शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
4
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
5
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
6
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
7
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
8
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
9
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
10
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
11
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
12
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
13
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
14
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
15
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
16
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
17
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
18
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
19
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
20
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

‘एल-निनाे’ने राेखला पाऊस? पारा चढला; शेतकरी चिंतेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2023 21:27 IST

Nagpur News गेल्या तीन दिवसांपासून कमजाेर पडलेल्या पावसाची स्थिती शेतकऱ्यांना चिंता करायला लावणारी आहे. मान्सूनच्या या कमजाेर स्थितीसाठी ‘एल-निनाे’च जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

नागपूर : गेल्या तीन दिवसांपासून कमजाेर पडलेल्या पावसाची स्थिती शेतकऱ्यांना चिंता करायला लावणारी आहे. शनिवारी अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये केवळ १०.३ मि.मी. पावसाची नाेंद झाली, जाे विदर्भात सर्वाधिक आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे काही दिवस अशीच स्थिती राहणार आहे. मान्सूनच्या या कमजाेर स्थितीसाठी ‘एल-निनाे’च जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सध्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मान्सून रेंगाळला आहे. मुंबई व आसपासच्या क्षेत्रात जाेरदार पाऊस आहे, पण इतर भागात किरकाेळ किंवा अगदीच नगण्य पाऊस आहे. तिथून पूर्वेकडे म्हणजे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाकडे सरकण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळत नसल्याचे निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले. त्यासाठी अरबी समुद्राहून वाहणारे आर्द्रतायुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरातून येणारी मजबूत अशी कमी दाब क्षेत्र प्रणाली आवश्यक आहे. ही मजबूत प्रणाली बंगालच्या उपसागरातून आलेली दिसत नाही.

सध्या बंगालच्या उपसागरातून हवेच्या कमी दाब क्षेत्राची प्रणाली आग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे म्हणजे छत्तीसगड, विदर्भाकडे कूच करणारी प्रणाली अतिशय कमजाेर आहे. मान्सूनला वेगाने खेचून कोसळण्यास मदत करण्यासाठी त्या प्रणालीची ताकद फारच अपुरी पडत आहे. हा कमकुवतपणा ‘एल-निनाे’च्या प्रभावामुळेच असण्याची शक्यता खुळे यांनी व्यक्त केली.

एल-निनाेचा प्रभाव असताना ‘इंडियन ओशियन डायपाेल’चा प्रभावही कमजाेर पडला आहे. आयओडी मजबूत असता तर विदर्भासह महाराष्ट्रात धुवांधार पाऊस पडला असता, पण ताेही कमजाेर असल्याने सध्या अगदीच किरकोळ पाऊस पडत आहे तर काही भागात अगदीच नगण्य पाऊस पडत आहे. एकंदरीत सध्या मान्सून काळात सर्व मदत करणाऱ्या वातावरणीय प्रणालींचे अस्तित्व असूनही मान्सूनवर नकळत एल-निनोचा काहीसा प्रभाव जाणवत आहे, असे मत माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, शनिवारी बुलढाणा व ब्रह्मपुरीत किरकाेळ पावसाची नाेंद झाली. नागपूरच्या काटाेल तालुक्यात १०.१ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. नागपुरात ढगाळ वातावरण असले तरी दिवसभर ऊन-सावलींचा खेळ सुरू हाेता. त्यामुळे कमाल तापमानही ३३.३ अंशांवर वाढले. चंद्रपूरला सर्वाधिक ३५ अंशांची नाेंद झाली. वर्ध्यातही पारा ३४.५ अंश हाेता. इतर जिल्ह्यात ३० ते ३३ अंशांपर्यंतची सरासरी आहे. रात्रीच्या तापमानातही काही अंशी वाढ झाल्याचे दिसत आहे.

 

 

टॅग्स :Rainपाऊस