शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

एसटीच्या पगाराची ‘एक अनार साै बिमार’ची स्थिती अनेक महिन्यांपासून सुरू : रडगाणे संपता, संपेना

By नरेश डोंगरे | Updated: February 20, 2023 20:20 IST

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले पगाराचे रडगाणे थांबायला तयार नाही. वेळेवर पगार नाही अन् झाला तर पुरेसा पगार अन् खर्च करता येईल, अशी स्थिती नाही.

नागपूरएसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले पगाराचे रडगाणे थांबायला तयार नाही. वेळेवर पगार नाही अन् झाला तर पुरेसा पगार अन् खर्च करता येईल, अशी स्थिती नाही. याही महिन्यात शासनाने तिसऱ्या आठवड्यात पगाराची रक्कम दिली असली तरी ती पुरेशी नसल्याने कुणाला द्यायचे अन् किती द्यायचे, अशी स्थिती आहे.

एसटी महामंडळाच्या राज्यातील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ८९ हजार असून, त्यांच्या पगारापोटी महामंडळाला महिन्याला सुमारे साडेतीनशे कोटींचा खर्च करावा लागतो. विदर्भातील कर्मचाऱ्यांची संख्या २० हजार असून, त्यांच्या पगाराचा सरासरी हिशेब ५५ ते ६० हजारांच्या घरात पोहोचतो. नागपूर विभागात २,६०० कर्मचारी काम करतात. त्यांना निव्वळ पगारापोटी महामंडळाला दर महिन्याला सुमारे सात कोटींचा खर्च येतो. पीएफ, ग्रॅज्युईटी, कर आणि इतर खर्च पकडता एसटीला महिन्याला ८ कोटी आणि नुसत्या डिझेलवर ८ कोटी रुपये खर्च करावा लागतो.

विशेष म्हणजे, एसटी महामंडळाचे अलीकडे बऱ्यापैकी उत्पन्न वाढले आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या पगाराचा निधी सरकार देते. गेल्या काही महिन्यांपासून मात्र सरकारने हात आखडता घेतल्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांचे दर महिन्याला वांदे होतात. या पार्श्वभूमीवर, जानेवारीचा पगार १२ तारखेला तर फेब्रुवारीचा पगार १७ तारखेला झाला. जानेवारीत सरकारने ३०० कोटी तर या महिन्यात केवळ २२३ कोटी रुपये दिले. नागपूर विभागाच्या वाट्याला त्यातील ६ कोटी २५ लाख रुपये आले. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पुरेशी नाही. त्यामुळे कुणाला द्यायचे अन् किती द्यायचे, असा प्रश्न आहे. शिवाय पीएफ, ग्रॅज्युईटी आणि इतर खर्चाचे कसे करावे, असा प्रश्न संबंधितांना पडला आहे. थोडक्यात ‘एक अनार साै बिमार’ अशी अवस्था सध्या एसटीचे वरिष्ठ अधिकारी अनुभवत आहेत.

पुरेसाही नाही अन् वेळेवर नाही

एसटी चालविण्यासाठी महामंडळातील शीर्षस्थ अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. एसटीला प्रवासी भाडे अन् मालवाहतुकीच्या भाड्याचा तेवढा आधार आहे. उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. मध्यंतरी एसटीतर्फे कुरियर सेवा सुरू करून उत्पन्न वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात अधिकाऱ्यांना यश आले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कोंडी होते. एक तर इतर विभागांच्या तुलनेत कर्मचाऱ्यांना पाहिजे तसा पगार नाही अन् जो आहे तो वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.

टॅग्स :nagpurनागपूर