शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

निवडणूक जवळ आल्याने सफाई कामगारांचे पाय धुणे आठवले : सचिन सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:04 IST

ज्या सफाई कामगारांना गेली पाच वर्षे छळले गेले. यापूर्वी गुजरातमधील सफाई कामगारांचे तर हाल बेहाल करण्यात आले. स्वत: न्यायालयाला दखल घ्यावी लागली होती. परंतु आता निवडणुका जवळ आल्याने पंतप्रधानांना सफाई कामगारांचे पाय धुणे आठवले असून, पुन्हा जुमला पार्ट-२ ला सुरुवात झाली आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.

ठळक मुद्देपंतप्रधानांवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या सफाई कामगारांना गेली पाच वर्षे छळले गेले. यापूर्वी गुजरातमधील सफाई कामगारांचे तर हाल बेहाल करण्यात आले. स्वत: न्यायालयाला दखल घ्यावी लागली होती. परंतु आता निवडणुका जवळ आल्याने पंतप्रधानांना सफाई कामगारांचे पाय धुणे आठवले असून, पुन्हा जुमला पार्ट-२ ला सुरुवात झाली आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, अ‍ॅड. अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार उपस्थित होते.सचिन सावंत म्हणाले, सफाई कामगार ज्या समाजातून येतात त्यांच्यावर गेल्या पाच वर्षांपासून अन्याय सुरू आहे. पंतप्रधान मोदी हे गुजरातचे १२ वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात गुजरातमधील सफाई कामगारांचे बेहाल होते. त्यांना हाताने घाण उचलावी लागत होती. त्यांना या नरकीय यातनेतून बाहेर काढण्यासाठी कुठलेही प्रयत्न तेव्हा केले नाही. त्यांची अवस्था पाहून स्वत: उच्च न्यायालयाला दखल घ्यावी लागली. उच्च न्यायालयाने ११ वेळा निर्देश दिले, तरीही उपाययोजना झाली नाही. उलट पंतप्रधानांनी लिहिलेल्या आपल्या एका पुस्तकात म्हटले आहे की, घाण साफ करणाऱ्यांना ते काम केल्याने अध्यात्म लाभते, ही मनुवादी मानसिकता आहे. त्यामुळे सफाई कामगारांचे पाय धुऊन तीर्थ म्हणून प्याले तरी ते विचार धुऊन निघणार नाही, असे ते म्हणाले.निवडणूक जवळ आल्याने जुमला पार्ट-२ ला सुरुवात झाली आहे. सफाई कामगारांचे पाय धुणे त्याचाच एक भाग असून, दुसरीकडे नवनवीन योजना जाहीर केल्या जात आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना जाहीर केली आहे. ही योजना फसवी असून, सहा हजार रुपयात शेतकऱ्यांचा कुठला सन्मान केला आहे, अशी विचारणा शेतकरीच करू लागले आहेत. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ही योजना म्हणजे तोंडाला पाने पुसण्यासारखी आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा कुठलाही लाभ मिळणार नाही. गेल्या पाच वर्षांत जनतेला फसविण्याचा जो प्रकार सुरू आहे, त्यातलाच हा प्रकार आहे. जनतेचे मत जनतेच्या पैशानेच विकत घेण्याचा हा प्रकार असून याचा आम्ही निषेध करतो, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :congressकाँग्रेसprime ministerपंतप्रधान