शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

‘एल-निनाे’ने राेखला पाऊस? पारा चढला; शेतकरी चिंतेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2023 21:27 IST

Nagpur News गेल्या तीन दिवसांपासून कमजाेर पडलेल्या पावसाची स्थिती शेतकऱ्यांना चिंता करायला लावणारी आहे. मान्सूनच्या या कमजाेर स्थितीसाठी ‘एल-निनाे’च जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

नागपूर : गेल्या तीन दिवसांपासून कमजाेर पडलेल्या पावसाची स्थिती शेतकऱ्यांना चिंता करायला लावणारी आहे. शनिवारी अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये केवळ १०.३ मि.मी. पावसाची नाेंद झाली, जाे विदर्भात सर्वाधिक आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे काही दिवस अशीच स्थिती राहणार आहे. मान्सूनच्या या कमजाेर स्थितीसाठी ‘एल-निनाे’च जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सध्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मान्सून रेंगाळला आहे. मुंबई व आसपासच्या क्षेत्रात जाेरदार पाऊस आहे, पण इतर भागात किरकाेळ किंवा अगदीच नगण्य पाऊस आहे. तिथून पूर्वेकडे म्हणजे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाकडे सरकण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळत नसल्याचे निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले. त्यासाठी अरबी समुद्राहून वाहणारे आर्द्रतायुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरातून येणारी मजबूत अशी कमी दाब क्षेत्र प्रणाली आवश्यक आहे. ही मजबूत प्रणाली बंगालच्या उपसागरातून आलेली दिसत नाही.

सध्या बंगालच्या उपसागरातून हवेच्या कमी दाब क्षेत्राची प्रणाली आग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे म्हणजे छत्तीसगड, विदर्भाकडे कूच करणारी प्रणाली अतिशय कमजाेर आहे. मान्सूनला वेगाने खेचून कोसळण्यास मदत करण्यासाठी त्या प्रणालीची ताकद फारच अपुरी पडत आहे. हा कमकुवतपणा ‘एल-निनाे’च्या प्रभावामुळेच असण्याची शक्यता खुळे यांनी व्यक्त केली.

एल-निनाेचा प्रभाव असताना ‘इंडियन ओशियन डायपाेल’चा प्रभावही कमजाेर पडला आहे. आयओडी मजबूत असता तर विदर्भासह महाराष्ट्रात धुवांधार पाऊस पडला असता, पण ताेही कमजाेर असल्याने सध्या अगदीच किरकोळ पाऊस पडत आहे तर काही भागात अगदीच नगण्य पाऊस पडत आहे. एकंदरीत सध्या मान्सून काळात सर्व मदत करणाऱ्या वातावरणीय प्रणालींचे अस्तित्व असूनही मान्सूनवर नकळत एल-निनोचा काहीसा प्रभाव जाणवत आहे, असे मत माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, शनिवारी बुलढाणा व ब्रह्मपुरीत किरकाेळ पावसाची नाेंद झाली. नागपूरच्या काटाेल तालुक्यात १०.१ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. नागपुरात ढगाळ वातावरण असले तरी दिवसभर ऊन-सावलींचा खेळ सुरू हाेता. त्यामुळे कमाल तापमानही ३३.३ अंशांवर वाढले. चंद्रपूरला सर्वाधिक ३५ अंशांची नाेंद झाली. वर्ध्यातही पारा ३४.५ अंश हाेता. इतर जिल्ह्यात ३० ते ३३ अंशांपर्यंतची सरासरी आहे. रात्रीच्या तापमानातही काही अंशी वाढ झाल्याचे दिसत आहे.

 

 

टॅग्स :Rainपाऊस