शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

एसटीच्या पगाराची ‘एक अनार साै बिमार’ची स्थिती अनेक महिन्यांपासून सुरू : रडगाणे संपता, संपेना

By नरेश डोंगरे | Updated: February 20, 2023 20:20 IST

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले पगाराचे रडगाणे थांबायला तयार नाही. वेळेवर पगार नाही अन् झाला तर पुरेसा पगार अन् खर्च करता येईल, अशी स्थिती नाही.

नागपूरएसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले पगाराचे रडगाणे थांबायला तयार नाही. वेळेवर पगार नाही अन् झाला तर पुरेसा पगार अन् खर्च करता येईल, अशी स्थिती नाही. याही महिन्यात शासनाने तिसऱ्या आठवड्यात पगाराची रक्कम दिली असली तरी ती पुरेशी नसल्याने कुणाला द्यायचे अन् किती द्यायचे, अशी स्थिती आहे.

एसटी महामंडळाच्या राज्यातील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ८९ हजार असून, त्यांच्या पगारापोटी महामंडळाला महिन्याला सुमारे साडेतीनशे कोटींचा खर्च करावा लागतो. विदर्भातील कर्मचाऱ्यांची संख्या २० हजार असून, त्यांच्या पगाराचा सरासरी हिशेब ५५ ते ६० हजारांच्या घरात पोहोचतो. नागपूर विभागात २,६०० कर्मचारी काम करतात. त्यांना निव्वळ पगारापोटी महामंडळाला दर महिन्याला सुमारे सात कोटींचा खर्च येतो. पीएफ, ग्रॅज्युईटी, कर आणि इतर खर्च पकडता एसटीला महिन्याला ८ कोटी आणि नुसत्या डिझेलवर ८ कोटी रुपये खर्च करावा लागतो.

विशेष म्हणजे, एसटी महामंडळाचे अलीकडे बऱ्यापैकी उत्पन्न वाढले आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या पगाराचा निधी सरकार देते. गेल्या काही महिन्यांपासून मात्र सरकारने हात आखडता घेतल्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांचे दर महिन्याला वांदे होतात. या पार्श्वभूमीवर, जानेवारीचा पगार १२ तारखेला तर फेब्रुवारीचा पगार १७ तारखेला झाला. जानेवारीत सरकारने ३०० कोटी तर या महिन्यात केवळ २२३ कोटी रुपये दिले. नागपूर विभागाच्या वाट्याला त्यातील ६ कोटी २५ लाख रुपये आले. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पुरेशी नाही. त्यामुळे कुणाला द्यायचे अन् किती द्यायचे, असा प्रश्न आहे. शिवाय पीएफ, ग्रॅज्युईटी आणि इतर खर्चाचे कसे करावे, असा प्रश्न संबंधितांना पडला आहे. थोडक्यात ‘एक अनार साै बिमार’ अशी अवस्था सध्या एसटीचे वरिष्ठ अधिकारी अनुभवत आहेत.

पुरेसाही नाही अन् वेळेवर नाही

एसटी चालविण्यासाठी महामंडळातील शीर्षस्थ अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. एसटीला प्रवासी भाडे अन् मालवाहतुकीच्या भाड्याचा तेवढा आधार आहे. उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. मध्यंतरी एसटीतर्फे कुरियर सेवा सुरू करून उत्पन्न वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात अधिकाऱ्यांना यश आले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कोंडी होते. एक तर इतर विभागांच्या तुलनेत कर्मचाऱ्यांना पाहिजे तसा पगार नाही अन् जो आहे तो वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.

टॅग्स :nagpurनागपूर