शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

नागपुरात वृद्धांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले : जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे होत आहे आबाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 21:48 IST

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांच्या मृत्यूचे प्रमाण वाढवले आहे. नागपुरात गेल्या दीड महिन्यात दीडशेपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देदुखण्यांकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांच्या मृत्यूचे प्रमाण वाढवले आहे. नागपुरात गेल्या दीड महिन्यात दीडशेपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांचा मृत्यू झाला आहे.कोरोनामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. रोजगार बंद झाले. कामकाज ठप्प पडले आणि अनेकांचे जीवनमान जागच्याजागी थांबल्यासारखे झाले आहे. त्यामुळे वृद्धत्व आणि विविध आजारांनी ग्रस्त असलेले ज्येष्ठ नागरिक तसेच वृद्धांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. रोज पाच ते सात वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. काहींची खाण्या-पिण्याअभावी आबाळ होत असल्याने तर काहींच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होत असल्याने, हे मृत्यू होत असल्याचे डॉक्टर आणि पोलिस सांगत आहेत.पोलिसांच्या रेकॉर्डनुसार गेल्या दीड महिन्यात १५० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांचे आकस्मिक मृत्यू झाले आहे. त्यात रोज पाच ते सात जणांची भर पडत आहे. प्रकृती खराब झाली आणि डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशा प्रकारच्या केसेस जास्त नोंदविण्यात येत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळत आहे. दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लागली असल्यामुळे आणि अनेक खासगी दवाखाने बंद असल्यामुळे प्रकृती बिघडलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे. सर्दी , खोकला, दमा, पोटदुखी, ओकाऱ्या अशा आजारांकडे जुजबी औषध घेऊन दुर्लक्ष केले जात आहे. खाण्यापिण्याकडेही दुर्लक्ष होत असल्याने वृद्धाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे आधीच प्रतिकार शक्ती कमी असलेले वृद्ध व्यक्ती दगावतात, असे मत मेडिकलचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी यासबंधाने व्यक्त केले आहे.आकडेवारी खूप जास्तमेयो, मेडिकलमध्ये नेल्यामुळे मृत व्यक्तींची नोंद पोलिसांच्या रेकॉर्डवर होते. ज्यांचा घरच्या घरी मृत्यू होतो, अशा अनेक व्यक्तींची पोलिसांच्या रेकॉर्डवर नोंद होत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांच्या मृत्यूची आकडेवारी पोलिसांच्या रेकॉर्डपेक्षा कितीतरी पट जास्त असल्याचे सांगितले जाते.एकाच दिवशी पाच जणांच्या मृत्यूची नोंदबुधवारी १३ मे रोजी विविध भागात पोलिसांनी पाच आकस्मिक मृत्यूंची नोंद केली. नंदनवन मधील वाठोडा येथे राहणारे नैमोनिश मोहम्मद हदीश अन्सारी (वय ५५) यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना मेडिकलमध्ये नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अशाप्रकारे नंदनवनमधीलच वच्छला नामदेव मेश्राम (वय ८०) यांची प्रकृती बुधवारी सायंकाळी पाच वाजून ४० मिनिटांनी बिघडली. त्यांना मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्रतापनगरातील विद्याविहार कॉलनीत राहणारे जियालाल रतन कोठी (वय ६२) यांची अचानक प्रकृती खराब झाली. त्यांना मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी बुधवारी दुपारी २.४५ च्या सुमारास मृत घोषित केले. वाडीतील गजानन सोसायटीत राहणारे अशोक पांडुरंग मेश्राम (वय ६४) यांची बुधवारी दुपारी प्रकृती खराब झाली त्यांना मेयोत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पाचपावलीतील बलभद्र रामकृष्ण जयस्वाल (वय ६९) यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना मेयोत दाखल करण्यात आले होते. त्यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी मानकापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर पाचपावली पोलिसांनी बुधवारी जयस्वाल यांच्या मृत्यूची नोंद केली.

टॅग्स :Deathमृत्यू