रिक कारणामुळे वीज बंद राहिली. परंतु दर आठवड्यात मेंटेनन्स केल्यानंतरही असे का होते? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.दरम्यान, अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार १८ मार्च रोजी वर्धमान नगर आणि परिसरातील वीजपुरवठा सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील, असे महावितरणने जाहीर केले आहे. बुधवारी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत अमरावती रोड, बोखारा आणि गोधनी उपकेंद्रातील सर्व भाग, फेटरी, खरबी, वाडी शहर फीडर,चिंचभवन फीडर, सकाळी ९ ते १२ या वेळेत सहकारनगर, नरकेसरी ले-आऊट, लावा, खडगाव, हिंदुस्तान कॉलनी अमरावती रोड फीडर, अत्रे ले आऊट फीडर, धंतोली फीडर, सुभाष नगर फीडर, सकाळी ८ ते १० या वेळेत अपना भांडार फीडर, सीताबर्डी, दवलामेटी फीडर, सकाळी ८ ते ११ या वेळेत कर्वेनगर फीडर, हुडकेश्वर फीडर, नरसाळा रोड, मालवीय नगर फीडर येथील वीज पुरवठा बंद राहील. वैशालीनगर आणि कमाल टॉकीज फीडरवर एकात्मिक रस्ते विकास योजनेतील कामे पूर्ण करण्यासाठी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत वीज पुरवठा बंद राहील.

टॅग्स :mahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन