शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

‘दिलेला शब्द पाळतो म्हणून राज्यात सत्ताबदल’, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 07:24 IST

मला राजकीय पार्श्वभूमी नाही. असे असताना केवळ सर्वांनी दाखविलेल्या विश्वासाच्या बळावर मुख्यमंत्री झालो, शिंदे यांचे वक्तव्य.

नागपूर : आम्ही दिलेला शब्द पाळतो. त्यामुळे राज्यात सत्ताबदल घडविण्यात आला व सर्वसामान्य जनतेच्या मनातील सरकार स्थापन करण्यात आले, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच्या सरकारवर वार केला.

मराठा समाजाच्या वतीने सोमवारी रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अंजनगाव सुर्जी येथील श्रीनाथ पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार प्रवीण दटके, मराठा समाजाचे नेते राजे मुधोजी भोसले, राजे संग्रामसिंह भोसले, शिरीष राजेशिर्के, नरेंद्र मोहिते, दिलीप धंद्रे, दीपक देशमुख, आदी उपस्थित होते.  

राज्यात सत्ताबदल घडविण्यासाठी ५० आमदार, १३ खासदार व अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी साथ दिली. मला राजकीय पार्श्वभूमी नाही. असे असताना केवळ सर्वांनी दाखविलेल्या विश्वासाच्या बळावर मुख्यमंत्री झालो. मराठा समाजाचा विकास करण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी सतत प्रयत्न करेन, असेही शिंदे यांनी सांगितले. 

स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे दोघेही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत, असे मत व्यक्त केले. शिवाजी महाराज श्रीराम व श्री कृष्ण यांच्या रीती-नितीने चालत होते. हे दोघेही त्याच रीती-नितीचे पालन करताहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. परंतु, ते काही कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या. 

मराठा समाजाच्या विकासाकडे लक्ष - फडणवीसमराठा समाजाच्या विकासाकडे राज्य सरकारचे लक्ष आहे. त्यांच्या १२ मागण्या पूर्ण करण्यासाठी मी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे वकिली करेन. सरकारने मराठा समाजाच्या विकासाकरिता विविध योजना सुरू केल्या आहेत. समाजातील दोन लाख तरुणांना उद्योजक करण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीही सरकार गंभीर आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरEknath Shindeएकनाथ शिंदे