शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

निवडणूक जवळ आल्याने सफाई कामगारांचे पाय धुणे आठवले : सचिन सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:04 IST

ज्या सफाई कामगारांना गेली पाच वर्षे छळले गेले. यापूर्वी गुजरातमधील सफाई कामगारांचे तर हाल बेहाल करण्यात आले. स्वत: न्यायालयाला दखल घ्यावी लागली होती. परंतु आता निवडणुका जवळ आल्याने पंतप्रधानांना सफाई कामगारांचे पाय धुणे आठवले असून, पुन्हा जुमला पार्ट-२ ला सुरुवात झाली आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.

ठळक मुद्देपंतप्रधानांवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या सफाई कामगारांना गेली पाच वर्षे छळले गेले. यापूर्वी गुजरातमधील सफाई कामगारांचे तर हाल बेहाल करण्यात आले. स्वत: न्यायालयाला दखल घ्यावी लागली होती. परंतु आता निवडणुका जवळ आल्याने पंतप्रधानांना सफाई कामगारांचे पाय धुणे आठवले असून, पुन्हा जुमला पार्ट-२ ला सुरुवात झाली आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, अ‍ॅड. अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार उपस्थित होते.सचिन सावंत म्हणाले, सफाई कामगार ज्या समाजातून येतात त्यांच्यावर गेल्या पाच वर्षांपासून अन्याय सुरू आहे. पंतप्रधान मोदी हे गुजरातचे १२ वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात गुजरातमधील सफाई कामगारांचे बेहाल होते. त्यांना हाताने घाण उचलावी लागत होती. त्यांना या नरकीय यातनेतून बाहेर काढण्यासाठी कुठलेही प्रयत्न तेव्हा केले नाही. त्यांची अवस्था पाहून स्वत: उच्च न्यायालयाला दखल घ्यावी लागली. उच्च न्यायालयाने ११ वेळा निर्देश दिले, तरीही उपाययोजना झाली नाही. उलट पंतप्रधानांनी लिहिलेल्या आपल्या एका पुस्तकात म्हटले आहे की, घाण साफ करणाऱ्यांना ते काम केल्याने अध्यात्म लाभते, ही मनुवादी मानसिकता आहे. त्यामुळे सफाई कामगारांचे पाय धुऊन तीर्थ म्हणून प्याले तरी ते विचार धुऊन निघणार नाही, असे ते म्हणाले.निवडणूक जवळ आल्याने जुमला पार्ट-२ ला सुरुवात झाली आहे. सफाई कामगारांचे पाय धुणे त्याचाच एक भाग असून, दुसरीकडे नवनवीन योजना जाहीर केल्या जात आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना जाहीर केली आहे. ही योजना फसवी असून, सहा हजार रुपयात शेतकऱ्यांचा कुठला सन्मान केला आहे, अशी विचारणा शेतकरीच करू लागले आहेत. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ही योजना म्हणजे तोंडाला पाने पुसण्यासारखी आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा कुठलाही लाभ मिळणार नाही. गेल्या पाच वर्षांत जनतेला फसविण्याचा जो प्रकार सुरू आहे, त्यातलाच हा प्रकार आहे. जनतेचे मत जनतेच्या पैशानेच विकत घेण्याचा हा प्रकार असून याचा आम्ही निषेध करतो, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :congressकाँग्रेसprime ministerपंतप्रधान