शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

निवडणूक जवळ आल्याने सफाई कामगारांचे पाय धुणे आठवले : सचिन सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:04 IST

ज्या सफाई कामगारांना गेली पाच वर्षे छळले गेले. यापूर्वी गुजरातमधील सफाई कामगारांचे तर हाल बेहाल करण्यात आले. स्वत: न्यायालयाला दखल घ्यावी लागली होती. परंतु आता निवडणुका जवळ आल्याने पंतप्रधानांना सफाई कामगारांचे पाय धुणे आठवले असून, पुन्हा जुमला पार्ट-२ ला सुरुवात झाली आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.

ठळक मुद्देपंतप्रधानांवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या सफाई कामगारांना गेली पाच वर्षे छळले गेले. यापूर्वी गुजरातमधील सफाई कामगारांचे तर हाल बेहाल करण्यात आले. स्वत: न्यायालयाला दखल घ्यावी लागली होती. परंतु आता निवडणुका जवळ आल्याने पंतप्रधानांना सफाई कामगारांचे पाय धुणे आठवले असून, पुन्हा जुमला पार्ट-२ ला सुरुवात झाली आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, अ‍ॅड. अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार उपस्थित होते.सचिन सावंत म्हणाले, सफाई कामगार ज्या समाजातून येतात त्यांच्यावर गेल्या पाच वर्षांपासून अन्याय सुरू आहे. पंतप्रधान मोदी हे गुजरातचे १२ वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात गुजरातमधील सफाई कामगारांचे बेहाल होते. त्यांना हाताने घाण उचलावी लागत होती. त्यांना या नरकीय यातनेतून बाहेर काढण्यासाठी कुठलेही प्रयत्न तेव्हा केले नाही. त्यांची अवस्था पाहून स्वत: उच्च न्यायालयाला दखल घ्यावी लागली. उच्च न्यायालयाने ११ वेळा निर्देश दिले, तरीही उपाययोजना झाली नाही. उलट पंतप्रधानांनी लिहिलेल्या आपल्या एका पुस्तकात म्हटले आहे की, घाण साफ करणाऱ्यांना ते काम केल्याने अध्यात्म लाभते, ही मनुवादी मानसिकता आहे. त्यामुळे सफाई कामगारांचे पाय धुऊन तीर्थ म्हणून प्याले तरी ते विचार धुऊन निघणार नाही, असे ते म्हणाले.निवडणूक जवळ आल्याने जुमला पार्ट-२ ला सुरुवात झाली आहे. सफाई कामगारांचे पाय धुणे त्याचाच एक भाग असून, दुसरीकडे नवनवीन योजना जाहीर केल्या जात आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना जाहीर केली आहे. ही योजना फसवी असून, सहा हजार रुपयात शेतकऱ्यांचा कुठला सन्मान केला आहे, अशी विचारणा शेतकरीच करू लागले आहेत. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ही योजना म्हणजे तोंडाला पाने पुसण्यासारखी आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा कुठलाही लाभ मिळणार नाही. गेल्या पाच वर्षांत जनतेला फसविण्याचा जो प्रकार सुरू आहे, त्यातलाच हा प्रकार आहे. जनतेचे मत जनतेच्या पैशानेच विकत घेण्याचा हा प्रकार असून याचा आम्ही निषेध करतो, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :congressकाँग्रेसprime ministerपंतप्रधान